विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : नुकत्याच पडलेल्या संततधार पावसाने करणवाडी ते नवरगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मौजा नवरगाव पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून लोखंडी सलाख उघड्या पडून जीवितास धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे.
सदरहू एकमेव मार्ग असल्याने समोर च्या गावाला पर्याय नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकाकडून दिल्या जात आहे. परिणामी या खड्डेमय रस्त्याने जीवघेणा प्रवास करावा लागत असून नाहक त्रास येजा करणाऱ्यांना सहन करावे लागतो त्यामुळे संबंधित विभागाने या मार्गावर नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ सोडण्यात यावी व सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी आहे.