अंनिस ने आम्हाला खूप दिले, आता आम्ही अंनिस ला देणार- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापन दिन लातूर मध्ये विविध उपक्रम राबवून केला साजरा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

 लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 33 वा वर्धापन दिन आज (ता 9 ऑगस्ट) रोजी लातूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी सुनिताताई अरळीकर, व विद्या हतोलकर, या महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तर सायंकाळी 4 वाजता राजर्षी शाहू महाविद्यालयात सर्व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करून "मला महाराष्ट्र अनिस ने काय दिले" हे आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे उपाध्यक्ष अजित निंबाळकर हे उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, राज्य कार्यवाह उत्तरेश्वर बिराजदार, जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले हे उपस्थित होते.
 
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अभिवादन गीत घेऊन करण्यात आली, तर प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांनी केले,सुधीर भोसले यांनी यावेळी कांही चमत्कार करून त्या मागील वैज्ञानिक कारण याची माहिती दिली, तर उत्तरेश्वर बिराजदार यांनी महाराष्ट्र अनिस ची 33 वर्षातील वाटचाल याविषयी माहिती आणि कार्याचा परिचय करून देत भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन,यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी रणजित आचार्य, प्रा दशरथ भिसे, सचिन औरंगे, अजित निंबाळकर, सुधीर भोसले, अनिल दरेकर यांनी मला अंनिस ने काय दिले याविषयी अतिशय मनभेदक असे विचार व्यक्त केले, तसेच आता आम्ही अंनिस ला काय देणार हा निर्धारही व्यक्त केला यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून सर्वांचे अभिनंदन केले.

सदरील कार्यक्रमास राज्य कार्यवाह दिलीप अरळीकर, इम्रान सय्यद, बालाजी सुगावे,सुनिताताई अरळीकर, विद्या हतोलकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दशरथ भिसे यांनी केले तर आभार सचिन औरंगे यांनी मानले.

                          
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();