सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी बहुल, मागास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभुर्णा तालुक्यात मागील दिवसात महिलांवर अन्याय, अत्याचारच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र पोंभुर्णा पोलिस प्रशासन बघ्याची भुमिका बजावत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. घटना घडली तेव्हाच पोलीस प्रशासन भुमिका घेते, परंतु घटना व्हाव्या नाहीत म्हणून शासनाने अनेक धोरण अवलंबिले असताना यांची प्रभावीपणे जनजागृती पोलिसां मार्फत केली जात नाही. हा प्रकार अंत्यत खेदजनक असून पोलिसां विषयी जनतेत असंतोष उमटत आहे.
पोंभुर्णा तालुक्यात इतकी मोठी घटना घडून सुद्धा येथील पालकमंत्री खासदार, आमदार साधी दखल घेत नाही.ही एक शाेकांतिका आहे. सदरहु पिडीताच्या तक्रारीच्या अनुषंगाने पाेलिसांनी या प्रकरणात दि.१० डिसेंबरला नवेगांव माेरे येथील साैरभ ढवस, राेशन कष्टी व मनाेज पाल यांना अटक करुन त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पिडीते संबधी वा तिच्या पुढील भविष्याकरीता न्याय मिळावा म्हणून कुणी पुढे येत नाही. या गंभीर प्रकणात गप्प बसलेल्या कांग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, सत्ताधारी पक्षात असलेल्या महिला विंग्स कुठे गेल्यात असा खडा सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी प्रसिद्धीला दिलेल्या एका पत्रकातुन विचारला आहे. पिडीतेचं पुनर्वसन करुन तात्काळ एक करोड रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या कुटुबीयांना द्यावी अशी मागणी देखिल त्यांनी या माध्यमातून केली आहे.
महाराष्ट्र शासनाने बेटी बचाव बेटी पढाओ नारा लावून संविधानीक तरतुदी केल्या आहेत. व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ अंतर्गत बालकांसाठी मोठी तरतूद केली आहे. त्याही नंतर महाराष्ट्राचे महिला धोरण, राष्ट्रीय महिला धोरण मसुदा २०१६, राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण २००१, बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत, बालक आणि हल्ला, पिडीतांकरीता मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी करणे व इतरही धोरणे आहेत. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यात ग्रामीण भागात घडलेल्या या समाजसुन्न करणाऱ्या घटनेत त्यांच्या कुंटुबाची मोठी हानी झाली असून मानसिक खच्चीकरण झाले आहे. उपराेक्त धोरणांच्या माध्यमातून पोंभुर्णा तालुक्यातील पिडीत १४ वर्षीय बालिकेवर घडलेल्या अत्यारात तिचे पुनर्वसन तात्काळ करुन एक करोडची आर्थिक मदत तिच्या कुंटुबीयांना जाहीर करुन पिडीत व कुटुबांचे मनोबल वाढवावे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने पोंभुर्णा तालुक्यातील महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचार व पोलिसांच्या कर्तव्यशुन्य कारभारा विरोधात भुमिका घेऊन महिला सक्षमीकरण, महिला बचाव व तालीबानी व्यवस्थेविरोधात मोठे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी दिला आहे.
समाजमन सुन्न करणारी घटना : १४ वर्षीय मुलीचा आळीपाळीने लैंगिक छळ !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 12, 2021
Rating:
