टॉप बातम्या

राजूर बचाव संघर्ष समितीने घेतली सर्व पक्षीय नेत्यांची वणी येथे बैठक

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : कोळसा सायडींग मुळे राजूर गावाचे अस्तित्व धोक्यात आले असून येथील सुरू झालेल्या रेल्वे कोळसा सायडींग मुळे अख्खा गाव प्रदूषणाच्या विळख्यात आलं असल्याने गावातील जनतेच्या आरोग्यावर मोठा घातक परिणाम होऊन गावात जीवन व्यतीत करणे कठीण झाले आहे. त्यामूळे सायडींग अन्यत्र हटविण्यासाठी अख्ख राजूर गाव एकवटला असून, राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने वणी येथे सर्वपक्षीय वरिष्ठ पुढाऱ्यांची बैठक घेऊन वरील विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी कोळसा सायडींग हटविण्यापर्यंत संघर्ष सुरूच राहील असा ठाम निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला मा. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, संजय देरकर, महेंद्र लोढा, राजू उंबरकर, जयसिंग गोहोकार, कॉ शंकर दानव, राजाभाऊ पाथ्रडकर, विक्रांत चचडा, ऍड. रुपेश ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. 
राजूर कॉलरी येथील कोळशाच्या रेल्वे सायडींग मुळे उद्भवलेल्या समस्येने निर्माण झालेल्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोळसा सायडींग ला ग्रामपंचायतीची परवानगी व प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या नियमांचे पालन न करता सुरू असल्याने सायडींग अवैध असल्याची ओरड  ग्रामस्थांची मागील तीन महिन्यापासून आहे. परिणामी ग्रामसभेचा ठराव घेऊन कोळसा सायडींग हटविण्याचा प्रस्ताव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा व जो पर्यंत कोळसाची सायडींग गावातून हद्दपार होत नाही तोपर्यंत संघर्ष चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. 
या वेळेस राजूर बचाव संघर्ष समितीचे जीप सदस्य संघदीप भगत, डेव्हिड पेरकावार, मो.अस्लम, अशोक वानखेडे, कुमार मोहरमपुरी, डॅनी संड्रॉवार, प्रवीण खानझोडे, बालाजी मिलमिले, अनिल डवरे, साजिद खान, प्रदीप बांदूरकर, रफिक सिद्दीकी, अमृत फुलझेले, जयंत कोयरे, रियाजुल हसन, मो. खुसनुर, फैजल खान, रतन राजगडकर, राहुल कुंभारे, श्रावण पाटील, समय्या कोंकटवार, महाकाली पामुलवार, मंगेश जुनघरी, विजय तोतडे आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post