बार्टीच्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवकांनी जिवनात परिवर्तन करावे - दिलीप सोंडारे


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१४ ऑक्टो.) : बिलोली तालुक्यातील हिप्परगामाळ येथे दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला आहे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आयुब भाई खान यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले आहे
 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था बार्टी पुणे च्या विविध योजनांचा लाभ घेऊन युवकांनी जिवनात परिवर्तन घडवून आणला पाहिजे असे मत नायगांव तालुका समतादुत दिलीप सोंडारे यांनी दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी ६५ व्या धम्म चक्र परिवर्तन दिनी ते बोलताना म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. उत्तम इंगोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठलराव गायकवाड, आयुबभाई यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सय्यद बाशीद, शिवा गायकवाड, आशिष नेत्रगावकर, शेख आमेर, पो.पा.प्रल्हादराव जाधव पवनकुमार जाधव, भीमराव सोंडारे, विजय सोंडारे, अजय सोंडारे, विकास सोंडारे, माधव सोंडारे, वसंत सोंडारे, दिगंबर सोंडारे, बंटी सोंडारे, विनोद सोंडारे, नितीन नरवाडे, गौतम वाघमारे, एच.एम.रानवळकर, नागोराव रानवळकर, संतोष दासवाड, के.जी.रानवळकर, दिपक वाघमारे, सौ.शोभाताई दिलीप सोंडारे, राधाबाई सोंडारे, पुष्पा पिंगळे, सिमाबाई हनमंते, मुख्याध्यापक गोपाळ चव्हाण, माणीकराव गोटमवाड, सौ.मिरा आगलावे ,बोयावार वाघमारे पाटील सह बौद्धवाड्यातील बौद्ध सर्व उपासक बौद्ध उपासिका उपस्थित होते.

समतादु दिलीप सोंडारे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या व बार्टी च्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी युवक युवती यांना आव्हान केले.सदर संवाद कार्यक्रम बार्टी चे महासंचालक श्री धम्म ज्योती गजभीये आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.