'सातबारा कोरा' पदयात्रेत वणी तालुक्यातील 30 ते 40 कार्यकर्ते रवाना..

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शासनाच्या आश्वासनानंतर बेमुदत अन्नत्याग आंदोलन मागे घेतले, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात शासनाची भूमिका वेळकाढूपणाची दिसत असल्यामुळे शासनाला पुन्हा जागृत करण्यासाठी ‘सात-बारा कोरा’ पदयात्रा काढणार असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती.

आता यवतमाळ येथून या पदयात्रेला प्रारंभ झाला असून यात्रेत राज्यभऱ्यातून शेतकरी, समर्थक तथा प्रहार चे यवतमाळ उपजिल्हा प्रमुख मोबीन शेख यांच्यासह वणी तालुक्यातील जवळपास 30 ते 40 पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहे. 

उपजिल्हा प्रमुख मोबीन शेख यांच्या नेतृत्वात लाखखिंड (ता. दारव्हा) येथे 'मी शेतकरी' टोपी चे वाटप करण्यात आले. कालपासून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ‘सात-बारा कोरा’ या पदयात्रा साठी रवाना होऊन प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष, बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे यासाठी ते पायदळ चालत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post