माझी उमेदवारी आदिवासी कोलाम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी - राहुल आत्राम


सह्याद्री चौफेर : वृत्तसंस्था 

वणी : अपक्ष उमेदवार राहुल नारायण आत्राम यांनी प्रसिद्धी पत्रकातुन आपली उमेदवारी ही आदिवासी कोलाम समाजाला मुख्य प्रवाहात आणून शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी असे सांगितले. 

वणी विधानसभा मतदारसंघात महिलासाठी, शेतकऱ्यांसाठी, आदिवासी समाजासाठी, आरोग्य, विद्यार्थी, खेळाडू, कर्मचारी, सामान्यजनतेकारिता, भटक्या विमुक्त जमाती व मागासवर्गीय ह्यांच्या समस्या असून विधानसभा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे पण कोणत्याही उमेदवाराने याकडे लक्ष दिले नाहीत.

यासाठीच आपण वणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली असून या मतदारसंघात माझ्या रूपाने परिवर्तनाची नांदी आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे माझ्या वर विश्वास ठेवणारी व्यक्ती आशीर्वाद देईल असे सांगितले. त्यामुळेच आपण आपली उमेदवारी कायम ठेवली असून मतदारांनी माझ्या जेवणाचे ताट या चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.