सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : शहरात नागरिकांसाठी मूलभूत सुविधा पुरविणे ही शासन प्रशासनाची जबाबदारी असुन मारेगाव शहरातील व तालुक्यातील नागरिकांना या मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत असल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जेष्ठ नेते देवराव वाटगुरे व शामादादा कोलाम ब्रिगेड चे पांडुरंग टेकाम यानी बसस्थानक राखीव जागेवर आमरण उपोषणाची सुरवात कऱण्यात आली आहे.
बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते तथा उपोषणकर्ते देवराव वाटगुरे प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे की, बसस्थानक हा शहराचा आत्मा आहे आणि तो आत्माच जर धोक्यात येत असेल तर सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सदर उपोषण हे राजकारणासाठी नाही तर मारेगाव शहरात नागरिकांसाठी भव्यदिव्य बसस्थानक बांधकाम करण्यासाठी सुरू केले आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या सौ. इंदिरा बोंदरे, पांडुरंग टेकाम यांनी केले आहे.
यावेळी वासुदेव रामपूरे, सुरेश पिंपळशेंडे, विलास बोबडे, ज्ञानेश्वर लोडे, गुलाब सिडाम, परसराम धूवें, विलास गातडे, संतोष बोबडे, रामदास बापूराव पेंदोर, नंदकिशोर सिडाम, संतोष अत्राम यांचा सहभाग असुन समशेर सिंग भोसले फासे पारधी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास भाऊ पवार यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.