सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
यावर्षी सुद्धा सन्मान स्त्री शक्तीचा या फाऊंडेशन द्वारे वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे हा कार्यक्रम परमडोह येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्त्री -शक्तीचे दमदार स्वागत व जल्लोष करण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अधक्ष किरण देरकर या प्रमुख उपस्थित होत्या. सोबतच प्रमुख पाहुणे म्हणुन गीता काकडे,(पोलीस पाटील), कलावती डवरे,लता वाभीटकर, कु.श्वेता जैन (ईंडेन गॅस संचालीका),सुरेखा ढेंगळे (व्यसनमुक्ती संघटना अध्यक्ष), शारदा चिंतकुंटलवार (सा.कार्यकर्त्या)होत्या. वेळी गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या.
या प्रसंगी किरण देरकर यांनी उपस्थीत महिलांना विधवा प्रथा,रुढी-परंपरा समाजाला कशा घातक आहे त्या बद्दल मार्गदर्शन केले. परिसरातील महीला वर्ग यांना सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनची चळवळ प्रत्येक स्त्री पर्यंत कशी पोहचेल आणि त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करुन महिलांना न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी परमडोह येथे 'सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन' ची स्थापना करण्यात आली,ही संघटना नेहमी तत्पर असेल असे आश्वासनच नाहीतर विश्वास निर्माण केला.
दरम्यान आशासेविका योगीता डाखरे, फुलझेले मॅडम (पि एस सि), भावना किनाके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील विधवा महिलांना वाण देऊन आपल्या बोलण्यातुनच नाही तर कृतीतुन समाजात बदल घडवून आणण्यच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे असं त्या या प्रसंगी म्हणाल्या. यावेळी उपस्थीत महिलांनी आपल्या नावीन्यपूर्ण कला सादर केल्या.
या कार्यक्रमाला उपस्थित फाउंडेशन च्या सदस्या वैशाली देठे, शारदा चिंतकुंटलवार, सुरेखा ढेंगळे, मीनाक्षी मोहीते, अर्चना पिदूरकर, वेणु झोडे व सजीता मोहुर्ले, गीता सोयाम, माधुरी टेकाम, प्रीया कोडापे, बेबीबाई सुरपाम, शोभा सोयाम, मंदा पेंदोर, शारदा पेंदोर गावातील सर्व महीला भगीनी,गावातील सरपंच, सर्व महीला बचत गट व युवक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन सहकार्य केले. कार्यक्रमाचे नागेश मोहूर्ले यांनी सूत्रसंचालन केले व राजेंद्र ईद्दे यांनी प्रास्ताविक मधुन "सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन" यांच्या कार्यावीषयी माहीती दिली. किरणताई उपेक्षित महिलांना आधारवडच, असे उपस्थित महिलांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी बेटी "बचाओ बेटी पढाओ" शपथ देऊन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.