नहरात वाहुन गेलेल्या युवकाचा दोन दिवसानंतर, व्याहाड बुज नहराजवळ मिळाला मृत्युदेह....


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : जनकापुर येथे आजीच्या अंत्यविधीसाठी आलेला युवक गोसेखुर्द नहराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना रविवारी दि 30 आक्टो. पाथरी पोलीस ठाणे हद्दीत घडली होती.
मृतक चेतन रवींद्र कुमरे रा. चारगांव येथील रहिवासी असून.रविवारी दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला परंतु त्याचा शोध लागला नाव्हता. सोमवारी सकाळ पासुन नहरात बोटीने शोधमोहीम राबविण्यात आले परंतु,सोमवारी पण उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळे मंगळवारी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आले. मंगळवारला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान व्याहाड बुज. ते कापसी रोडवरील नागोबा देवस्थान नहराजवळ त्याचा मृत्युदेह तरंगत असताना मिळाला.तब्बल दोन दिवसानंतर चेतन कुमरेचा मृत्युदेह मिळाला.चेतन हा आजीच्या अत्यंविधीसाठी संपूर्ण परिवारासोबत जनकापुर येथे आला होता.

अंत्यसंस्कारानंतर तो निलकंठ गेडाम, कुणाल धुर्वे, शैलेश धुर्वे सोबतच काही लोकासोबत आंघोळ करण्यासाठी गोसेखुर्द नहराजवळ गेला होता.प्रज्जवल मडावी हा युवक सुरुवातीला नहरात उतरला,परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने वाहू लागला,त्याला वाचवण्यासाठी काही युवकांनी पाण्यात उडी घेतली,त्याच वेळी चेतनने सुध्दा पाण्यात उडी घेतली पण तो पाण्यात वाहु लागला.त्याला वाचविण्यात सोबतच्या युवकांना यश आले नाही.

 सदर नहरात आजपर्यंत पाच ते सहा व्यक्तीचा तर अनेक वन्यप्राण्यांच्या जीव सुध्दा गेला असल्याने यासाठी किमान पाचशे मीटर वर पायऱ्यांची तर प्रत्येक गावालगत धुणेघाठ बांधण्यात यावे अशी मागणी सावली पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी केली आहे. पाथरीचे ठाणेदार मंगेश मोहोळ,यांच्या मार्गदर्शनात पाथरी पोलीस स्टेशनने शोध मोहीम राबविली,घटनेचा पुढील तपास सुरू आहे.मात्र चेतनचा दुर्दैवी मृत्यूने चारगाव येथे शोककळा पसरली आहे.