टॉप बातम्या

प्रशासनाला जागे करण्यासाठी पत्रकारांचे भजन आंदोलन; आंदोलनाचा सतरावा दिवस


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : गेल्या 17 दिवसापासून शिवाजी चौक ते महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज पर्यंत 100 फुट रस्ता करावा या रस्त्याच्या कडेला असलेल्या शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद व मराठी पत्रकार संघ शिवाजी चौक उदगीर येथे सुरू असलेल्या शंभर फुटाच्या रस्त्यासाठी पत्रकाराचे अनेक दिवसांपासून धरणे आंदोलन चालू आहे.
आज धरणे आंदोलनाचा सतरावा दिवस असून देखील कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने या धरणे आंदोलनाकडे लक्ष दिले नाही म्हणून आज आषाढी एकादशी निमित्त शिवाजी चौक भर पावसात येथे आंदोलनाच्या ठिकाणी टाळ, मृदंगाच्या जय घोषणा त धरणे प्रशासनाला जागे करण्याचे काम पत्रकारांनी केले.
धरणे आंदोलन प्रसंगी पत्रकार अंबादास आलमखाने, नागनाथ गुट्टे, दर्पण न्यूज चे संपादक सुनील हवा, सुधाकर नाईक,अरविंद पत्की, निवृत्ती जवळे, विधीज्ञ विष्णू लांडगे, श्रवणकुमार माने, संगम पटवारी, मुक्त पत्रकार बालाजी सुवर्णकार, पत्रकार प्रा. बिभीषण मद्देवाड, दत्ता गायकवाड उपस्थित होते.
Previous Post Next Post