चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : दारव्हा तालुका उन्हाळ्यात मजुरांना शेतात मजुरी मिळत नाही, तेव्हा वनालगतच्या गावांना तेंदूपाने संकलनातून मोठ्या प्रमाणात आर्थिक साहाय्य मिळते.हा शेतीप्रधान असल्यामुळे या भागात मोठे उद्योग व्यवसाय कारखाने नसल्यामुळे बेरोजगारीची भीषण समस्या आहे . केवळ शेतीच्या हंगामात ग्रामीण भागातील नागरिकांना मजुरीची कामे मिळतात.अशातच या मिळकतीतून आपल्या संसाराचा गाडा हाकण्याची कसरत ग्रामीण भागातील नागरिकांना महिलांना करावी दिवसांत तेंदूपत्ता बिडी बनविण्यासाठी लागणारे पाणे याची मागणी बाजारपेठत मोठ्या प्रमाणात असते कंत्राटी पध्दतीने संबंधित ग्रामीण भागांतील मजुरांकडून जंगलातून वेचून घेतात यामधून नागरिकांच्या महिलांच्या हाताला लागते.काम मिळून दोन पैसे मिळतात तालुक्यातील ग्रामीण भागात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असताना एका घरातील सर्वच सदस्य संकलन करून आणलेल्या पानाची गड्डूया बांधतानाचे बोलके दृश्य तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या दिशेने मार्गक्रमण करणार्या तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग आणणे गरजेचे आहे याकरिता पक्षभेद विसरून सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी सकारात्मक धोरण अवलंबत तालुक्यातील नागरिकांच्या हाताला काम मिळवून देणे व तालुक्याच्या विकासात आपली भुमिका वळविणे गरजेचे आहे.
तेंदूपत्ता संकलनातून अनेक कुटुंबाला मिळाला रोजगार..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 17, 2022
Rating:
