उद्वस्त करणारी ग्रामीण व्यवस्था हाणुन पाडण्यासाठी सी पी आय चा लढा : कॉ.अनिल घनश्याम हेपट (बोध चिन्ह :विळा ओबी)


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
  
वणी : 76- वणी,मारेगाव झरीजामणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विजयाचे सिल्लेदार ठरण्यासाठी मूळ समस्यावर लक्ष केंद्रित न करता, जरू प्रमाणे रक्त शोषण करीत असल्यामुळे ग्रामीण शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत आहे. ती टिकवण्यासाठी ध्येयधोरण ठेवून सी पी आयचा लढा तीव्र करण्यासाठी विचाराचे हात, पाय, डोके समोर करा,असा मतदात्यासी संवाद साधताना कॉ. अनिल घनश्यामराव हेपट (बोध चिन्ह, विळा ओबी) यांनी मत वैक्त केले.
 
या पुढे बोलताना, भारतीय शेती क्षेत्रात दोन महत्त्वाचे अंतर्विरोध आहेत. पहिला म्हणजे एकीकडे जमीनदार, मोठे भांडवली शेतकरी, मोठे व्यापारी, सावकार आणि त्यांचे सहकारी आणि दुसरीकडे शेतमजूर, गरीब आणि मध्यम शेतकरी, ग्रामीण कारागीर आणि इतर यांचा समावेश असलेला शेतकरीवर्ग. दुसरा अंतर्विरोध म्हणजे सरकारच्या साम्राज्यवादधार्जिन्या नवउद्धार वादी धोरणांना केवळ मोठे शेतकरी वर्गाकडून नव्हे तर ग्रामीण भागातील श्रीमंत वर्गाकडूनही होत असलेला वाढता विरोध.''
 
उदारीकरणाच्या टप्प्यात, भांडवलाचा होत असलेला संचय भारतीय शेतीचा नाश करत आहे आणि भारतीय शेतकरीवर्गावर घाला घालत आहे. भूमी सुधारणा उलटा अर्थ प्राप्त झाला असून जमीन कसणाऱ्यांसाठी नाहीतर, कार्पोरेटसाठी आहे. विशेष आर्थिक क्षेत्राचे धोरण विविध प्रस्तावित उद्योगिक कॉरीडॉर आणि मोदीच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीलाच घृणास्पद भूसंपाद दुरुस्ती अध्यदेशाच्या माध्यमातून हे स्पष्टपणे दिसून येते. हे समजून न घेता भोळ्या मतदारांना नाममात्र जगण्याचे आमिष दाखवून समस्यावर मीट चोळले जात आहे. हे मतदात्याणी समजून घेणे गरजेचे आहे.
 यां पुढे बोलताना नवउदार कृषी धोरणाद्वारे शेतकरी वर्गाची पिळवणूक करून नफा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

त्या मुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या, प्रथम अनुदानात कपात करणे आणि कृषी निविष्ठाच्या उत्पादनात नफेखोर देशी विदेशी कॉर्पोरेटर्सना मुक्तद्वार दिल्ली आणि उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली. दुसरे परकीय वित्त भांडवलदाराच्या दबावाखाली शेतीमालाला कीफयतशीर हमी भाव देण्यास सातत्याने नकार, शेतकऱ्यांना आणखी उद्बस्त करणारे कृषी आयात धोरण, अनेक मुक्त व्यापार करार, शेतकऱ्यांना संस्थात्मक कृषी कर्ज मिळण्यातली अडचण आणि कार्पोर्सवर मात्र कर्जाची खैरात, या सर्वातून शेतकऱ्याची खाजगी सावकारावर असलेले अवलंबित वाढते. आणि तिसरी दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीची मालिका तसेच कीटक आणि वन्य प्राण्याचे हल्ले, शेतकऱ्याच्या नवे तर विमा कंपनीच्या फायद्याचा विचार केलेली बोगस पिक विमा योजना, सिंचन आणि विज यासाठीच्या सार्वजनिक गुंतवणूक होणारी कपात -शेतीवरील हल्ल्याचे मुख्य पैलू आहेत ची शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा आत्महत्या म्हणून मृत्यू आणि जमीन मिळवण्यास कारणीभूत ठरतात या धोरणाला खतपाणी घालत असल्याने शेतकरी शेतमजूर कष्टकरी वर्ग उद्ध्वस्त होत आहेत, मताचा जोगवा मागण्याचे काम होत असले तरी, कष्टकऱ्याच्या ध्येय धोरणाच्या उदारवादी धोरनाचे बळ फक्त सि पी आय विचार धारेत असल्यामुळे हा लढा आहे. त्या लढ्याला फाटा न फोळता लढा तेवत ठेवा असे कॉ. अनिल घनश्यामराव हेपट यांनी खरी लढाई लढण्या साठी मतांचा वर्षाव करण्याची मागणी केली.