वीजवितरण कंपनीच्या तकलादू धोरणाविरोधात मनसेचा 'झटका मोर्चा' तहसील कार्यालयावर धडकला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या गलथान कारभारविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव तालुक्याच्या वतीने पक्षनेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात आज मंगळवारला भर पावसात तहसील कार्यालयावर झटका मोर्चा काढण्यात आला. 
वीजवितरण कंपनीच्या ढेपाळलेल्या कारभाराचा कमालीचा मनस्ताप तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तर विजेच्या सतत च्या लपंडावाने शेतातील उभे पिके सुकल्या जात असून, सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होवून शेतकरी आर्थिक दृष्ठ्या मागे पडत आहे. सातत्याने विजेच्या खंडीत पुरवठ्याने छोटे-मोठे व्यवसायिक, जनताही कमालीची त्रस्त झाली असून यास नियंत्रित करण्यासाठी मनसे कडून आज मंगळवार ला संबंधित विभागाला "हाय होल्टेज झटका" मोर्चा च्या माध्यमातून देण्यात आला आहे.
शहरातील मार्डी चौकातून निघालेल्या भव्य झटका मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांनी संबंधित विभागाला दरम्यान,चांगलेच धारेवर धरल्याचे निदर्शनास आले असून लेखी आश्वासनानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. जन सामान्य व शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रशासनाने हयगय केल्यास मनसे गप्प बसणार नाहीत. या वेळी मारेगाव तालुक्यातील तमाम जनता, शेतकरी, शेतमजूर व असंख्य मनसैनिक या भव्य मोर्चात सहभागी झाले होते.