जल मिशनने गावाचे सौंदर्यीकरण व स्वास्थ बिघडवले- मच्छिन्द्रा येथील नागरिकांची ओरड

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अलिकडच्या वर्षांत सरकार जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी 'वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर' काम करत आहे. सर्वांसाठी घरे, प्रत्येक कुटुंबाला शौचालय, स्वयंपाकाचा गॅस, परवडणारी आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या विविध सरकारी योजनांमुळे लोकांच्या, विशेषत: खेड्यात राहणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्वांसाठी, रस्ते, इ. आणि आता, लोकांची आकांक्षा त्यांच्या घरात आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्यायोग्य नळ पाण्याचा पुरवठा आहे, जेणेकरून ग्रामीण-शहरी भेद दूर होईल. ग्रामीण भागाच्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन ची घोषणा केली.

त्या अनुषंगाने तालुक्यात जल जीवन मिशन 2024 पर्यंत प्रत्‍येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा दाबाने विहित गुणवत्‍तेच्‍या पुरेशा प्रमाणात नळपाणी पुरवठ्याची काम सुरु आहेत तर काही ठिकाणी पूर्णत्वावर आहेत. मात्र, मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मच्छिन्द्रा येथील नळ योजनेने गावाचे सौंदर्यीकरण संपूर्ण धोक्यात आणले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सर्व वार्ड निहाय खोदकाम करून नळ योजना राबविण्यात आली, परंतु अर्धवट कामे आणि नाली वरील मातीचे ढिगारे जशी च्या तशीच असल्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्यास बाधा होण्याच्या तक्रारी येथील काही नागरिक करित आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे आणखीनच ठिकठिकाणी चिखल, सांडपाणी साचून घसरपट्टी तयार झाल्याने अनेकांना आपले हातपाय मोडून जातील अशी भिती पायदळ जाताना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत 3,2 प्रभागातील जनतेनी वारंवार पदाधिकारी व कर्मचारी यांना सूचना, मागणी देखील करून सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करित असल्याचा आरोपही त्यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना केला आहे.

सरकारी योजना लोकांच्या फायद्यासाठीच आहेत, परंतु त्या योजना स्थानिक पदाधिकारी योग्य पद्धतीने राबविण्यात अपयशी ठरत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधिताशी चिरीमिरी करून व काम थातूर-मातुर करण्याची परंपरा येथील कर्मचाऱ्यांना असल्याचे अप्रत्यक्षरित्या नागरिकांतून बोलल्या जात आहे. त्यामुळे जल मिशन योजने ने गावाचे सौंदर्यीकरण धुळीस मिळवल्याचे आता ओरड होत आहे. गावोगावी पाहता विकास कामे झपाट्याने सुरु आहेत, मात्र मच्छिन्द्रा ग्रामपंचायत याला अपवाद ठरत असून गावातील अनेक समस्या जैसे थे आहे. आरोग्यच्या दृष्टीने सांडपाणी, रस्त्यावरील चिखल, शुद्ध पिण्याचा आरो प्लॅन्ट, सभोवताली वाढलेला कचऱ्याची विल्हेवाट लावावी व विशेष म्हणजे नळ योजनेच्या कामाची गुणवत्ता तपासणी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे.