पाटबंधारे विभागाने प्रकल्पाच्या नावावर शेतकर्‍यांचे स्वप्न केले भंग


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (३० ऑगस्ट) : आर्णी तालुक्यातील कवठा बाजार, कोसदनी, साकुर, मुकींदपुर , दोनवडा, या गावामध्ये सन १९८२- १९८३ साली अधरपुस प्रकल्पाचा नावाखाली भूसंपादन करुन सिंचन विभागाने ३८ वर्षात कुठल्याही सिंचनाचा येथील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. 
या भागातील ४३ शेतकर्‍यांच्या जमिनी अधर पुस प्रकल्पाचा नावावर सिंचन विभागाने प्रकल्पाच्या नावावर संपादित केल्या गेल्या होत्या पंरतु नाममात्र मोबदला देउन अतिशय उपजाऊ जमिनी अधिग्रहण केल्या गेल्या. पाटसंराचे पाणी शेताला मिळणार या आश्वासनावर शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या पंरतु ३८ वर्षात सिंचनाचे कुठलेही काम इथवर पोहचू शकले नाही.

या पाचही गावाचा भूभाग डोंगराळ असल्याने प्रकल्पाचे काम अथवा पाणी इथवर पोहचवण्यात असमर्थ आहोत असे सिंचन विभागाने आपले मत व्यक्त केले आहे. 
सतत च्या नापिकी व दुष्काळामुळे व सिंचनाचा लाभ मिळत नसल्याने येथील शेतकरी हतबल झाला असून या अधीग्रहणामुळे काही शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. 
(१)कवठा बाजार २९ एकर ९२ गुंठे , (२)मुकीदपुर ०९ एकर २१ गुंठे, (३)साकुर ८६ एकर ५६ गुंठे, (४)कोसदनी ३४ एकर ०२ गुंठे, (५)दोनवाडा १०० एकर ९१ गुंठे एकुण २६० एकर ६२ गुंठे 

 पाच गावातील अधिग्रहन करण्यात आलेली एकुण जमिन २६० एकर ६२ गुंठे सिंचन विभागाने प्रकल्पाच्या नावावर अधिग्रहण करुन शेतकर्‍यांना प्रकल्पाचा नावावर ठेगा दाखविला आहे.

काही शेतकरी तर भूमिहीन झाले आहे. येथील शेतकरी सनदशिर मार्ग अवलंबून या शेतकऱ्यांच्या जमिनी वरील शासनाचा हक्क काढुन आमच्या जमिनी आमच्या ताब्यात देण्यात याव्या अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्राद्वारे केली आहे.