वणी : केवळ निवडणुका पुरता लोकांत दिसायचे व पाच वर्ष गायब राहायचे असल्या इच्छूका पेक्षा चोवीस तास लोकांच्या हाकेला ओ देणारा वंचित चे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश पाते लोकांची पसंतीस सरस ठरत आहे. जनमानसात हरीश पाते च्या नेहमीच सक्रीय असण्याच्या कार्यवृत्तीमुळे जनता यावेळेस त्यांना आशाळभूत नजरेने पाहत आहे.
वणी विधानसभेत आमदार होण्यासाठी या निवडणुकीत अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहे. मात्र, यातील अनेक उमेदवारांना स्थानिक लोकांची जान नाही. आणि विशेष म्हणजे लोकहिताच्या प्रश्नांची त्यांना काही घेणेदेणे नाही. केवळ मते मागायची व आमदार व्हायचे हा एकमेव उद्देश घेऊन बहुतांश उमेदवार निवडणूक लढवित आहे. परंतु या भाऊगर्दीत स्थानिक जनतेसाठी नेहमीच तळमळीने धावून येणारा हरीश पाते यांच्या बद्दल लोकं आशादायी आहे.
वंचित मध्ये असतांनाही हरीश पाते सहानुभूती व तळमळीने लोकांचे प्रश्न सोडविण्यास समोर असतात. केवळ लोकांशी लोकांप्रती आपली सहानुभूती आहे. असा दिखावा ते करीत नाही. या उलट त्यांचे प्रश्न ते आत्मीयतेने सोडवित असतो. त्यांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालत असते. त्यामुळे हरीश पाते यांना एकदा तरी विधानसभेत पाठवायला हवे अशी चर्चा आता गावा शहरातील मतदार गांभीर्याने करीत आहे. यामुळे वंचित चे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश पाते यावेळेस मात्र कोणाचे गणित बिघडवणार हे येत्या 23 तारखेला कळणार आहे.