सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी विधानसभा मतदार संघात 'महाराष्ट्र ट्राईबल आघाडी' पक्ष हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत,आज (ता. 4) ला वणी येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. संतोष भादीकर, राष्ट्रीय संघटक श्री. संतोष चांदेकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गेली अनेक वर्ष आदिवासी समाजाचा वापर करून विविध पक्षांनी राजकीय पोळी शेकली. मात्र, त्याचा फायदा आजतागायत आदिवासी समाजाला तिळमात्र झालेला नाही असे, पक्षाचे उपाध्यक्ष संतोष भादीकर यांनी सभेला संबोधित करताना सांगितले. जो पर्यंत स्वतः चं राजकीय अस्तित्व निर्माण करत नाही तो पर्यंत कोणी आपल्याला विचारात घेत नाही असे, रोखठोक मत संघटक श्री.संतोष चांदेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
बैठकीला पांडुरंग पोयाम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष, महेश आत्राम यवतमाळ जिल्हा प्रचारक, प्रदिप जुमनाके वणी तालुकाध्यक्ष, सुदाम गावंडे वणी तालुका प्रचारक, सुनिता सालुरकर वणी तालुका महिला अध्यक्ष, रमेश मडावी वणी शहर अध्यक्ष, ज्योती मेश्राम वणी शहर महिला अध्यक्ष, अमोल कुमरे मारेगाव तालुका अध्यक्ष, गेडाम झरी-जामणी तालुका उपाध्यक्ष, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दरम्यान, अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली, त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये एक वेगळाच संचार दिसून आला आहे. पक्षाचे मुख्य टार्गेट वणी विधानसभा मतदार संघ असल्यामुळे यावेळी पक्षातील पदाधिकारी यांना कार्यान्वित करून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची सुचनाही देण्यात आल्या. वणी विधानसभाच नसून राज्यात पक्षाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अनेकजन पक्षात येण्यास ईच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठीने आगामी विधानसभा निवडणूक पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. संतोष भादीकर यांच्या खांद्यावर देणार असून, अॅड. संतोष भादीकर विधानसभा निवडणूक, लढणार असल्याचे संकेत दिले जात आहे, संतोष भादीकर यांची एका "पोल" नुसार वणी उपविभागात ट्राईबल मधून सर्वात अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे, पक्षातील पदाधिकारीही संतोष भादीकर हे मतदार संघांचे नेतृत्व करावे अशी, आशा व्यक्त करत आहे. त्यामुळे संतोष भादीकर हे आगामी वणी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. वकील साहेबांनी आपल्या राजकीय प्रवासात नवे पर्व सुरू करण्याचे निश्चित केले आहे.
प्रस्थापित सामाजिक व राजकिय व्यवस्थेद्वारे आदिवासींवर लादलेल्या मानसिक गुलामगिरीला नेस्तनाबूत करून आदिवासी सामाजिक व राजकिय अस्तित्व निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आदिवासी हेच खरे या देशाचे मुळनिवासी आहेत.हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आदिवासींचा सर्वांगीण विकास (राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक इत्यादी) करायचा असेल तर आदिवासींना राजकिय उलगुलान शिवाय तरणोपाय नाही. याकरीताच महाराष्ट्र ट्राईबल आघाडी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या राजकिय आखाड्यात उतरण्यास सज्ज आहे.
अॅॅड. संतोष भादिकरराष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र ट्राईबल आघाडी