सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
विविध योजने पासून वंचीत असलेल्या सभासदांच्या सण 1962 पासून भालेवाडी शेतकी सोसायटीच्या नावावर असलेल्या शेतीचे या संस्थेचे 30 सभासद वाहितीदार आहे. मात्र,या शेतजमिनीचा कायदेशीर फेरफार वाहितीदाराच्या नावाने झालेला नाही. ही शेत जमीन अजूनही भालेवाडी शेतकी सोसायटीच्या नावावर आहे. त्यामुळे वाहितीदार शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे वाहितीदार शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवा यासाठी त्यांना कायमस्वरूपी पट्याची आवश्यकता आहे. मात्र,गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रशासनाच्या दरबारी धुळखात आहे. त्यांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्यात यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या नेतृत्वात तहसीलदार उत्तम निलावाड यांना करण्यात आली आहे.
स्वतंत्र सात बारा नसल्यामुळे होणाऱ्या नुकसानभरपाईला सामोरे जावे लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. करिता 30 सभासदांना शेताचे पट्टे देऊन स्वतंत्र 7/12 देण्यात यावा, अशी याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच येत्या 15 दिवसांत न्याय न मिळाल्यास आपल्या परिवारासोबत तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.
निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, अध्यक्ष तालुका कांग्रेसचे मारोती गौरकार, नगरसेवक शंकर मडावी, अंकुश माफूर, विलास वासाडे, प्रफुल विखणकर, बळीराम आस्वले, सुधाकर आत्राम, मारोती सोमलकर, मुरलीधर जुमनाके, जनार्धन गाडगे, भीमराव जांभूळकर, इत्यादी उपस्थित होते.