शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी वणीत शिवसेनाचा मशाल मोर्चा

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शिवसेना (उबाठा) गटाच्यावतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांना घेऊन सोमवारी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात वणीत मशाल मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला संबोधित करण्यासाठी शिवसेचे आमदार तथा विदर्भ संपर्कप्रमुख भास्कर जाधव हे वणीत आले होते. मार्गदर्शक अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित केला होता. यावेळी भास्कर जाधव यांनी भाजप सरकार च्या मनमानी धोरणाविरोधात जोरदार कडाडून टिका केली. कापसाला 12 हजार रूपये हमीभाव द्यावा, सोयाबीनला नऊ हजार रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, शेतीकरिता दिवसा तास विज पुरवठा, वन्य प्राण्यामुळे होणारा त्रास, या प्रमुख मागण्यांना घेऊन या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, वणी विधानसभा संपर्कप्रमुख विजयानंद पेडनेकर, युवा सेना सेना जिल्ह जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे, युवासेना माजी जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, विधानसभा संघटक सुनील कातकडे, तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी, तालुका प्रमुख चंद्रकांत घुग्गुल, युवा सेना उपतालुका प्रमुख आयुष ठाकरे, युवा सेना तालुका प्रमुख मयूर ठाकरे, युवा सेना तालुका प्रमुख निलेश बेलेकर, उपशहर प्रमुख महेश चौधरी, विशाल आवारी, गणपत लेडांगे, अनुप चटप, किरण नांदेकर, जिल्हा संघटिका योगिता मोहोळ, तालुका संघटिका सीमा आवारी, लालगुडा सरपंच गीता उपरे, मारेगावच्या गटनेत्या वर्षा किंगरे, माजी पंचायत समिती सदस्य प्रणिता घुग्गुल, महिला तालुका संघटिका सुनीता भोयर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनिता मस्की, महिला शहर प्रमुख सविता आवारी, अलका गेडाम, डॉ मनिष मस्की, पंकज नेहारे, मारेगाव नगरसेविका माला बदकी, शिवसैनिक, युवासेना कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.