शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करा - डॉ. मनिष मस्की

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अवकाळी पावसाने खरीपसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने सरसकट शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावे असे नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की म्हणाले. तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानी संदर्भात तहसीलदार निलावाड यांना काल निवेदन देण्यात आले, त्यानंतर सह्याद्री चौफेरशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी सुनील गेडाम, जीवन काळे, विजय अवताडे, राजू मोरे, पंकज बलकी, प्रियंका देवाळकर, सोमेश्वर गेडेकर, संभा टोंगे, किसन मत्ते यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करणे हे सरकारचं कर्तव्य आहे, तालुक्यात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला, यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरसकट नुकसान मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

 त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून हेक्टरी २५०००/- रुपये द्यावे, मागील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्वरित द्यावी, पिक विम्याची पूर्ण भरपाई सुद्धा तत्काळ देण्यात यावी, तसेच सी.सी.आय. कापूस खरेदी सुरु करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा दिलेल्या निवेदनातून सरकार ला करण्यात आली.