Page

शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट; मारेगावातील शेतकरी पुन्हा संकटात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याने शेतात अन्नधान्य पिकवलं नाही तर आपण काय खाणार? अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी योग्य पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा व्हायला हवा. अर्थात तो त्यांचा अधिकारच आहे. मारेगाव तालुक्यात सातत्याने शेतकरी आत्महत्याचे प्रमाण दिवासेंदिवस वाढत असून आस्मानी संकट, ओला आणि कोरडा दुष्काळ यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या दोन ते तीन वर्षात नाजूक झालीय. या दरम्यान, मारेगावातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीजबिलाच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांच्या शेतातील वीज महावितरणाकडून कापली गेली. वीजपंपाची वीज कापली गेल्यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्येवर राज्य अन्न आयोगाने मोठा निकाल जाहीर केला आहे. की, या निकालातून अन्न आयोगाने महावितरणाला शेतकऱ्याच्या शेतातली वीज न कापण्याची सूचना वजा आदेशच दिला आहे. त्यामुळे महावितरणाला आता शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापता येणार नाही. अन्न सुरक्षा आयोगाने महावितरणाला शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापू नये, असा आदेश दिला असतांना देखील मारेगावातील जवळपास 20 ते 25 शेतकऱ्यांची वीजबीलाच्या मुद्द्यावरून कोणतीही पूर्व सूचना न देता नवरगाव फिडर मधून विद्युत प्रवाह होणारी वीज कापली असल्याने रेस्ट हाऊस परिसरातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कट केल्यानंतर संबंधित विभागाला शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु तो सपशेल फेल ठरला आहे. त्यामुळे आपली व्यथा "सह्याद्री चौफेर" मांडली. परिणामी गेल्या पंधरा दिवसापासून आम्हाला शेतातील उत्पादनाला पाणी मिळालं नाही किंबहुना वीज अभावी पाणी देता आले नसल्याने पिकासह जनावरांचा चारा करपण्याच्या मार्गांवर आहे. हे संभाव्य नुकसान भरपाई कोण? देणार असा थेट प्रश्न उपस्थित केला जात असून झालेल्या नुकसान भरपाई ची व खंडीत वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यावी या मागणीला घेऊन आम्ही सर्व शेतकरी खासदार आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना करणार असल्याचे यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले. दरम्यान, आमच्या प्रतिनिधीनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.