चंद्रपूर जिल्हा आम आदमी पार्टीचा "महाराष्ट्र बंद "मध्ये सक्रिय सहभाग


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१२ ऑक्टो.) : केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांना पहिल्या दिवसां पासूनच आम आदमी पार्टीने तीव्र विरोध केलेला आहे. या सरकारने तीन काळे कायदे त्वरीत रद्द करावे व उत्तरप्रदेशाच्या लखीमपूर खिरी मधील आंदाेलक शेतक-यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज साेमवार दि.११ ऑक्टाेंबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंद मध्ये आम आदमी पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढून सुरु असलेली व्यापा-यांची काही दुकाने बंद केली. लखीमपुर खिरी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने अंगावर गाडी घातल्यामुळे शहीद व जखमी झालेले शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी तसेच भाजपा सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावेत यासाठी "महाराष्ट्र बंद" मध्ये आम आदमी पार्टीने सक्रिय सहभाग घेतला. आजच्या बंद मध्ये मार्कसवादी काॅम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, भ्रष्टाचार विरोधी न्यास भारतीय किसान सभा यांनी ही आपला सहभाग नोंदविला.

या वेळी आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, राजेश चेडगुलवार जिल्हा महानगर सोशल मीडिया हेड, भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, सूनिल भोयर महानगर संघटन मंत्री व इंचार्ज राजू कुडे सचिव महानगर, विकास खाडे सहसचिव घुग्गुस, सागर बिऱ्हाडे, सोनू शेट्टीवार, आशिष पाझारे, योगेश आपटे उपाध्यक्ष,राजू कुडे सचिव, परमजित सिंघ झगडे, आप जिल्हा संघटन मंत्री, सोनल पाटील भद्रावती तालुकाध्यक्ष, अमित बोरकर घुग्गुस शहर अध्यक्ष, शंकर धुमाळे ऑटो जिल्हाध्यक्ष, अजय डुकरे, जेष्ठ कार्यकर्ता वामनराव नंदूरकर, जेष्ठ कार्यकर्ते मधुकरराव साखरकर, अशरफ भाई, अभिषेक सपळी, सुमित हस्तक, निखिल बारसागडे, राहील बेग, अंकुश राजूरकर, महेश सिंघ, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.