वणी : आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी एकता महोत्सवाचे आयोजन बिरसा ब्रिगेड वणी शाखेच्या वतीने (ता.18) ऑगस्ट रोजी स्थानिक एसबि लॉन येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन सुरेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. गजानन मेश्राम,तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ मुंबई संचालक संजय खाडे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, कवी उत्तम गेडाम, सामाजिक कार्यकर्ते प्रीतम राजगडकर, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण मडावी, सामाजिक कार्यकर्ते विजय गेडाम, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना किनाके, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी अंजीकर यवतमाळ, दिलीप शेडमाके जि. अ. गों.ग.पा., विठ्ठल उईके सामाजिक कार्यकर्ते, चेतन कुळमेथे प्रदेश अध्यक्ष गोंडवाना जंगम दल, नामदेव कोडापे सामाजिक कार्यकर्ते, निलेश पंधरे जि.स बि. ब्रि., सुरज आत्राम जि.अ. बि. ब्रि. वर्धा, शेषराज मडावी बि. ब्रि.ता.अ.मारेगाव, योगेश रायपुरे, जि.अ.भि. टा. से., मारोती दादा कुसराम सामाजिक कार्यकर्ते, तुळशीराम पेंदोर सामाजिक कार्यकर्ते, मोरेश्वर गेडाम सामाजिक कार्यकर्ते, मंगेश उईके ग्रा.पं.सदस्य बोटोणी, विशाल वाघ गो.ग.पा. ओबीसी सेल जि अध्यक्ष, जयसिंग कांबळे सामाजिक कार्यकर्ते वणी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत तसेच औक्षवंण केले, त्यानंतर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, रॉबिन हूड शामादादा कोलाम व इतर क्रांतिकारीकारक महामानवांना पुष्पहार हारार्पण दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविविकेतून कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुधाकर चांदेकर यांनी आदिवासी समाजाच्या व्यथा मांडल्या, उदघाटनपर भाषणात सुरेश काकडे यांनी अडल्या नडल्यांच्या समस्या मार्गी लावू असे अभिवचन दिले. संजय खाडे यांनी कार्यक्रम व आयोजकांचे भरभरून कौतुक केले. तसेच इतरही मान्यवरांनी आपल्या भाषणातून या दिनानिमित्त अमूल्य विचार मांडले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 10 वी 12 वी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशासनातील अधिकारी तसेच कर्मचारी,पालक यांचा देखील मंचावर जाहीर सत्कार करण्यात आला.
दुपारी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आदिवासी नृत्य, ठेमसा नृत्य, गोंडी नृत्यांचा समावेश होता. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ पारितोषिक सहभागी स्पर्धेकांना देण्यात आली. यावेळी वणी मारेगाव झरी जामणी येथील प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विनोद आदे यांनी तर, आभार शेषराज मडावी यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वीकरण्यासाठी संजय मडावी, विनोद आत्राम, डॉ चांदेकर, दिनेश आत्राम, कवडू उईके, स्वप्नील आत्राम, चंदू मडावी, प्रवीण आत्राम, हंसराज भादीकर, गोविंदा आत्राम, संतोष कुळसंगे, रंजना तोडसाम, चंदा किनाके, यांनी परिश्रम घेतले.