Page

मतदार राजा म्हणते आता ढिसाळ नियोजन नको; राजकीय जाणकार काय सांगतात!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारात तेजी आल्याचे दिसून येत आहे. 

वणी मारेगाव झरी तालुक्यात सभा, बैठका, कॉर्नर सभा, भेटीगाठी अगदी पद्धतशिर सुरू आहे. मात्र, जास्तच अविर्भावात गेलेल्या आघाडी चे प्रचारात नियोजन ढिसाळ असल्याचे चर्चा आहे. ताजे आणि उत्तम उदाहरण म्हटलं तर वणीतील केतकर यांची सभा. आघाडी आणि मित्र पक्षातील मातब्बर लोकं संधी साधू असल्याचे बोलल्या जाते. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काही करत नाही. आणि मिळालेच की ते केव्हा कुणाचा गेम करतील याचा नेम नाही, दिवसभर वातावरण ताईंचे आहे असे सांगून रात्रीतून भाऊंची हवा बनवून टाकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

विशेष म्हणजे ताईंनी शेवट च्या घडीला खर्चिक हात आखूड केल्याने अनेकांची गाडी आदळआपट होत आहे. एवढेच नाहीतर कोणीतरी कान भरल्याने माध्यमापासून फारकत एकदमच घेतल्याची चर्चा आहे. लोकांमध्ये भावनिक वातावरण असल्यामुळे आपण सहजच जिंकू अशी बेसावध संकल्पना मेहनती वर पाणी फेरू नये यासाठी प्रचार माध्यमातून कंटिन्यू असणं आवश्यक आहे, पण तसं काही दिसत नाही. प्रचार प्रसार अपडेट्स असायला हवा नाहीतर चित्र वेगळंच दिसते, असे राजकीय जाणकार सांगतात.

एरवी निवडणूकीत "जिधर दम उधर हम" अशी पद्धत झाली आहे. तुम्ही कितीही पटवून सांगा, पायापोटी लागा, खाऊ पेवू घाला, गुण  त्याचेच गाईल जो शेवटी कामी पडला. कित्येकांनी शेवटच्या क्षणी दृढ विश्वास असणाऱ्यांचे गणित बिघडवले आहे, त्यांचा फार्मुला एकच 'slow but sure' धिमा पण निश्चित. याप्रमाणे प्रतिस्पर्धीचे काम चालू असल्याचे चर्चेत आहे. मतदानाला केवळ आणि केवळ पाच दिवस आहे. तूर्तास ज्याने दाबून जोर लावला, त्याने गड जिंकला अशी चर्चा जोर धरत आहे.