Page

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीरः ११ मतदारसंघात दिली 'ही' उमेदवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले असले तरी आज पुन्हा या निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या दुसऱ्या यादीत हिंगोली, जालना, लातूर, सातारा, सोलापूर, माढा आदी मतदारसंघांचा समावेश आहे.

या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीशी युती करून निवडणुकीला सामोरे जाईल, असे वाटत असतानाच 'वंचित'ची मविआशी बोलणी फिस्कटली आणि पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या एक दिवसआधी पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती.

वंचितने पहिली यादी जाहीर केल्यानंतरही वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाची शक्यता धुसर झाल्याचे मानले जात होते. परंतु खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीच महाविकास आघाडीशी चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, असे सांगितले होते. त्याला दोन दिवसही उलटले नाही तोच आज वंचितची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीतील उमेदवार :


लोकसभा निवडणुक अन चमचेगीरांची लुडबुड...!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
  
वणी : देशात लोकशाही महोत्सवाला अगदी थाटात सुरुवात झाली आहे. दि.27 मार्च पर्यंत उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन दाखल करून लोकसभेच्या मैदानात दंड थोपटले आहे.जसा खोगीर कसलेला घोडा मैदानात उभा झाला आहे, तसा या घोडया पेक्षा खोगीर मोठया प्रमाणात उड्या मारताना दिसून येत आहे. 

निवडणूक मैदानात उडी घेण्याची 27 मार्च पर्यंत मुदत होती. या मैदानात उड्या मारण्यासाठी खोगिरानाहीं संधी होती.मात्र त्यांनी ही संधी बिनशर्त सोडली आहे.या कालावधीत केवळ 36 जणांनी उडी घेतली होती, मात्र निवडणूक रिंगणातील 15 लोकांची शक्ती पाहून इतरांनी आपली माघारी घेतली आहे कोणत्याही मैदानातील खेळात हार जीत हे ठरलेला भाग असताना रिंगणात उडी मारून आपली ताकद आजमावणे हे खेळाडूचे कर्त्यव्य आहे. 

विशेष म्हणजे जीखेळाडू मैदानात दंड थोपटून उभे आहेत त्यांना लोकशाही मोहोत्सवात रंग उधळण्याचा अधिकार आहे. आता मात्र, माघार घेण्याची संधी हुकली असून यापलीकडे कोणालाही हा मैदान सोडून पळ काढता येणारच नाही. या सामन्यात उडी घेण्यासाठी कसरत व अभ्यास करावा लागतो यानंतरच तो कसोटीवर खरा उतरतो आहे.या सामन्यामध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर, महायुतीचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार तथा वंचीत बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांचे सह 12 खेळाडू कायम आहे. 

दरम्यानच्या काळात चमचेगीरांची फौज इकडून तिकडे लुडबुड करताना दिसून येत आहे. पक्षाच्या निष्ठावंताना या चमचेगिरानी मागे टाकले असून सोशल मिडिया वर तर यांनी चांगलीच धूम्माकूळ घातला आहे.या रिकाम टेकड्यापायी  त्रस्त असून हा उसने तत्वज्ञान सोशल मिडियावर फिरवताना आढळून येत आहे. डाव साधण्यासाठी सुरु असलेली मेहनत निष्ठावंत ओळखून आहेत.दिवसा एका पक्षात तर रात्री दुसऱ्या पक्षात हा अनेकांना आढळून येत आहे.

"तोंड लपवून तत्वज्ञानाची खैरात" या पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिसू नये म्हणून त्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना तोंड लपवून आपल्या बेचव ज्ञानाची खैरात वाटत फिरताना दिसत आहे.गाडी एकाची आणि भोजन दुसऱ्याचे खाण्यासाठी हा चमचेगीर तालुक्यात शहरापासून ग्रामीण भागात भटकंताना दिसत आहे. मात्र निवडणूक कालावधी कोणालाही दुखावता येत नाही या करणाखाली त्याची चलती दिसून येत आहे.

लालपुलिया कोल डेपोतील कोळसा आगीने भस्मसात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरालगतच्या लालपुलीया परिसरातील फ्युल कॉरपेरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या डेपो मधील कोळशाच्या साठ्याला भीषण आग लागून जवळपास दहा हजार टनाच्या वर कोळसा जळून खाक झाला असून आणखीन येथील ढिगाऱ्यामध्ये प्रचंड आग धगधगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यवतमाळ रोडवरील लालपुलिया परिसरात मोठ्या प्रमाणात  कोल डेपो आहेत. मात्र, येथील कोळशाच्या ढिगाऱ्याला आग लागनेही नित्याची बाब आहे, उन्हाळ्यात कडक तापमान तपत असते, किंबहुना कोळसा हा ज्वलनशिल पदार्थ असल्याने दगडी कोळशाला लगेच आग लागते. त्यामुळे येथील कोलडेपो धारक सातत्याने अशी आग वीजवून कोळसा पसरवून त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने आगीवर नियंत्रण करीत असतात. परंतु मागील चार दिवसापूर्वी मंगळवार 26 मार्च रोजी वातावरणात बदल होवून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सारी आल्या होत्या, त्यामुळे येथील साठा असलेल्या कोळशाला आतून असलेली आग व दरम्यान पडलेल्या पावसाच्या हलक्या सरीने कोळशाला आतमध्ये गॅस तयार होऊन चक्क येथील साठ्याला भीषण आगीने कोळशाला कवेत घेत किमान उपलब्ध साठे जळून खाक होत असल्याचा असा अंदाज वर्तविला जात आहे.

कोल डेपोत चार दिवसापासून अग्निशमन दलाच्या व शेकडो पाणी टँकरच्या सहाय्याने भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी फ्युल कॉरपेरेशन ऑफ इंडिया (FCI) कंपनीकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत आहे व अजूनही कोळशाचे साठे आगीतच आहे. प्रशासनाकडून सहकार्य मिळत असून कोल डेपो ला आग लागणे ही नैसर्गिक बाब असून कंपनीचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे फ्युल कॉरपेरेशन ऑफ इंडिया कंपनीचे मॅनेजर शाम शर्मा यांनी सांगितले.

तरुणाने स्ट्रीट लाईट पोलला दोरीच्या साहाय्याने घेतला गळफास

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोरा येथे एका तरुणाने गावातील स्ट्रीट लाईट पोलवर चढुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज रविवार ला सकाळी उघडकीस आली.

स्वप्निल सुधाकर भोंगळे (29) रा.भालर, असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आई सोबत राहुन मजुरीचे काम करीत असल्याचे समजते.

काल शनिवारी 30 मार्च 2024 रोजी रात्रीचे दरम्यान चक्क स्ट्रीट लाईटच्या पोल वर चढून दोरीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

गावातील पोलिस पाटीलांनी शिरपूर पोलिस स्टेशन येथे घटनेची माहीती दिली. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.

राज्यात आघाडीच्या बिघाडीला दोष कुणाचा?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभेच्या निवडणूक मैदानात महाराष्ट्राच्या 48 जगावर महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढणार असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. काँग्रेस शिवसेना,राष्ट्रवादी,या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी निर्माण केली होती. मात्र जागा वाटपा वरून आघाडीत बिघाडी झाल्याची सत्यता उघड झाली आहे.5 जागा वरून काँग्रेस शिवसेना आघाडी कोंडीत सापडली आहे.निवडणुकीच्या पहिल्यां टप्प्यापर्यंत तरी हीं कोंडी निश्चिपने फुटेल अशी शक्यता होती.मात्र तसे घडले नाही.दोनही पक्षाची 5 जागावर जोरदार रस्सीखेच असून तोडगा निघत नसल्याने काँग्रेस,शिवसेना दोनही मित्र पक्षाचे उमेदवार आमणे सामाने लढणार आहे.त्यामुळे आता या आघाडीच्या बिघाडीला दोष कुणाचा?या प्रश्नाच्या उत्तरासाठी कार्यकर्त्यां मध्ये घमासान सुरु झाले आहे.जागा वाटपा वरून काँग्रेस व सेनेत बिनसल आहे.हे सत्य नाकारून चालत नाही. 5 जगावर समझोता झाला नसल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा फार्म्यूला हायकमांडने मंजूर केला आहे.

हायकमांड कडून मंजूर झालेल्या फार्म्यूल्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रात महाविकास आघाडीत बिघाडी झाला आहे.या 5 जागाच्या मतदार संघात मतांची विभागणी अटळ आहे.मित्रच मित्राच्या आमने सामने दंड थोपटणार आहे.याचा फायदा निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारांना होईल हे निर्वाद सत्य कोणीही नाकारू शकत नाही.अडेलटट्टू धोरणामुळे 5 जागाचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण?नेते की कार्यकर्ते असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.महाविकास आघाडीला खरंच महायुतीला टक्कर द्यायची आहे का? जर उदिष्ट मोदीजीला हरवायचे आहे तर इंडिया आघाडीत एकजूट आवश्यक आहे.आणि तेच उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात महाविकास आघाडी उदयास आली होती. महायुतीला शह देईल असे वातावरणहीं पहिल्यांदा निर्माण झाले होते.मात्र आपण हरलो तरी चालेल पण जागेचा हट्ट सोडायचा नाही हीं भूमिका महाविकास आघाडीत पाहायला मिळाली आहे.या अट्टाहासापायी नुकसान दोनही मित्र पक्षाचे होईल हे कोण्या भविष्यकाराला विचारण्याची गरज नाही.या 5 जागेच्या दाव्यावरुन कोणीच माघार घेण्यास तयार नाही.हे आता स्पष्ट झाले आहे.

आघाडीचा धर्म सर्वानी पाळायला पाहिजे अस काँग्रेस म्हणत असली तरी समझोत्या शिवाय शिवसेना (उबाठा) कडून उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला असा मुद्दा काँग्रेस मधून ऐकायला मिळत आहे.आता महाविकास आघाडीत असंतोषाचे वातावरण पेटले आहे.याचा विपरीत परिणाम सम्पूर्ण मतदार संघावर होणार आहे.त्यामुळे आम्ही सम्पूर्ण जागा जिंकू असे म्हणणे बालिशपणाचे ठरेल की काय असे चित्र सद्या तरी दिसून येत आहे.शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत या आघाडीचे नेतृत्व करीत आहे.वाटघाटी मध्ये ते सदा अग्रेसर असल्याचे सर्वांना पाहायला मिळत आहे.त्यामुळे निश्चितच जय,पराजयाचा ठपका त्यांचेवर लागणार आहे.उमेदवारीवारी वरून झालेल्या बैठकाचे नेतृत्व त्यांनीच केल्याचे वास्तव कोणीच नाकारू शकत नाही.प्रसार माध्यमाशीहीं संवाद साधताना ते पुढेच असायचे हे सर्वांनीच बघितलं आहे.सर्व सुरळीत चालले आहे. समाधानकारक,सकारात्मक चर्चा झाल्याचे तेच जाहीर करून टाकत होते.आता मात्र सर्व उलटे काटे फिरताना दिसून येत आहे.त्यामुळे या आघाडीच्या बिघाडीला दोष कुणाचा? हे निवडणूक निकाला नंतर उघड होणार आहे.

अवकाळी पावसाने झोडपले; घरावरील टिनपत्रे उडाली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने मारेगाव तालुक्याला झोडपले असून अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याची घटना घडली आहे. 

तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या कोसारा गावात या अवकाळीचा जोरदार फटका बसला असून, अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली तसेच विद्युतची तार तुटली असून विद्युत खांबासह डीपी सुध्दा कोसळली असल्याची माहिती आहे. 
मात्र, वृत्त लिहेपर्यंत कुठलिही जिवीतहानी झाली नाही. हा पाऊस जवळपास सायंकाळी 7 वाजताचे सुमारास बरसला आहे. शेतशिवारातून बहुतेक नागरिक घरी पोहचल्यानंतर पावसाची सुरुवात झाली होती. हा अवकाळी पाऊस तालुक्यात बहुतांश बरसला असून रस्त्याबाजूचे झाडें झूडपी कोसळल्याची घटना घडली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर- 53 पैकी 26, भंडारा-गोंदिया- 40 पैकी 22, गडचिरोली-चिमूर- 12 पैकी 12, चंद्रपूर- 35 पैकी 15 आणि रामटेक लोकसभा मतदार संघात 41 पैकी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 ही असून या मतदार संघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होईल.

चंद्रपूर येथे सामान्य निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

नियोजन सभागृह येथे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक श्री. जाटव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सहायक जिल्हाधिकारी (आर्णी) सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

लोकेशकुमार जाटव म्हणाले, निवडणुकीसाठी मतदानाचे साहित्य घेऊन जाताना डिस्पॅच सेंटरमध्ये आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ ठेवावे. तसेच संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना वैयक्तिक मॅसेज जाणे आवश्यक आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम गोळा करताना अतिशय दक्ष राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी सादरीकरण करताना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी, जिल्ह्याचा आढावा, मतदान प्रक्रियेमध्ये असलेले मनुष्यबळ व्यवस्थापन, अधिकारी-कर्मचा-यांचे प्रशिक्षण, साहित्य व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र सुरक्षा व व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक खर्च व्यवस्थापन, मतपत्रिका, पोस्टल बॅलेट, मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण केंद्र, सी – व्हीजील ॲप, 85 वर्षांवरील व्यक्तींना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना गृहमतदानाची सुविधा आदींबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.

बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

दिव्यांग आनंदने उपसरपंच अनिल डोंगरे यांचे मानले आभार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : दिव्यांग आनंद साव यांना नुकतीच मुंबई येथील आयकर विभागात नोकरी मिळाली. दिव्यांग आनंद साव याला सात आठ महिन्यापूर्वी क्षय रोगाने ग्रासले होते. त्यावेळी त्याला त्याच्या इलाजासोबत पोषक आहाराची सक्त गरज होती. दिव्यांग आनंद चे वडील वृद्ध व त्यांची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्यामुळे ते त्याला पाहिजे तसा पोशाख आहार देऊ शकत नव्हते, ही बाब आरोग्य विभागाच्या लक्षात आली असता त्यांनी श्री.अनिल डोंगरे  उपसरपंच यांना माहिती दिली. श्री.डोंगरे यांनी लगेच दिव्यांग आनंद साव ला सहा महिन्याचा पोषक आहार देण्याची जबाबदारी घेतली. त्या पोषक आहारामुळे दिव्यांग आनंद ची तब्येत सुदृढ झाली आणि आयकर विभागाच्या नोकरी करिता चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागला त्याने आयकर विभागाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून पास झाला.

दिव्यांग आनंद ने नोकरी मिळवली,मुंबईवरून आपल्या गावाला परत आल्यावर आनंद साव ने लगेच श्री.अनिल  डोंगरे यांचे घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली त्यांना मिठाई देऊन त्यांचे आभार व धन्यवाद मानले. आपण नेहमीच दिव्यांग असो की गरीब,निराधार व्यक्ती असो त्याच्या मदतीला धावून येतात माझ्या तब्बेतीची वेळी आपण धावून आले, मला मदत केली त्यामुळे मी अभ्यास करू शकलो व मी नोकरी मिळू शकलो, जर माझ्या तब्बेतीची वेळी आपण धावून आले नसता तर, कदाचित नोकरीच्या परीक्षेसाठी मी बसू शकलो नसतो. नोकरी साठी पात्र ठरू शकलो नसतो असे, यावेळी दिव्यांग आनंद साव ने त्यांच्या भेटी दरम्यान बोलून दाखवले.

एक दिव्यांग व्यक्ती आपण केलेल्या मदतीच्या कार्यातून धन्यवाद आभार मानते, यासारखे दुसरे पुण्याचे मोठे कार्य असू शकत नाही. माझ्या मनाला खूप समाधान वाटले असेच माझ्या हातून नेहमी सेवेचे कार्य होत राहणार असे श्री.अनिल भाऊ डोंगरे यांनी यावेळी सांगितले.

राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सहात साजरी


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : "शेतकऱ्यांना बी, बियाणे, शेतसारा कमी ठेवणे, दुष्काळात शेत सारा माफ करणे, शेतमालाचा देठा लाही हात न लावण्याचे फर्मान काढणे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मुसक्या बांधून कठोर दंड देणे, गुलामांचा व्यापारावर बंदी म्हणजेच वेठबिगार, कष्टकऱ्यांचे शोषण बंद करणे, सर्व धर्मांना समान लेखणे आणि आपल्या सैन्यात बरोबरीचे स्थान देणे, कारभारात सामावून घेणे हे या छत्रपती शिवरायांचा कार्यामुळे रयतेला हे राज्य स्वतःचे आहे असे वाटायचे त्यामुळे त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार असायचे, परंतु आज लोकशाही मध्ये निवडून दिलेले राज्यकर्ते मात्र जातीभेद, धर्मांधता, महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणे, त्यांच्यावर कार्यवाही न करणे, शेतकरी विरोधी, कामगार विरोधी कायदे करणे असे दुष्कृत्य करताना दिसत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आजचा लोकशाही लाही लाजवतील असे महान कार्य असल्याने आज लोकशाहीत सुद्धा त्यांचा जयजयकार होतो आहे." असा सूर काल राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथी प्रमाणे केल्या गेलेल्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या वक्त्यांनी काढला.

या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यवतमाळ जि. म. बँक लि. चे उपाध्यक्ष संजय देरकर तर अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य संघदीप भगत तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे अजिंक्य शेंडे, मा. उपसरपंच अशोक भगत, माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी, मा. सरपंच प्रणिता असलम, ग्रा. प. सदस्य अमर तितरे, बबिता सिंग, रेहाना सिद्दीकी,ओम चिमुरकर व पत्रकार अजय कंडेवार उपस्थित होते.
या वेळेस संजयभाऊ देरकर, संघदीप भगत, कुमार मोहरमपुरी, अजय कंडेवार यांनी विचार मांडले. 
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा व त्यांचा जीवनावर वक्तव्य असे स्पर्धेचे स्वरूप होते.या स्पर्धेत प्रथम पुरस्कार कु. लावण्या मारोती पुनवटकर, द्वितीय शाश्वत फुलझेले, तृतीय प्रतीक अमर सोलंकी तर प्रोत्साहन म्हणून अंशिका नंदकिशोर लोहकरे व लावण्या न. लोहकरे यांनी पटकाविले. 

या कार्यक्रमात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या प्रज्ञा मा. पुनवटकर यांचाही गौरव व सत्कार करण्यात आला. यावेळेस सुमधुर गीत गायन व क्लासिकल नृत्याचा सूर संगीतमय कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे संचालन सन्मान स्त्री शक्तीचा उपाध्यक्ष दिशा अमृत फुलझेले यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी युवा सेना शाखा प्रमुख अमृत फुलझेले, अभिजित सुरसे, सिनू दासारी, प्रफुल पाटील, आकाश जोगदंडे, बंडू मोडक, आकाश बोलगमवार, सचिन भालेराव, नामदेव व अन्य प्रभागातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

मारेगाव : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक वाहनावर आज शुक्रवारी (दि.29) महसूल पथकाने जप्तीची कारवाई केली. यावेळी रॉयल्टी न आढळल्याने महसूल पथकाने ट्रकसह रेती जप्त केली.

अवैध रेती वाहतुकीला आळा बसावा, यासाठी मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी हे पथक मार्डी परिसरात ग्रस्त घालत होते. यावेळी मालवाहतुक करणारा ट्रक क्र. (एम एच 27 बी एक्स 4559) तपासला असता रेती वाहतूक होत असल्याचे मार्डी ते मजरा रस्त्यावर आढळून आले. यावेळी वाहन चालक याच्याकडे कागदपत्र्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, तो काहीच बोलायला तयार नसल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज सकाळी दोन तास चाललेल्या कारवाई दरम्यान,कागदपत्र्यात तफावत आढळल्याने पथकाने रेतीसह ट्रक ताब्यात घेऊन जप्ती ची कारवाई केली व रेती सह ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. ही कारवाई मंडळ अधिकारी अमोल गुघाने मारेगाव, तलाठी कुळमेथे, तलाठी मडावी, तलाठी सोयाम, कोतवाल भोंगळे, कोयचाडे, येवले यांनी केली.

अभिकर्ता राजेश पुण्यानी यांचे अपघाती निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मारेगावहून दैनिक बचतीचे कलेक्शन आटपवून वणी कडे परत येत असताना मंगरूळ (रोड) जवळ रात्री साडे आठ वा. च्या दरम्यान अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने दैनिक बचत अभिकर्त्याचे नागपूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राजेश नरसिंग पुण्यानी (53) असे अपघातात निधन झालेल्या दैनिक बचत अभिकर्त्याचे नाव आहे. ते अनेक वर्षापासून दैनिक बचत वसुली अभिकर्ता म्हणून विविध पतसंस्थामध्ये, तसेच वणी येथील दैनिक बचत अभिकर्ता म्हणून परिचित होते. 

काल गुरुवारी नेहमीप्रमाणे राजूर, वणी येथील खातेदारांची जमा रक्कम कलेक्शन करून मारेगाव वरून वणी परतत असताना त्यांना अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली असा कयास आहे. यात राजेश खाली पडले व गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना मांगरूळ जवळ घडली असून दरम्यान,लोकांनी त्याला प्रथम मारेगाव येथे व नंतर वणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविले, मात्र त्यांचा रात्रीच मृत्यू झाला. 

राजेश यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

सामान्य निवडणूक निरीक्षकांची चंद्रपूर येथील मिडीया सेंटरला भेट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेड न्यूज, फेक न्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कार्य जिल्हा माहिती कार्यालयाच्या मिडीया सेंटर येथून सुरू असून या सेंटरला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कार्यकारी अभियंता तथा निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी मुकेशकुमार टांगले उपस्थित होते.

यावेळी श्री. जाटव यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि सोशल मिडीयाच्या मॉनेटरिंगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच सोशल मिडीयावर करण्यात येणा-या पोस्टबाबत अतिशय गांभिर्याने लक्ष ठेवावे, वृत्तपत्रात पेडन्यूज तसेच फेकन्यूज प्रकाशित झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. प्रमाणीकरणासाठी उमेदवारांचे अर्ज किती दिवसात निकाली काढल्या जातात, याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच फाईल्सची पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीचे कार्यपध्दती तसेच मिडीया सेंटर बाबत सामान्य निवडणूक निरीक्षकांना अवगत केले.

चंद्रपूर लोकसभा निवडणूक: छानणी नंतर 15 उमेदवार रिंगणात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवार 27 मार्च च्या दिवसापर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामनिर्देशन पत्रांची एकुण संख्या 48 झाली आहे. आज दि.28 मार्च रोजी अर्जाच्या छानणी नंतर 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

वैध उमेदवारी अर्जांमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस धानोरकर प्रतिभा सुरेश, भारतीय जनता पक्ष मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद, बहुजन समाज पार्टी रामटेके राजेंद्र हरिश्चंद्र, जनसेवा गोंडवाना पार्टी सयाम अवचित श्यामराव, जय विदर्भ पक्षाचे राठोड अशोक राणाजी, गोंडवाना गणतंत्र पक्ष शेडमाके नामदेव माणिकराव, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी घोनमोडे पूर्णिमा दिलीप, वंचित बहुजन आघाडी बेले राजेश वारलुजी, अखिल भारतीय मानवता पक्ष राऊत वनिता जितेंद्र, सन्मान राजकीय पक्ष लसंते विकास उत्तमराव, भीमसेना कसालवार विद्यासागर कालिदास, पीपल्स पार्टी ऑफ भारत (लोकशाही) बर्के सेवकदास कवडू, अपक्ष उराडे दिवाकर हरि, अपक्ष दहिवले मिलींद प्रल्हाद, अपक्ष गावंडे संजय निलकंठ हे उमेदवार रिंगणात आहेत.

लोकशाही महोत्सवाची पहिल्या टप्प्याने सुरुवात केली आहे. काल 27 मार्चला उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख होती आणि या अंतिम तारखेला विविध उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली असून 30 मार्च पर्यंत उमेदवारांना आपले नामांकन अर्ज वापस घेता येणार आहेत, त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

“लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्र व विशेषत: विदर्भाच्या राजकारणाची दिशा आदिवासी समाज ठरविणार”- दिनेश बाबुराव मडावी

 सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्यात 4 लोकसभा निर्वाचन श्रेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत, आणि 24 विधानसभेसाठी राखीव आहेत. महाराष्ट्र निर्वाचन आयोग अनुसूचित जमातीची लोकसंख्या 7.50 टक्के नमुद करते. परंतु 2011 ची जनगणना झालीच नाही. ती लोकसंख्या गृहीत धरत नाही. ही वाढीव लोकसंख्या नमुद केल्यास ती 9.76 टक्के इतकी वाढते. ही लोकसंख्या महाराष्ट्रातील सरकार घोषित करित नाही. कारण त्या प्रमाणात बजेट व राजकीय आरक्षण वाढवावे लागेल.
  
विदर्भात आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या 37 टक्के आहे. गडचिरोली 4.30 लाख, चंद्रपूर 5.50 लाख, भंडारा-गोंदिया 4.75 लाख ,रामटेक 5.05 लाख, नागपूर 2.45 लाख,अमरावती 3.70 लाख, यवतमाळ-वाशीम 5.60 लाख, अकोला 3.50, बुलढाणा 2.80 लाख, वर्धा 2.30 लाख, ऐवढी आहे,महाराष्ट्रात राखीव जागा सोडून 16 लोकसभा निर्वाचन क्षेत्रात आदिवासींचे मतदान निर्णायक आहे. कोणत्याही पक्षाला लोळविण्याची महा-शक्ती आदिवासी मतदारांची आहे. असे असतांनाही आदिवासी समाजावर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अन्याय वाढतच आहेत. मतदानापुरता त्यांचा उपयोग होतो.प्रत्येक निवडणूकीत M-3 (मास, मदीरा व मनी) चा वापर करून मतदारांना सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाकडे वळविण्याचा फंडा वापरतो.
   
वर्तमान काळात या प्रथेला संपविण्याचा चंग प्रत्येक आदिवासी संघटनांनी बांधला आहे.आपली ताकद त्यांनी ओळखली असून आदिवासी विरोधी पक्षांना त्यांची जागा दाखविण्याचा निर्धार प्रत्येक आदिवासी मतदार करणार आहे.मुठभर सत्तेचे लोभी वगळून आदिवासी समाजाच्या न्याय- हक्कांसाठी व सर्वांगीण विकासासाठी, अस्मितेसाठी प्रत्येक आदिवासी मतदार सजग झाला आहे. याची परिणीती येत्या लोकसभा निवडणूकीत दिसतीलच ही बाब प्रत्येक राजकीय पक्षाने गाठ बांधून घ्यावी..! हा निर्वाणीचा सूचक इशारा सह आदिवासी समाज बांधवाना आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिनेश मडावी यांनी दिला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या समर्थनाने आ.प्रतिभा धानोरकरांचे पारडे जड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगांव : लोकशाही महोत्सवाची पहिल्यां टप्प्याने सुरुवात केली आहे. बुधवार 27 मार्चला उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख होती आणि या अंतिम तारखेला महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर तथा वंचीत बहुजन आघाडी चे अधिकृत राजेश बेले यांचे सह विविध उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. 26 मार्च ला भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला होता.सर्वच उमेदवारांनी आप आपल्या समर्थका सह शक्ती प्रदर्शन केले आहे.मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल करणाऱ्या कांग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना सभाजी ब्रिगेडनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ताईच्या रॅलीचे पारडे जड झाल्याचे दिसून आले आहे.

यावेळी उबाठा शिवसेनेसोबत युती असलेली संभाजी ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते वणी विधान सभेतून प्रतिभाताई धानोरकर यांच्या समर्थनार्थ चंद्रपूर येथील मिरवणूकीत दाखल झाली होती. जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषना देत आसमंत दणानुन सोडला होता.विशेष म्हणजे आघाडीतील सर्वच नेते मंडळी एकजुटीने सहभागी झाली होती.उमेदवारी मागे घेण्याच्या तारीखे नंतर रंगतीची ताकत स्पष्ट होणार आहे.सध्याच्या परिस्थिती मध्ये सभाजी ब्रिगेडने आपली दाखवलेली राजकीय प्रशिक्षित पणाची झलक सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.

लोकसभा निवडणूकीचा धुमधडाका चालु असून या निवडणूकीत कोण बाजी मारेल सांगणे कठिण असले तरी शक्ती प्रदर्शनातून माहोल निर्माण करणे प्रचाराचे माध्यम ठरत आहे.या रॅलीच्या प्रचाराची धुरा करण्यात सभाजी ब्रिगेडने खांद्यावर घेतली होती.त्यामुळे माहोल तयार करण्यात मोठा हातभार लागला आहे.मात्र हा माहोल कायम मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकल्यास उमेदवाचा विजय निश्चित मानल्या जाते असे कार्यकर्ते आपला अनुभव कथित करीत आहे.दि.खा.बाळूभाऊ धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाची सहानुभूती मतदार संघात कायम असून या सहानुभूतीचा काही प्रमानात फायदा हा उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना होईल अशी शक्यता वर्तीविली जात असतानाच सभाजी ब्रिगेड या प्रशिक्षित पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्यामुळे गर्दीत भर पडली असून ग्रामीण भागात या रॅलीने त्यांच्या प्रचाराचे वातावरण गरम केले आहे.

36 उमेदवारांनी दाखल केले लोकसभेसाठी 48 नामांकन

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता. 27) 29 उमेदवारांनी 37 नामनिर्देशनपत्र दाखल केली. त्यामुळे अर्ज भरणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 36 तर दाखल नामांकन पत्रांची एकूण संख्या 48 झाली आहे.

बुधवारी नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेसच्या आ.प्रतिभा धानोरकर यांनी 3. वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांनी 3, विद्यासागर कासर्लावार यांनी 1, भीमसेना पक्ष 1 अर्ज अपक्ष म्हणून, नामदेव माणिकराव शेडमाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांनी 2 अर्ज, जावेद अब्दुल कुरेशी यांनी १ अर्ज, अपनी प्रजा हित पार्टी 1, रमेश मडावी यांनी 1, बहुजन समाज पार्टीनी 1 नामांकन अर्ज दाखल केला आहे. याशिवाय पूर्णिमा घनमोडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), दिवाकर गुलाब पेंदाम (विरों के वीर इंडियन पार्टी), मोरेश्वर बडोले (अपक्ष), मिलिंद दहिवले (अपक्ष), सेवकदास बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक), अमोल कोमावार (हिंदू राष्ट्र संघ), राजेंद्र रामटेके (बहुजन समाज पक्ष), राजेंद्र हजारे (अपक्ष), दिनेश मिश्रा (अपक्ष), वनिता राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), जावेद मजिद अब्दुल (अपक्ष), विकास लसंते (सन्मान राजकीय पक्ष), संदीप वाघमारे (अपक्ष), प्रमोद देठे (अपक्ष), संजय गावंडे (अपक्ष), संजय टेकाम (अपक्ष), राजेश घुटके (अपक्ष), शेख वजीर (अपक्ष), सूर्या अडबाले (अपक्ष), अनिल डहाके (अपक्ष), दिवाकर उराडे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), दिलीप माकोडे (अपक्ष), गीता मेहर (अखिल भारतीय परिवार पार्टी) यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सात उमेदवारांनी 11 नामांकने दाखल केली होती.

ट्रॅक्टरवर टाकला महसूल विभागाने छापा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कानडा परिसरात ट्रॅक्टरने अवैध रेती वाहतूक करीत असतांना महसूल विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकत एका ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई मंगळवारला मध्यरात्री केली. त्यामुळे कमालीचे तस्कर दहशतीत आले आहे.

मारेगाव तालुक्यात वाळू तस्करांचे जाळे फोफावले असतांना येथील तहसीलदार उत्तम निलावाड हे स्वतः एक्शन मोडवर येत पथक कार्यान्वित केले. यात मागील दोन महिन्यात अनेक वाहनावर धडक कारवाई करून तस्करांचे मनसुबे हाणून पाडले. त्यामुळे त्यांच्या प्रशासकीय सेवेतील पारदर्शकतेच्या मूल्यमापनाचा आलेख दिवसागणिक वाढत आहे.

दरम्यान, सातत्याने अवैध रेती तस्करांवर केल्या गेलेल्या कारवाईनंतरही रेती तस्करांची अवैध चोरी कायम असतांना मंगळवारला रात्री कानडा मुकटा पांदण रस्ता येथे मध्यरात्री रेतीचे ट्रॅक्टर अवैध वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच महसूल पथक घटनास्थळी दाखल होऊन जप्तीची दोन वाजता कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अमोल गुघाने, तलाठी शिंगणे, कुडमेथे, सोयाम, मडावी यांनी केली.

उष्माघात सारख्या समस्या टाळण्यासाठी हे उपाय करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या आहेत. कमाल तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. तापमान वाढल्यामुळं स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे ते हायड्रेट राहणे. भरपूर पाणी पिणे. प्रवास करताना डिहायड्रेश जाणवत असेल तर लिंबू पाणी प्यावे. पण शक्यतो अशावेळी पाणीसोबतच असू द्यावे. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे घरगुती पेयच प्या. सैल व सुती कपडे घाला. 

उष्माघाताची कारणे
भर उन्हात अतिकष्टाची कामे करणे, तापमान जास्त असणाऱ्या ठिकाणी काम करणे, घट्ट कपडे वापरणे

उष्माघाताची लक्षणे काय?
मळमळ, नैराश्य, डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर वाढणे, चक्कर येणे, ताप येणे, भरपूर घाम येणे. 

काय काळजी घ्याल?
- अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. 
- सफेद किंवा सौम्य रंगाचे कपडे घाला. शक्यतो कॉटनचे कपडे घ्या. 
- भरपूर पाणी प्या, लिंबू-पाणी, लस्सी, ताक, नारळपाणी पित राहा. 
- उन्हात बाहेर पडताना गॉगल, टोपी, छत्री, इत्यादी घेऊनच बाहेर पडा. 
- उन्हात पार्क केलेल्या गाडीत मुलांना व प्राण्यांना बसवू नका.


टी एस सी मिर्ची व हळद पावडर शॉपी शुभारंभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मेघदूत कॉलनी (चिखलगाव) येथे टी एस सी मिर्ची पावडर व हळद पावडर शॉपीचे भव्य शुभारंभ दि.22 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वा. संपन्न झाला आहे.
टी एस सी नवीन प्रतिष्ठानचे उदघाटक मा.श्री. रमेशजी मडावी (अध्यक्ष क्रांतिवीर बिरसा मुंडा सार्व. वाचनालय वणी) यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी तिरु.शंकर किनाके, प्रा. डॉ. अजय देशपांडे, डॉ गुलशन कुथे, प्रा. व्यास, प्रा. जंत्रे, मुकेश वाढई, सामाजिक कार्यकर्ता लीलाधर आरमोरीकर, रामदासजी गेडाम, वसंतराव चांदेकर, कृष्णाजी मडावी, भाऊरावजी मडावी, पत्रकार कुमार अमोल, महेश आत्राम, पुरुषोत्तम सोयाम, आदींची कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होती.
अल्पोपहार नंतर या प्रसंगी टी एस सी मिर्ची पावडर व हळद पावडर शॉपीचे संचालक श्री चांदेकर बंधू यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व पाहुण्यांचे तसेच महिला भगिनींचे सुद्धा मनःपूर्वक आभार मानले. 

CBSE कडून 2024-25 साठीचा अभ्यासक्रम जाहीर; नव्या Syllabus सह 'हे' आहेत महत्त्वाचे बदल..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईने शैक्षणिक सत्र 2024-25 साठीचा दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर नवीन सत्र 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे.

▪️सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा संपल्या असून बारावीच्या परीक्षा 2 एप्रिल रोजी संपणार आहेत. मात्र या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सीबीएसईने आभ्यासक्रम जाहिर केला आहे. 

नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असणार आहेत. त्याचबरोबर दोन ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत. तसंच, बारावीसाठी 7 विषय अनिर्वाय करण्यात आले आहेत. यंदा सीबीएसईने अभ्यासक्रमाचे वर्गीकरण केले आहे. माध्यमिक आणि वरिष्ठ या दोन श्रेणींमध्ये विभागला गेला आहे. माध्यमिक अभ्यासक्रम म्हणजे 9 ते 10 आणि वरिष्ठ माध्यमिक म्हणजे इयत्ता 11 आणि 10 या पद्धतीने श्रेणींमध्ये विभागण्यात आला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. 

इयत्ता 10 वी साठी पाच विषय अनिवार्य असतील तर दोन ऐच्छिक असतील. तर, इयत्ता 10 वीच्या अभ्यासक्रमात भाषा, मानविकी (Humanity), गणित, विज्ञान, कौशल्य विषय, सामान्य अध्ययन आणि आरोग्य आणि शारीरिक शिक्षण यासह सात मुख्य विषयांचा समावेश आहे. 

2024-25 साठी CBSE इयत्ता दहावी आणि बारावी अभ्यासक्रमासाठी सूचना

• सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर www.cbseacademic.nic.in वर जाऊन शैक्षणिक टॅबवर क्लिक करा
• 'सत्र 2024-25 साठी माध्यमिक आणि वरिष्ठ शालेय अभ्यासक्रम' या टायटलवर क्लिक करा
• PDF फाइल उघडण्यासाठी लिंकवर क्लिक करा 
• ही PDF फाइल डाऊनलोड करुन ठेवा. पुढील प्रक्रियेसाठी या फाइलची प्रिंट करुन ठेवा. 

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके सादर करण्यात येणार आहे. तर, उर्वरित इयत्तांचा अभ्यासक्रम आधीच्याच पाठ्यपुस्तकांसह सुरू राहणार आहेत.


लिंबू ही जगाला भारताने दिलेली देणगी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

उन्हाळा आला, आरोग्य सांभाळा हा सल्ला आता सर्वांनाच देण्याची वेळ आली आहे. उन्हाळा म्हटले कि सर्वप्रथम आठवण येते ती शरीर आणि मनाला ताजगी देणाऱ्या लिंबू सरबताची. उन्हाळा आला कि लिंबाचे दर वाढू लागतात पण तरीही तापत्या उन्ह्यातून आल्यावर थंडगार लिंबू सरबत हे अनेकांचे आवडते पेय असते. सायट्रस कुळातील हे फळ अतिशय उपयुक्त असून आरोग्यदायी आहे. ताजेपणा देणारे, तोंडाची रुची वाढविणारे, आजारपण दूर करणारे हे करामती लिंबू मूळचे भारतीयच आहे. 

हडप्पा येथे केलेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषात लिंबू पाने याचा उपयोग दिलेला आढळला आहे. प्राचीन काळात भारतात लिंबाचा वापर केला जात होता याचे अनेक पुरावे आहेत. लिंबू ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे. प्राचीन काळात पाण्यात मिसळून लिंबू सेवन केले जात असे त्यामुळे वेगळीच उर्जा, वेगळी चव मिळत असे असे उल्लेख येतात. म्यानमार आणि चीन मध्येही लिंबू प्राचीन काळापासून वापरले जात आहे. मोंगल काळात जे प्रवासी आले त्यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात लिंबाचा उल्लेख केलेला आढळतो. बादशहा बाबर यांच्या सरदाराने म्हणजे अमीर खुस्रो यांनी लिहिलेल्या ग्रंथात लिंबाचे उल्लेख आहेत. चरक संहितेत लिंबाचे उपयोग नोंदले गेले आहेत तर विजयनगर राज्यात १६ व्या शतकात आलेल्या परदेशी प्रवाशांची नजर लिंबाच्या झाडांवर पडल्याचे उल्लेख येतात. लिंबाचे एक विशेष म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी अश्या कुठल्याही पदार्थात याचा वापर होतो. सरबतापासून सोडा, मद्य यात लिंबाचा झणझणीत स्वाद हवाच. शिकंजी मध्ये लिंबू हवेच.

लिंबाचे औषधी उपयोग अनेक आहेत. पचन व्यवस्थित होण्यासाठी लिंबू उपयुक्त आहेच पण तोंडाची रुची वाढविण्यासाठी लिंबू लोणचे फार उपयुक्त ठरते. लिंबामध्ये ए, बी, सी जीवनसत्व आहेत त्याचबरोबर पोटेशियम, मंगनीज, आयर्न, तांबे, फॉस्फरस अशी अनेक क्षार आहेत. प्रोटीन आणि कर्बोदके सुद्धा आहेत. सर्दी, रक्तक्षय, पचन विकार, उष्णता शमन अश्या अनेक आजारात लिंबाचे सेवन फायद्याचे ठरते. लिंबू शुक्राणू मारते, इतकेच काय पण एचआयव्ही विषाणू सुद्धा मारते त्यामुळे याचा वापर गर्भनिरोधक म्हणून सुद्धा केला जातो. ऑस्ट्रेलियन संशोधकाने लिंबातील हे गुण शोधून काढल्याचे सांगतात.


मराठा समाजाकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण सुरू; प्रश्नावली आली समोर...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

काल अंतरवलीत झालेल्या बैठकीनंतर मराठा समाजाकडून गावागावात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून या सर्वेक्षण दरम्यान आठ प्रश्न करण्यात आलेत. त्यानंतर मराठा सामाज कोण कोणत्या मतदार संघातून आपले उमेदवार उभे करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेमक कसा आहे हा सर्वेक्षण फॉम :

1. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावे का?....
• होय/नाही
अभिप्राय................

2. मराठा समाजानी येणारी लोकसभा निवडणूक लढवावी का.?....
• होय/ नाही
अभिप्राय...........

3. लोकसभा निवडणूक प्रत्येक जिल्हातून एक अपक्ष उमेदवार ‌द्यावा का.?....
• होय/ नाही
अभिप्राय........

4. प्रत्येक गावातून दोन उमेदवार योग्य का?....होय/नाही
अभिप्राय.........

5. कोणत्याही राजकीय एका पक्षाला आपण पाठिबा देणे योग्य का.?...
• होय/नाही
अभिप्राय.......

6. आपल्या कटुंब मतदान संख्या किती ?.... 
• संख्या..

7. आरक्षण प्रश्न मार्गी लावणारा कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार चालणार का.?
• होय/नाही किंवा फक्त मराठा 
अभिप्राय,.....

8. जिल्हातून लोकसभा मराठा समाजच्या निश्चित उमेदवार यांना तुम्ही मतदान करणार का.?...होय/नाही
अभिप्राय..........

हे आठ प्रश्न प्रमुख्याने विचारण्यात आले आहेत.


अखेर लोकसभेची उमेदवारी प्रतिभाताई धानोरकर यांना घोषित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराबाबत राज्यासह जिल्ह्यात जोरदार रस्सीखेच असल्याची चर्चा होत होती, प्रत्येक उमेदवार आपला दावा मांडण्यात गर्क होता.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चंद्रपूर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आमदार विजय भाऊ वडेट्टीवार आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात जोरदार चर्चा रंगली होती. ज्यावर आज काँग्रेस हायकमांडने पूर्णविराम लावला आणि अखेर चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत प्रतिभाताई धानोरकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र, एकीकडे भाजपाचे लोकसभा उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य कितपत सफल ठरते हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे. कारण ते वणी येथील बुथ कार्यकर्ता मेळाव्याला संबोधिताना म्हणाले होते की, काँग्रेस चा उमेदवार कोणीही असो, निवडून येणार एनडीएचाच उमेदवार. त्यामुळे आता चंद्रपूर लोकसभा निवडणूक धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्याने चांगलीच रंगणार असल्याचे जनसामान्यातून बोलल्या जात आहे. 


सत्ताधाऱ्यांना मतदानातून धक्का द्यायची हिच वेळ आहे, मतदान करण्यासाठी सज्ज रहा - संतोष कुळमेथे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजुरा : देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालीत अजूनही आदिवासी समाजाचा विकास आज पावतो सत्ता भोगणाऱ्या पक्षानी आदिवासी समाजाचा अशिक्षितेचा फायदा घेत राहिले. व 25 किलो राशन व 1 लाखाचे घरकुल ह्या शिवाय काहीच आदिवासींना दिले नाही ह्यांची जाणिव सद्याच्या घडीला असलेल्या युवकांना समजून आलेले आहे.

गेल्या काही काळात आदिवासीनी जे प्रश्न घेऊन आंदोलने केली त त्याचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय पण विद्यमान सरकार मानायला तयार नाही. मणिपूर असो, हसदेव असो, सुर्जागड असो वा गडचिरोली, छत्तीसगड, म.पी. (MP) मधील विविध समस्यावर कधीही सरकार तर्फे पाऊल उचलले गेले नाही. बळजबरी व बंदुकीच्या जोरावर आंदोलने मोडून काढली गेली. 3 वर्षांच्या मुलीला गोळी घालून ठार केले गेले, नक्सलवादी नावाखाली हे कितपत योग्य वाटते. जे लोक ह्यांचे ऐकणार नाही त्यांना जेल किंवा कुठ अडकवून ठेवतील हे आताच असे आहे तर अजून येथील तर कुठ नेऊन ठेवतील आदिवासींना, असें सामाजिक कार्यकर्ते संतोष कुळमेथे यांनी माध्यमातून बोलताना सांगितले.

आपल्याला आता मतदानाचा अधिकार बजावून कश्या प्रकारे ह्यांना रोकता येईल.याचे नियोजन आदिवासी समाजातील जाणकार व्यक्ती नी करावे, बूथ बूथ वर आपली टीम आपली माणसे आपल्या लोकांना समजवून सांगण्यासाठी तय्यार केले आहेत. घ्या सूड गेल्या 75 वर्षाचा, घ्या सूड आपल्या क्रांतीकारांचा, ज्याचा इतिहास दडपवून आमच्यात डोक्यात डरपोकांचे माफिवीरांचे विचार घालणाऱ्यांचा, घ्या सूड तुम्हाला पेसा कायदा पासून वंचित राहणाऱ्यांचा, ही संधी 5 वर्षात एकदाच येईल. आपण विजयी नाही झालो तरी ह्यांना पाडून आपल्या मताचा पावर दाखवून द्यायचा. मत मागायला आले तर सरळ विचारा किती प्रश्न आमचे गेल्या 5 वर्षात आपण भवनात मांडले,तेव्हा कुठ आम्हाला हे महत्वाचे समजतील.

आमच्या समाजाच्या व्यक्ती नी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला असेल,ह्यांची सुद्धा योग्यता चेक करा. अनेक जण मतदान विभाजन करण्यासाठी सत्ताधारी पक्ष तर्फे पैसे घेऊन उभे राहतात. त्यामुळे माझ्या समाजाने सावध राहावे, हीच अपेक्षा करतो असे मत संतोष कुळमेथे आदिवासी टायगर सेना विदर्भ अध्यक्ष ह्यांनी माध्यमातून आदिवासी समाजाला आव्हाहन केले आहे.

निसर्गाच्या सानिध्यात पत्रकार तुरणकर यांचा वाढदिवस साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : माजी नगरसेवक (वणी) तथा लोकवाणी जागर ई-न्यूज पेपरचे संपादक राजूभाऊ तुरणकर यांचा वाढदिवस मांगरूळ (रोड) येथील चापली पवनसूत रोपवाटिका मध्ये उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार माणिक कांबळे, लढा चे प्रवीण भाऊ खानझोडे, दीपक डोहणे, दिलदार शेख, महिला पत्रकार प्रतिभा तातेड, आनंद नक्षणे, प्रेस सपादक चे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, पंकज नेहारे, कैलास मेश्राम, रवि घुमे, कुमार अमोल, प्रामुख्याने उपस्थित होते. या निमित्ताने केक कापून त्यांना निरोगी दीर्घायुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

जातपात, धर्मांधता नष्ट करून शोषण विरहित समाजव्यवस्थे साठी भगतसिंगांचे विचार व कृती आजही प्रासंगिक - राजूर येथील मान्यवरांचा सूर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राजूर कॉलरी : इंग्रजांनी स्वातंत्र्य चळवळीला कमजोर करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर धार्मिक विभागणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये इंग्रज यशस्वी झाले, त्याबरोबर देशात परंपरेने आलेला जाती वाद होता. त्याकाळात भगतसिंगांनी वृत्तपत्रात अनेक लेख लिहिले तसेच अनेकदा रस्त्यावर उतरून एकात्मता निर्माण करण्यासाठी जागृती केली. आज स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतर पुन्हा एकदा जातीवादाने व धर्मांधतेने डोके वर काढले आहे, अश्या वेळेस शहीद भगतसिंगांचे विचार व कृती आजही प्रासंगिक असून तरुणांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन करणारे सूर राजूर येथे झालेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचा २३ मार्च शहीद दिना निमित्त झालेल्या अभिवादन कार्यक्रमात वक्त्यांनी काढला.

राजूर येथे असलेल्या शहीद भगतसिंग चौकात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला शिक्षिका छाया काटकर व शंकर हीकरे यांचे हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या अभिवादन कार्यक्रमात कॉ. कुमार मोहरमपुरी, शिक्षिका छाया काटकर, मुख्याध्यापक महेश लिपटे व कवी गायक राजेंद्र पुडके यांनी आपले विचार मांडले तसेच पुडके यांनी सुमधुर आवाजात गीते सुद्धा सादर केली.

यावेळेस बंडू ठमके, संजय कवाडे, संजय काटकर, साजिद खान, गौतम कवाडे, वर्मा काका, ओम पवार, ऍड.अरविंद सिडाम, दिशा पाटील, अमर फुलझेले, वर्षा सिडाम, अशफाक अली, राजेश मानवटकर, शांताराम फुलझेले, संतोष गेडाम, अमित करमरकर, जाबिर अली, शेख साबीर, संजय पाटील, कवडू करमरकर, सिनु कलवलवार, सागर नगराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

माध्यम क्षेत्रातील विपुल ज्ञानाचे धनी श्री. राजूभाऊ तुरणकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..


अभिष्टचिंतन | वाढदिवस 

आज 24 मार्च 

हा दिवस तुमच्यासारखाच खास असू दे. तुमच्या आयुष्यातील सर्व आनंदी, लहान क्षणांचा आनंद घेणे कधीही थांबवू नका. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी! आम्ही प्रार्थना करतो. वाढदिवसासारखा संस्मरणीय आणि तुमचा आजच्या वाढदिवसापेक्षा अधिक विलक्षण वर्ष असू दे!

आयुष्यात अनेक व्यक्ती येतात आणि निघुनही जातात पण काही असे असतात जे शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ देत असतात. आमच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात आमच्या पाठीशी उभा राहणाऱ्या आमचे जिवलग बंधुराज, उत्तम मार्गदर्शक तथा वणी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, गोरगरीब लोकांच्या मदतीला सदैव धाऊन जाणारे व्यक्तिमत्व,लोकवाणी जागर ई माध्यमचे मुख्य संपादक मा श्री राजूभाऊ तुरणकर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी निर्मिकाकडे प्रार्थना...

अत्यंत मनमिळावू प्रामाणिक अणि शांती संयमी स्वभावाच्या बंधुराजास या जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा...!!

शुभेच्छुक :- सह्याद्री चौफेर परिवार, (महाराष्ट्र राज्य) व मित्र परिवार.वणी-मारेगाव 

शिरीष अवताडे यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश

 
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 वणी : विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शिंदे गटात गेलेल्या अनेक शिवसैनिकांनी काल संजय देरकर यांचे निवासस्थानी वणी विधानसभा संपर्क प्रमुख संतोष माहुरे, माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकस, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतला. लाठी-लालगुडा सर्कल भुरकी येथील उपसरपंच तथा शाखा प्रमुख विनोद दानव, शाखाप्रमुख सुमित कुमरे, रामा गाडगे, मनोहर कनाके, विलास वाढई, विनायक पिंपळकर, रांगणा येथील तुळशीराम सातपुते, कैलास सालुरकर, कोंडू काळे, गोविंदा कुमरे, नांदेपेरा येथील अजय भोसले शाखाप्रमुख, विजय राजूरकर उपशाखा प्रमुख, शिरीष अवताडे यांच्या सह नांदेपेरा 2 मधील संतोष दूमोरे, पवन पेचे व असंख्य शिवसैनिकांनी प्रवेश केला, यावेळी नेताजी पारखी, जगन जुनगरी, कैलास मेश्राम हे उपस्थित होते.

देश विरोधी निर्णय घेणाऱ्या भाजपला निवडणुकीत हरविण्याचे जनतेला आवाहन -माकप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आर एस एस ची राजकीय संघटना असलेली भाजपचा मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशविघातक जन विरोधी कायदे, धोरणे व निर्णय घेत देशाला रसातळाला नेऊन ठेवले असून देशावर गेल्या ७० वर्षाचा अपेक्षा तीन पट कर्ज वाढवून देशातील नागरिकांवर प्रचंड कर्जाचे डोंगर उभे करून ठेवले आहे. एवढे कमी म्हणून की काय पेट्रोलियम पदार्थांवर प्रचंड कर लावून तीन पट डिझेल पेट्रोल व गॅस चे दर वाढवून देशात प्रचंड महागाई वाढवून जनतेचे कंबरडे मोडले आहे.

दुसरीकडे शेतकरी विरोधी काळे कायदे करणे, संविधान विरोधी निवडणूक रोखे द्वारे भांडवलदारांकडून प्रचंड निधी उकळणे, ४४ कामगार कायदे रद्द करून भांडवलदार धार्जिणे ४ श्रम संहिता आणून श्रमिकांचे शोषण करण्यासाठी मोकळीक देणे, नवीन शैक्षणिक धोरण आणून सार्वजनिक शिक्षण व्यवस्था संपविणे, सी ए ए कायदा लागू करून धार्मिक मतभेद निर्माण करून विशिष्ठ धर्माला टार्गेट करून त्यांच्यावर अन्याय करणे, दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणून निवडणूक जिंकून गेल्या ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली, शासकीय रिक्त जागा न भरणे, सार्वजनिक उद्योग विकणे, शासकीय जागांचे खाजगीकरण करणे, ई डी, सी बी आय, निवडणूक आयोग, ह्यांचा गैर वापर करून विरोधी पक्षातील लोकांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांना तुरुंगात टाकने, आदी संविधान विरोधी निर्णय घेऊन भाजपने जनविरोधी कार्य केल्याने ह्या सरकारला सत्तेवरून पायउतार करून येत्या निवडणुकीत "संविधान बचाव, लोकशाही बचाव, देश बचाव " ह्या देशव्यापी आंदोलन अंतर्गत देशात समाजवादी समाजव्यवस्था आणण्यासाठी व देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ह्यांना इंग्रजांनी २३ मार्च दिनी फासावर लटकविण्यात आले, त्याचा दिनाचे निमित्ताने त्यांचा क्रांतिकारी विचारांना जिवंत करीत आज दिनांक २३ मार्चला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेचा वतीने वणीत निदर्शने आंदोलन ठेवण्यात आले होते. परंतु आचारसंहिता लागल्याने पोलीस विभागाकडून आंदोलनाची परवानगी नाकारल्याने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पक्षाने बैठक घेऊन येणाऱ्या निवणुकित भाजपला हरविण्या साठी कंबर कसून जनतेत जागृती करण्याचे निर्णय घेण्यात आले.

यावेळेस कुमार मोहरमपुरी, ऍड. दिलीप परचाके, मनोज काळे, नंदू बोबडे, सुधाकर सोनटक्के, कवडु चांदेकर, गजानन ताकसांडे, संजय वालकोंडे, संदीप मोहारे, शंकर गाऊत्रे, वाघु सिडाम, संजय कवाडे, प्रीति करमरकर, किरण बोंसूले, वंदना ठाकरे, दिनकर सरोदे, लालू दडांजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्याबाबत झालेल्या आरोपासंदर्भात आदिवासी विकास विभागाने केला खुलासा….


शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधी दुध २०० मि.ली. (टेट्रापॅक) पुरवठ्याबातच्या खरेदीबाबतची टिपणी.

आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, दिनांक 30.12.2020 मधील तरतुदीनुसार सुगंधी दुध पुरवठयाबाबत तरतुद आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा हया अतिदुर्गम भागात असल्याने तेथे दररोज दुध पुरवठा करणे शक्य नसल्याने टेट्रापॅक मध्ये सुगंधी दुध पुरवठा करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सदर निविदेचे मुल्य ठरवतांना टेट्रापॅक उत्पादन करणारे उत्पादक (डेअरी) तसेच महानंद डेअरी तसेच इतर नामांकित उत्पादकांकडून दर प्राप्त करुन घेण्यात आले होते. त्यानुसार सदर दरांची सरासरी रु. 27.70 प्रती 200 मी. ली. टेट्रापॅक इतका दर निश्चित केला होता.

खरेदी धोरणानुसार पार पडलेल्या निविदाप्रक्रियेत एकूण सहभाग घेतलेल्या पात्र निविदाकारांचा तपशिल व त्यांनी नमूद केलेले दर खालीलप्रमाणे आहे :
 उक्त तपशिलानुसार 5 निविदाकारांपैकी 4 निविदाकारांचे दर अपर आयुक्त निहाय न्युनतम आहेत व महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्या. मुंबई यांचे दर जास्त होते. न्युनत दरधारक यांचेशी वाटाघाटी करुन सर्व अपर आयुक्त निहाय एकच दर रुपये 26.25 प्रति 200 मि. ली. टेट्रापॅक असा निश्चित करण्यात आला होता. दिनांक 12.01.2024 रोजी चारही पुरवठाधारक यांना अपर आयुक्त निहाय पुरवठा आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. यानुसार टेट्रापॅक दुधाची रु. 131.25 प्रती लीटर अशी होते. यामध्ये सर्व कर व अति दुर्गम भागातील 497 आश्रमशाळा स्तरावर पोहोच आहेत.

सदर निविदेत महानंद डेअरी यांनी देखील सहभाग घेतला होता. तथापि महानंद डेअरी यांचे दर जास्त होते. त्यामुळे न्युनतम दरधारक यांचेशी अजुन वाटाघाटी करुन सदर दर रु.26.25 निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे महानंद डेअरी व न्युनतम दरधारक यांचे दरामधील फरकानुसार रु. 33 कोटी रुपयाची शासनाची बचत झालेली आहे. तसेच उक्त खरेदी प्रक्रिया शासन निर्णय उद्योग उर्जा व कामगार विभाग दिनांक 01.12.2016 मध्ये विहीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करुन राबविण्यात आली आहे.

शासकीय आश्रमशाळेतील विदयार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेले सुगंधी दुध यामध्ये Homogenized & Pasteurized Milk Fat % -3.0 to 3.5 S.N.F. %-8-5 Min Meeting FSSAI Standard of flavoured milk असा दर्जा ठेवण्यात आला आहे. विभागामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणारे सुगंधी टेट्रापॅक मधील दुध हे आहेत त्या स्थितीत पॅकेट फोडुन तात्काळ पिण्यास योग्य व पोषणमुल्य असलेला आहे. बाजारात उपलब्ध असलेले टेट्रापॅक हे 1 लिटर मध्ये आहे तसेच ते सुगंधी दुध आणि पिण्यास तात्काळ उपलब्ध होईल अशा स्वरुपात नाही. तरी निविदेत विहीत केलेल्या स्पेशिफीकेशनचे सुगंधी दुध विदयार्थ्यांना तात्काळ उपलब्ध व पिण्यास योग्य असुन विदयार्थी सदर दुध आवडीने पितात.

विहिरीत पडून 23 वर्षीय शेतकरी पुत्राचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सराटी येथील एका शेतकरी पुत्राचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

निखिल उत्तम ठमके (अंदाजे वय 23) रा.सराटी असे विहिरीत पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबाकडे तीन एकर शेत आहे. मृतक हा आपल्या शेतात शेती कामे करण्यासाठी गेला होता. तहान लागल्याने तो विहीरी वर पाणी पिण्यास गेला असताना विहिरीतील पाणी काढत असताना त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला. ही घटना 21 मार्चचे सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडली आहे.
सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात येऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणी करिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते, तपासणी नंतर सराटी येथील मोक्षधामात शुक्रवारी 22 मार्च ला अत्यसंस्कार करण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील व चार बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

जाहीर सूचना.... सर्व जनतेस या सार्वजनिक जाहिरातीद्वारे

जाहीर सूचना....

         सर्व जनतेस या सार्वजनिक जाहिरातीद्वारे सूचित करण्यात येते कि, माझे पक्षकार श्री. राजू भानुदास डावे मो.नं. ९७६७९१८००६ रा. लाखापूर पो.नांदेपेरा ता.मारेगाव जि. यवतमाळ यांना श्री. सुशीला रामप्रसाद खंडेलवाल रा.चिखलगांव ता.वणी जि.यवतमाळ यांच्या मालकीची व ताब्यातील सर्व्हे क्र. ८३/४ प्लॉट क्र. ९ब चा सन २०२३-२४ घर नं.१२७७, क्षेत्रफळ – १४५३.१ चौ.फुट खुली जागा भूमापन क्रमांक व उपविभाग:- ८३/४/९/ब ग्राम पंचायत चिखलगाव पंचायत समिती वणी, जि.यवतमाळ येथील हि संपूर्ण जागा विकत घेण्याचा करार माझे पक्षकार श्री. राजू भानुदास डावे व श्री. सुशीला रामप्रसाद खंडेलवाल यांच्यात झाला असून सदर मिळकतीची विक्री दुय्यम निबंधक कार्यालय वणी येथे करण्याचे ठरवले असून उपरोक्त मिळकती संबंधी व त्यांचे मालकी हक्कासंबंधी कोणास काही हरकत व उजर असल्यास सदर जाहिरात प्रकाशित झाल्या पासून सात दिवसा पर्यंत उपरोक्त मिळकती संबंधी असलेल्या हरकतीस सबळ पुरावा असलेल्या दस्तऐवजाचा सह मला अथवा माझे पक्षकार श्री. राजू भानुदास डावे यांच्याशी संपर्क करण्यात यावा. उपरोक्त तारखे नंतर आलेली कोणतीही हरकत अथवा उजर लक्षात घेतल्या जाणार नाही अथवा मान्य केल्या जाणार नाही. तसेच त्यांची माझे पक्षकार यांचेवर कोणतेही कायदेशीर बंधन असणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. 

दिनांक : २२/०३/२०२४
वणी

अधिवक्ता                         
(अ‍ॅड.चंदू एस. भगत ) 
रा. कवडशी ता.वणी जि.यवतमाळ 
मो.नं. ९९२२५९२७९३

बोरी (खुर्द) शाळेने केला जागतिक चिमणी दिन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोरी खुर्द मदनापूर जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यानी जागतिक चिमणी दिवस साजरा केला. गजानन सुरपाम यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार दीपिका मडावी यांनी मानले. प्रास्ताविक संजय चचाने यांनी केले.

सध्या चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनुभवता येत नाही. चिमणी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची असताना मात्र आज चिमण्यांची संख्या कमी होताना दिसत आहे.चिमणी जगायला हवी’याची जाणीव व्हावी यासाठी 2010 पासून 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.
‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक अगर संस्था पातळीवर आयोजित केले जातात परंतु चिमणीसाठीच्या जनजागृतीची आज काळाची गरज आहे. कमी होणारी झाडे, माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढते आधुनिकीकरण, गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ, मोबाइल फोन टॉवर्स या सर्व गोष्टींमुळे चिमणी अडचणीत आली आहे.

चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे, आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे आवश्यक असल्याचे मत गजानन सुरपाम यांनी केले.

नंदीग्राम एक्स्प्रेस वणी वरून कधी धावणार; सर्वसामान्याना लागली प्रतीक्षा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी तालुकावासीयांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असलेली 'नंदीग्राम एक्स्प्रेस' बल्लारशहा ते मुंबई या रेल्वे मार्गावर 16 मार्च 2024 रोजी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवसापासून ही रेल्वेसेवा बंद पडली आहे. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी सुरू झालेली रेल्वे नंदीग्राम नव्हती. केवळ लोकसभेची आचारसंहिता लागेल, या भीतीने अपूर्ण कामाचे लोकार्पण करण्याचा खटाटोप शासनाच्या वतीने करण्यात आला, असा आरोप प्रवासी करीत आहे.

वणी ते मुंबई ते रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. सर्वात प्रथम ही मागणी 26 मार्च 1962 ला रेल्वे बजेटच्या चर्चेत खासदार लोकनायक बापूजी अणे यांनी केली होती. यादरम्यान तब्बल 45 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही नंदीग्राम रेल्वे अखेर 21 मार्च 2007 पासून सुरू झाली होती. नागपूर, वर्धा, वणी, अदिलाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, नाशिक यामार्गे ती मुंबईला जायची. मात्र 22 मार्च 2020 पासून कोरोनाच्या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून काही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यात रेल्वे बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला. दि. 1 जुलै 2021 ला नंदीग्राम पूर्ववत सुरू झाली. परंतु ती अदिलाबाद-मुंबई-अदिलाबाद अशी सुरू झाली. दोन ते अडीच वर्षांनंतर बल्लारशहा, चंद्रपूर वणी व येथून मुंबई अशी रेल्वे सुरू होणार असल्याच्या बातम्या झळकल्या आणि इथेच गडबड झाली.

प्रकल्प पूर्ण झाला तर त्याच्या उद्घाटनाचा सोहळा कौतुकाचा असू शकतो. पण, अपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन करून काय साधले असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे.