Page

राज्यात आघाडीच्या बिघाडीला दोष कुणाचा?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभेच्या निवडणूक मैदानात महाराष्ट्राच्या 48 जगावर महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढणार असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. काँग्रेस शिवसेना,राष्ट्रवादी,या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी निर्माण केली होती. मात्र जागा वाटपा वरून आघाडीत बिघाडी झाल्याची सत्यता उघड झाली आहे.5 जागा वरून काँग्रेस शिवसेना आघाडी कोंडीत सापडली आहे.निवडणुकीच्या पहिल्यां टप्प्यापर्यंत तरी हीं कोंडी निश्चिपने फुटेल अशी शक्यता होती.मात्र तसे घडले नाही.दोनही पक्षाची 5 जागावर जोरदार रस्सीखेच असून तोडगा निघत नसल्याने काँग्रेस,शिवसेना दोनही मित्र पक्षाचे उमेदवार आमणे सामाने लढणार आहे.त्यामुळे आता या आघाडीच्या बिघाडीला दोष कुणाचा?या प्रश्नाच्या उत्तरासाठी कार्यकर्त्यां मध्ये घमासान सुरु झाले आहे.जागा वाटपा वरून काँग्रेस व सेनेत बिनसल आहे.हे सत्य नाकारून चालत नाही. 5 जगावर समझोता झाला नसल्याने मैत्रीपूर्ण लढतीचा फार्म्यूला हायकमांडने मंजूर केला आहे.

हायकमांड कडून मंजूर झालेल्या फार्म्यूल्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रात महाविकास आघाडीत बिघाडी झाला आहे.या 5 जागाच्या मतदार संघात मतांची विभागणी अटळ आहे.मित्रच मित्राच्या आमने सामने दंड थोपटणार आहे.याचा फायदा निश्चितपणे महायुतीच्या उमेदवारांना होईल हे निर्वाद सत्य कोणीही नाकारू शकत नाही.अडेलटट्टू धोरणामुळे 5 जागाचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण?नेते की कार्यकर्ते असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.महाविकास आघाडीला खरंच महायुतीला टक्कर द्यायची आहे का? जर उदिष्ट मोदीजीला हरवायचे आहे तर इंडिया आघाडीत एकजूट आवश्यक आहे.आणि तेच उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात महाविकास आघाडी उदयास आली होती. महायुतीला शह देईल असे वातावरणहीं पहिल्यांदा निर्माण झाले होते.मात्र आपण हरलो तरी चालेल पण जागेचा हट्ट सोडायचा नाही हीं भूमिका महाविकास आघाडीत पाहायला मिळाली आहे.या अट्टाहासापायी नुकसान दोनही मित्र पक्षाचे होईल हे कोण्या भविष्यकाराला विचारण्याची गरज नाही.या 5 जागेच्या दाव्यावरुन कोणीच माघार घेण्यास तयार नाही.हे आता स्पष्ट झाले आहे.

आघाडीचा धर्म सर्वानी पाळायला पाहिजे अस काँग्रेस म्हणत असली तरी समझोत्या शिवाय शिवसेना (उबाठा) कडून उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला असा मुद्दा काँग्रेस मधून ऐकायला मिळत आहे.आता महाविकास आघाडीत असंतोषाचे वातावरण पेटले आहे.याचा विपरीत परिणाम सम्पूर्ण मतदार संघावर होणार आहे.त्यामुळे आम्ही सम्पूर्ण जागा जिंकू असे म्हणणे बालिशपणाचे ठरेल की काय असे चित्र सद्या तरी दिसून येत आहे.शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत या आघाडीचे नेतृत्व करीत आहे.वाटघाटी मध्ये ते सदा अग्रेसर असल्याचे सर्वांना पाहायला मिळत आहे.त्यामुळे निश्चितच जय,पराजयाचा ठपका त्यांचेवर लागणार आहे.उमेदवारीवारी वरून झालेल्या बैठकाचे नेतृत्व त्यांनीच केल्याचे वास्तव कोणीच नाकारू शकत नाही.प्रसार माध्यमाशीहीं संवाद साधताना ते पुढेच असायचे हे सर्वांनीच बघितलं आहे.सर्व सुरळीत चालले आहे. समाधानकारक,सकारात्मक चर्चा झाल्याचे तेच जाहीर करून टाकत होते.आता मात्र सर्व उलटे काटे फिरताना दिसून येत आहे.त्यामुळे या आघाडीच्या बिघाडीला दोष कुणाचा? हे निवडणूक निकाला नंतर उघड होणार आहे.