सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या आहेत. कमाल तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. तापमान वाढल्यामुळं स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे ते हायड्रेट राहणे. भरपूर पाणी पिणे. प्रवास करताना डिहायड्रेश जाणवत असेल तर लिंबू पाणी प्यावे. पण शक्यतो अशावेळी पाणीसोबतच असू द्यावे. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे घरगुती पेयच प्या. सैल व सुती कपडे घाला.
उष्माघाताची कारणे
भर उन्हात अतिकष्टाची कामे करणे, तापमान जास्त असणाऱ्या ठिकाणी काम करणे, घट्ट कपडे वापरणे
उष्माघाताची लक्षणे काय?
मळमळ, नैराश्य, डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर वाढणे, चक्कर येणे, ताप येणे, भरपूर घाम येणे.
काय काळजी घ्याल?
- अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा.
- सफेद किंवा सौम्य रंगाचे कपडे घाला. शक्यतो कॉटनचे कपडे घ्या.
- भरपूर पाणी प्या, लिंबू-पाणी, लस्सी, ताक, नारळपाणी पित राहा.
- उन्हात बाहेर पडताना गॉगल, टोपी, छत्री, इत्यादी घेऊनच बाहेर पडा.
- उन्हात पार्क केलेल्या गाडीत मुलांना व प्राण्यांना बसवू नका.