सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीने देखील स्पर्धा परीक्षा संघर्ष समिती यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक राजकीय तसेच संघटनांच्या वतीने यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी भरतीच्या विरोधामध्ये हजारो तरुणांसह बेरोजगार एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात गुरुवारला (ता.५) निषेध मोर्चा काढला होता.
सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या वाढत आहेत हे पाहून बेरोजगारांनी स्वतः ला साखळदंड बांधून घेत आझाद मैदान येथून हा निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व समाज कल्याण विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बेरोजगारांनी तीव्र रोष व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून हा मोर्चा काढण्यात आला. मागील दोन वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी, एपीएससीच्या जागांमध्ये वाढ करावी, २४ हजार शिक्षकांची भरती महिनाभरात घ्यावी, तलाठी भरती तत्काळ घ्यावी, नागपूर करारानुसार विदर्भातील नोकर भरती घेण्यात यावी, आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्या यावे, उच्च शिक्षणात खासगीकरण थांबवून महाविद्यालय बंद करू नयेत, कंत्राटी पद्धतीने नोकरभरती घेणे बंद करावे, सरळसेवा भरती नियमीत घ्यावी, स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करण्यात यावे अश्या विविध २० मागण्यांचा समावेश होता.
कंत्राटी भरती चा शासन निर्णय ताबडतोब मागे घ्यावा व सर्व सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी नोकरीमध्ये संधी देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी या जनआक्रोश मोर्चातून सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन देऊन केलेली आहे. 2 वर्ग दोन वर्ग तीन व वर्ग चार च्या 186 संवर्गातील सर्व प्रदेश शासन कंत्राटी पद्धतीने भरणार असल्याचे या ठिकाणी समजले आहेत. यावेळी आंदोलनात प्रशांत मुनेश्यार, बिपिन चौधरी, श्रीकांत आडे, अजित गजभिये, प्रजावल तुरकाने, अभी बोरकर, मोरेश्वर मोरे, रिंक्या शंभरकर आदींचा सहभाग होता.