आधारवड हरविलेल्या 'तेजस्विनी'ला दिले जगण्याचे बळ


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : जगात ज्याचं कोणी नसतं त्याच्या पाठीशी देव उभा राहतोच अस म्हणतात. देवाच्या रुपात राजू उंबरकर यांना पाठवून अनाथ तेजस्विनी ला तिच्या ध्येया पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी राजू उंबरकर यांनी घेतली त्यामुळे गावातील नागरिक भारावून गेले आहे.
   
वणी तालुक्यातील बोर्डा येथे गावभेटी दरम्यान तेजस्विनी सतिश नक्षिने या मुलीचे २ वर्षापूर्वी आई वडीलांचे निधन झाले होते. आई वडीलापासून पोरकी झालेली तेजस्विनी सध्या १२ वीत शिकत आहे. १२ झाल्यानंतर पोलिस व्हायचं तीच स्वप्न आहे. मात्र, जीवनाचा आधारवडच काळाने हिरवल्याने तेजस्विनीचे हे स्वप्न, स्वप्नच रहाणार होत. मात्र, गाव भेट दौऱ्यावर असलेल्या मनसे नेते राजु उंबरकर यांना गावकऱ्यांनी ही बाब सांगितली. भाऊंनाही आवरले नाही,आणि क्षणाचा ही विलंब न करता तिची भेट घेतली. तेजस्विनीचे जगण्याचे आधारवडच हरविल्याचे ऐकून राजू भाऊंचेही डोळे पाणावले आणि "आजपासून तुझा बाप राजु उंबरकर" असे उदगार काढून तेजस्विनीच्या संपूर्ण शिक्षणाचा आणि भविष्याची सर्व जबाबदारी स्वीकारली. तिच्या ध्येया पर्यंत तिला नेण्याचं काम माझं आहे असा तिला विश्वास दिला.
भाऊंचे हे शब्द कानी पडताच उपस्थित संपूर्ण गावकरी भावूक झाले होते. महिला तर अक्षरशः धायमोकळून रडल्या. आजकाल मोठ मोठे होर्डिंग्ज गल्ली बोळ्यात शहरात लावून पुढारी खूप मिरवावत मात्र, मदतीच्या ठिकाणी हात झटकून निघून जातात. मात्र, काही लोक असतात मनाचे हळवे संवेदनशील त्यांना दुसऱ्याची मदत केल्या शिवाय जगता येत नाही.