Page

तालुक्यात दोन अवैध कोल डेपो जोमात, प्रशासन कुंभकर्ण झोपेत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगांव : तालुक्यात दोन ठिकाणी अवैध कोळशाचा चोर बाजार राजरोसपणे सुरु असून निडरपणे तस्कराकडून हा व्यवसाय जोमात आहे. हे प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही की 'कोयले के दलाली में इनके भी हात काले' तो नही ना अशी अर्थपूर्ण शंका निर्माण होणे सहाजिक आहे. ह्या संदर्भात नानाविध पोर्टल आणि मिडिया मध्ये बातम्या प्रकाशित होऊनही प्रशासनाला जाग येत नाही हा संशोधनाचा विषय. शासकीय अशी खुलेआम तस्करी करून शासनाच्या महसूल ला चुना लावून काही अधिकारी स्वतःचा गल्ला भरत असल्याची परिसरात रंगतांना दिसत आहे. 

कोसारा डेपो. कोसारा घाट तसा वाळू तस्करीसाठी कुपरिचित आहेच. कोसारा गावाजवळच वरोरा मार्गे येणाऱ्या कोलवाहू ट्रकमधून कोळसा चोरून किंवा कमी दरात विकत घेऊन काही मातब्बर मंडळी गुन्हेगारीचे साम्राज्य निर्माण करत आहे. सोबतच परिसरात प्रदूषण निर्माण करत आहे व सामान्य जनतेला श्वसन संस्थेशी संबंधित आजाराच्या खाईत ढकलत आहे. एवढी हिंम्मत करतांना नक्कीच प्रशासनाचं पाठबळ आहे, अन्यथा ही हिम्मत सहजसोपी नाही. ह्या समस्येच्या मुळापर्यंत जावून कारवाई होईल का? की मुळापर्यंत जाण्याची इच्छाच नाही, यावर अंकुश लावण्यात प्रशासनाला यश येईल का ह्या आशेने सामान्याच्या नजरा खिळलेल्या आहे.

बोटोणी कोलडेपो, अगदी वणी यवतमाळ राज्य मार्गावर बोटोणी गावानजिक दर्शनी जागेवर एकमेव ढाब्या जवळ कोळशाचा अवैध डेपो वसंवला असून मोठया प्रमाणात असा तस्करी केली जात आहे. याचा नाहक त्रास ढाब्यावर जेवण प्रवाशांना होत आहे. कोळशाची भुकटी मिसळून अन्न बाधित होत असून डेपोमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तरीही प्रशासन मूग गिळून गप्प का कोळशाची असा सवाल उत्पन्न झाला आहे. या डेपोत वणी, एकोणा क्षेत्रातील ट्रक कोळशाची चोरी करून खुल्या बाजारात विक्री करिता आणले जातात. किंबहुना येथून चोरीच्या कोळशाची हेरफेर केली जाते.

या चोर बाजारात दर दिवशी ५० ते ६० टन कोळशाचा अवैध व्यापार होत असताना आता पर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. परिणामी हा अवैध कोळसा मोकळ्या जागेवर उतरत असल्याने कोळशाचा धूर जेवणासाठी आलेल्या ग्राहकांच्या भोजनातून जात असल्याची तकार ग्राहकांकडून होत आहे. ह्या अवैध चालकावर अजून पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तूर्तास येथील परिसर प्रदूषण युक्त झाला असून येथील कोल बाजारावर 
कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.