गोदावरी अर्बन तर्फे केला समाजातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बनच्या वतीने यंदा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ ते 10 मार्च दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील कर्तृत्वान महिलांचा उचित सन्मान केला आहे.
   
 गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर यांच्या नियोजनाखाली कार्यक्षेत्रातील पाचही राज्यात महिला दिनाच्या निमित्ताने महिला सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 त्याच अनुषंगाने वणी शाखेच्या वतीने वणीत कार्यक्रम घेण्यात आला तसेच त्यांना वणी शाखेत बोलावून महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष सौ साधना जयसिंगराव गोहोकार, श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था वणीच्या अध्यक्षा मा सौ संगीता संजय खाडे, तसेच विविध क्षेत्रातील सोनाली बोबडे, वर्षा पिंपळशेंडे, प्रीती गौरकार, अर्चना झिलपे, अमृता कुलदिवार, पुजा रामगिरवार, अनुराधा आवारी, अर्चना चर्लेकर, निलिमा काळे, सौ प्रांजली ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, तुषार ठाकरे, मंगेश करंडे, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार तथा समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता उपस्थित होते.   
 सद्यस्थितीत सर्वच क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. असं एकही क्षेत्र नाही कि,ज्यात महिलांचा सहभाग नाही. त्यामुळे महिला अबला आहे तिने केवळ चूल आणि मूल सांभाळावे हि संकल्पना आता लोप पावत आहे. ती चूल मूल आणि आपले काम या सर्वच कामात अग्रेसर ठरत आहे.
  
  समाजात अनेक स्त्रिया आहेत ज्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत काम करीत असतात. सैनिक, वैमानिक, डॉक्टर, वकील, शिक्षक, अभियंता, प्राध्यापक, समाजसेविका यासह अनेक नामवंत क्षेत्रात महिला कर्तृत्व गाजवत आहेत.अनेक महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून घरगुती उद्योग सुरु करून अर्थ साक्षर आणि अर्थसक्षम झाल्या आहेत . महिलांचे सक्षमीकरण म्हणजे काय हे यावरून दिसून येते. 
   
 महिलांच्या याच कार्यामुळे त्यांच्या कुटुंबाला तर फायदा होतोच सोबतच समाजाला सुद्धा याचा फायदा होऊन परिवर्तनाची दिशा मिळते. अश्याच कर्तृत्वान महिलांचा कार्याचा दखल घेत त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे या उद्देशाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ ते 11 मार्च दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन केले आहे .यामध्ये समाजातील अश्या कर्तृत्वान महिलांची निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
Previous Post Next Post