सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
तालुक्यातील वांजरी येथे वास्तव्यास असलेलं शेतकरी कुटुंबं काही कामानिमित्त बाहेर गावी गेलं होतं. ही संधी सोडून चोरट्यांनी १२ नोव्हेंबरला रात्री दरम्यान घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात सोयाबीनची विक्री करून मिळालेले २० हजार रुपये ठेवलेले होते. तसेच महिलेचं ३ ग्राम वजनाचं मंगळसूत्रही त्याच कपाटात ठेवलेलं होतं. चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घामाचे पैसे व त्याच्या पत्नीचं दागिनं चोरून नेलं. २० हजार रुपये रोकड व १२ हजार रुपये किमतीचं मंगळसूत्र असा एकूण ३२ हजार रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला. याबाबत शेतकरी सुरेश रामचंद्र ढेंगळे (५२) यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.