सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : लोकसभा निवडणुकीत जनतेनी मला भरघोस मतांनी निवडून देत, जी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली,मी खासदार झाली त्याच चीज करण्यासाठी जनतेची सेवा हेच माझे प्रथम कर्तव्य असून त्यासाठीच मी प्रयत्न करणार असल्याचे खा. श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी वणी येथील आयोजित जनता दरबाराप्रसंगी माध्यमाशी संवाद साधतांना त्या म्हणाल्या.
लोकसभेत माझ्यावर जनतेने विश्वास दाखवल्याने जनतेनी सांगितलेली काम कर्तव्य समजून मी करणार आहे. लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यात मी प्रामुख्याने वेळोवेळी जनता दरबार घेणार आहे. या माध्यमातून जनतेशी देखील नाळ जुळवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
यावेळी वणी लोकसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते माजी गट नेते उदय रायपुरे व माजी सभापती नप.खालिद पटेल, जुनेद पटेल, अनिल खैरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच स्वागत केले. त्यानंतर मारेगाव तालुक्यातील आरोग्य, एमआयडीसी, क्रीडा संकुल अशा अनेक समस्यांबाबत चर्चा खासदार धानोरकर यांच्याशी केली.
यावेळी आरोग्य, वीज, रस्ते व व महसुली कामे तत्काळ व्हावी,या करीता देखील मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे. अधिकाऱ्यांनी देखील सामान्य नागरिकांची कामे त्वरित करून द्यावी, असे देखील मत यावेळी खा. धानोरकर यांनी व्यक्त केले.