Page

नवोदीत आदिवासी साहित्य परिषदेचे आयोजन वणी येथे

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : विरांगना राणी दुर्गावती मडावी स्मृति पर्वाच्या निमित्याने, दुसरे नवोदित आदिवासी साहित्य परिषदेचे २४ जून रोज शनिवारला वणी येथे वसंत काॅपरेटिव्ह शेतकरी जिनींग हॉल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

सुप्रसिध्द साहित्यिक कुसूम अलाम, या साहित्य परिषदेचे च्या अध्यक्षा आहेत. उद्घघाटक प्रभू राजगडकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून 'गोंडवाना दर्शन' मासिकांच्या संपादक तथा प्रसिध्द लेखिका उषाकिरण आत्राम यांचे अनमोल मार्गदर्शन होणार आहे. या साहित्य परिषदे ला "बिरसा महा नाटकाचे" लेखक दशरथ मडावी त्याच प्रमाणे विनोद वाडेकर, आशिषभाऊ खुलसंगे, निळकंठराव जुमनाके, अशोकभाऊ नागभिडकर, गीत घोष, वसंत कानाके, ब्रम्हानंद मडावी, शितल ढगे, रामदास गेडाम, पैकूजी आत्राम, सुवर्णा वरखडे, विनोदकुमार आदे, रामचंद्र आत्राम, रजनी पोयाम, धनराज मेश्राम, दत्ताजी गावंडे, किरणकुमार मडावी, बाळकृष्ण गेडाम ही साहित्यिक मंडळी उपस्थित राहणार आहेत. या साहित्य परिषदेत, 'आदिवासी महिला काल आज उद्या' हा परिसंवाद राहणार आहे. साहित्यात आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्यांचा पुरस्कार सन्मान होणार आहे.

परिसंवाद झाल्या नंतर लगेच साहित्यिक मान्यवरांच्या उपस्थितीत कवी संमेलनाला सुरुवात होईल.
"आदिम क्रांतीसुर्य विर बाबुराव शेडमाके" चरित्र ग्रंथ आणि "टुकार" कविता संग्रह प्रकाशित होत आहे. तरी ह्या साहित्य परिषदेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक धनराज मेश्राम, दत्ता गावंडे, शालिक कनाके, भगवान कुलमेथे, विनोदकुमार आदे, आशाताई कोवे, रजनी पोयाम, गणपत वेटे, राजेश ढगे, रामदास गेडाम यांनी
केले आहे.