मारेगाव : गोंड बुरांडा येथे दिवसाढवळ्या पथदिवे सुरु असल्याचे प्रकार सतत सुरू आहेत. त्यात विजेची उधळपट्टी आणि स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व सचिव कुंभकर्ण झोपेत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या महिन्याभरापासून पोडावरील पथ ‘दिवे’ दिवस भर सुरु आहेत. मात्र, याकडे कोणाचेच लक्ष नाही जात का? तर ग्रामपंचायत कर्मचा-यांनी दुर्लक्ष करण्याची सीमाच ओलांडली अशी बोंबाबोंब आहे.
कुंभा मार्गांवरील गोंड बुरांडा गावातील बस स्टॅन्ड वरील महिनाभरापासून दिवसा 'स्ट्रीट लाईट' दिवे सुरू असल्याचे येथील जागरुक नागरिकांनी 'सह्याद्री चौफेर' सांगितले. यामुळे आमच्यावर अधिकचा आर्थिक भ्रूदंड बसत असून याला जबाबदार ग्रामपंचायत कर्मचारी असल्याची ओरड आहे. त्यानंतर प्रतिनिधीने सतत तीन दिवस या परिसरात पाहणी केली. तीनही दिवस कुंभा मार्गांवरील गावातील बस स्टॅन्ड वरील पथदिवे दिवस रात्र सुरू होते. त्या बाबत ग्रामसेवक कंत्राटदारांची चालढकल यातून संबंधितांच्या अक्षम्य कारभाराचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.
सलग तीन दिवस मिळालेली माहिती ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभाराचे चित्र दाखवायला पुरेशी आहेत. याकडे तात्काळ ग्रामपंचायतने लक्ष घावून गेल्या महिना भऱ्यापासून दिवस ढवळ्या सुरु असलेले पथ दिवे फक्त रात्रीलाच सुरु ठेवावीत अशी मागणी आहे.