सह्याद्री चौफेर | न्यूज
वर्धा : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटली तरी भुखमरी ,बेरोजगारी, कुपोषण, उपासमारी यासारख्या गंभीर प्रश्नांना आजही देशाला समोर जावे लागत आहे. कोरोना काळात हजारो मुले अनाथ झाले असून त्यांच्या जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.समाजाचे हे प्रश्न सोडविण्यासाठी तरुणाईने स्वयंस्फूर्तीने समोर यावे,असे आवाहन् लायन्स क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष संदीप चिचाटे यांनी केले.
आरंभ बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने सेवाश्रम येथे सुरु असलेल्या एक हात मदतीचा उपक्रमात लायन्स क्लब वर्धाने सक्रिय सहभाग नोंदविला. याप्रसंगी लायन्स क्लब गांधी सिटीचे संचालक अनिल नरेडी,अध्यक्ष संदीप चिचाटे,उपाध्यक्ष स्वाती चुटे,सचिव आशिष पोहाणे, दिलीप रोकडे,चंद्रकांत डगवार,प्रकाश खंडार,सेवाश्रम प्रमुख शिवाजी चौधरी,फूटपाथ स्कूलचे मोहित सहारे,भावना देशपांडे, नाट्यप्रतीक थेटर अकॅडमीचे प्रतिक सूर्यवंशी,नलिनी चिचाटे उपस्थित होते.
सेवाश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून अनाथ मुलांची संपूर्ण व्यवस्था निशुल्क केली जात असून तिथे आज अनेक वृद्ध , घटस्फोटीत व विधवा स्त्रिया जीवन जगत आहे.शिवाजी चौधरीने केलेले हे कार्य अद्वितीय असल्याचे मत अनिल नरेडी यांनी व्यक्त केले. त्याच्या सेवा कार्याचा लायन्स क्लब गांधी सिटी च्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी तरुण समाजसेविका भावना देशपांडे यांचा वाढ दिवस सेवाश्रमात साजरा करण्यात आला.तसेच दिलीप रोकडे,चंद्रकांत डगवार, संस्कृती पेटकर ,वृषाली बकाल यांनी प्रेरणा गीते सादर केली.दिवाळीच्या आरंभी एक हात मदतीच्या अंतर्गत एक दिवा मदतीचा उपक्रमाला वर्धेकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन लायन्स क्लब गांधी सिटीच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन साक्षी हिवरे हिने केले तर आभार कुमुदिनी मोहदूरे यांनी मानले.कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश देशपांडे,माधुरी देशपांडे,अमित पत्थे, माधव मोहरील,मोहन सायंकाळ,आदित्य दुधे, जानव्ही ठोंबरे, नीता जाधव, पूजा जाधव, अविनाश डोंगरे यांनी सहकार्य केले.