महागांव : तालुक्यात मागील चार महिन्यात तीन ते चार पशुधन वाघाने फस्त केली. त्यामुळे कासारबेहळ, सेवानगर, वरोडी, वरोडी (जुनी), या गावातील शेतकरी शेतमजूर दहशतीत आले आहे.
सध्या पेरणी आटोपली पाऊस मात्र, दडून बसल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकीकडे वाघाची दहशत तर दुसरीकडे निसर्ग कोपल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पाण्याअभावी माल हातून जाईल असे बोलल्या जात आहे.
वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व विज महावितरण कंपनीने शेतमालच्या जागली यासाठी सिंगल फेज किमान रात्री विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी दि.01 जुलै रोजी दुपारी 12 वाजता महागांव तहसील व विज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शेकडो शेतकरी धडकणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मस्के यांनी सांगितले.
उद्या शुक्रवारी कासारबेहळ, सेवानगर, वरोडी, वरोडी (जुनी), या परिसरातील शेतकरी बांधवानी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे "अभी नही तो कभी" असेही, आवाहन प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.