कोतवाल संघटनेच्या मागण्या मंजूर न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा कोतवाल संघटनेचा ईशारा


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : महसूल विभागाचा कणा असलेला कोतवाल हा घटक गेल्या 60 वर्षांपासून चतुर्थ श्रेणीसाठी सतत झगडत आहे. कोतवाल हा तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करणारा, विभागातील स्थानिक पातळीवरील महसूल गोळा करणे, गौण खणिजास आळा घालुन महसूल बसविणे, निवडणूक कामकाज,नैसर्गिक आपत्ती, पीक पाहून दुष्काळात नुकसान भरपाई पांचानामाचे सर्व्हे करणे,स्थानिक पातळीवर सुरक्षा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता पोलिस पाटील व पोलिस प्रशासनाला मदत करणे. अशा अनेक कामात महत्वाची भूमिका बजावणारा कोतवाल हा घटक गेल्या 60 वर्षापासून झगडत असलेल्या ह्या घटकाला आजतागायत न्याय मिळालेला नाही.

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने कोतवाल बांधवांच्या मागण्या जर येत्या 12 तारखेपर्यंत मान्य ना केल्यास 13 तारखेपासून मुंबई येथे राज्यातील 12637 कोतवाला़नी बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने मुंबई येथे दिलेल्या निवेदनास महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जी. यवतमाळ पूर्णपणे पाठिंब्यासहीत आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे.
     
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धावराव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालाचा विषय निकाली काढावा अन्यथा होणाऱ्या नुकसानीस राज्य शासन स्वतः जबाबदार असेल, त्यामूळे तातडीने बैठक लाऊन गेल्या 50 - 60 वर्षापासून च्यां मागणीचा निर्णय व्हावा अशी मागणी रेटून धरली आहे.
   
यावेळी शशिकांत निमसटकर जिल्ला अध्यक्ष ,सुरेश येरमे तालुका अध्यक्ष,अतुल बोबडे तालुका सचिव,विनोद मडावी,अमित सातपुते,अशोक पेंदोर,गणेश उराडे,बळवंत कोवे,व लहु भोंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.