सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
संतांनी समाजाला दिलेली मानवतेची शिकवण नेहमी स्मरणात रहावी, व लोकांच्या डोळ्यासमोर नेहमी त्यांचा आदर्श उभा रहावा म्हणून गाव शहरात राष्ट्रसंतांचे पुतळे उभारले जात आहे. तुकडोजी महाराज व गाडगेबाबा हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन लोकांनी मानवतावादी दृष्टिकोन जोपासावा, तसेच त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी डोळ्यासमोर उभं रहावं हा या राष्ट्रसंतांच्या पुतळे उभारण्यामागचा उद्देश असल्याचे सेवा मंडळाने यावेळी सांगितले.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही आपल्या भाषणातून राष्ट्रसंतांची माहिती सांगितली. तसेच संजय पिंपळशेंडे व प्रविण खानझोडे यांनीही राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन गजानन येलपुलवार केले. गावात पुतळे उभारणीपासून तर पुतळ्यांचा अनावरण सोहळा यशस्वी करण्यापर्यंत मोलाचे सहकार्य समस्त गावकऱ्यांनी केले.