सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव : मारेगावात आठवडी बाजार ला पडलाय कोरोनाचा विसर. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तविली जात असतांनाच तालुक्यात बाजारपेठात कोरोनाचे कसलेही नियम न पाळता गर्दी होत आहे.
तसेच नागरिकांना मास्क, सानिटायझरचा विसर पडला असून, खुले आम गर्दी होत आहे.
बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी कोणत्याही नियमाचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.