Page

नेरी व्यापारी असाेसिएशनची अध्यक्षपदासाठी अटीतटीची निवडणूक


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑगस्ट) : चिमूर तालुक्यातील बाजारपेठे साठी प्रसिध्द असलेल्या नेरी येथील व्यापारी असाेसिएशनची अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच गुप्त मतदान पध्दतीने आज अटीतटीची निवडणूक पार पडली. एरव्ही ही निवडणूक सर्वानुमते हाेवून पदाधिका-यांची निवड कार्यकारणीत केल्या जात असे.! विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी व्यापारी वर्गांतुन सतिश आष्टनकर, विलास चांदेकर, व मंगेश चांदेकर यांनी आपले अर्ज दाखल केले. गुप्त मतदान पध्दतीने मतदान हाेवून त्यात सतिश आष्टनकर व विलास चांदेकर हे पराभूत झाले. सर्वाधिक मते मंगेश चांदेकर यांनी प्राप्त केले. या निवडणूकीत मंगेश चांदेकर यांचे विजयाची बातमी कानांवर येताच अनेक चाहत्यांनी व मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, उपाध्यक्षपदी सुरेश पिसे, सचिवपदी राजु विश्वनाथ पिसे, सहसचिव पदी रवि चुटे, तर काेषाध्यक्ष पदाकरिता विलास टिपले यांनी नविन कार्यकारणीत स्थान मिळविले. या शिवाय सदस्य पदी धनराज पंधरे, देवा कामडी, चांदखाँ पठाण , मुस्तुफा शेख, अशाेक सिताराम पिसे, मिलिंद वाघे, रिजवान अजानी, विनाेद लक्ष्मण कामडी, बाबूराव पिसे, व शैलेश शेणमारे यांची निवड करण्यांत आली. ही निवडणूक प्रक्रिया नेरी व्यापारी असाेसिएशनचे भूतपूर्व अध्यक्ष सुरेश कामडी यांनी पार पाडली. सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना त्यांनी शुभेच्छा या वेळी प्रदान केल्या. गुप्त मतदान पध्दतीने प्रथमच पार पडलेल्या या निवडणूकीची चर्चा अख्ख्या चिमूर तालुक्यातील व्यापारी वर्गांत आज ऐकावयास मिळाली. हे विशेष !

जीएम टेक्नॉलॉजी ट्रायल वरची बंदी उठवावी म्हणून प्रत्येक गावातून ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घेऊन केंद्र शासनाला पाठवा - शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांचे आवाहन



सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (३१ऑगस्ट) : तालुक्यातील वागद ईजारा या गावी ग्रामपंचायत कार्यालय वर कृषी विभाग व बायर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या गावात शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षितता अभियानाअंतर्गत दक्षता बाबत मार्गदर्शन करून गुलाबी बोंड अळी च्या संदर्भाने मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांच्या हस्ते शेतकऱ्यांचे दैवत हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक साहेब यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बायर कंपनी चे जिल्हा प्रतिनिधी कीर्तिराज राजूभाऊ चिद्दरवार, सुरेश राठोड, अविनाश राठोड गायकवाड, भालेकर साहेब कृषी पर्यवेक्षक व डाखोरे साहेब कृषी साहाय्यक हे उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करत असतांना शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन  केले की, सध्या उपलब्ध असलेले कॉटन सीड BG-1, BG-2 हा आता यामधील रोगप्रतिकारक शक्ति पूर्णतः संपलेली असून,ही कापूस वाण कालबाह्य झालेली आहे. केंद्र शासनाने जीएम टेक्नॉलॉजी जेनेटिक मॉडिफाइड या कॉटन सीड वर या कृषिप्रधान देशामध्ये ट्रायल वर बंदी घातल्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे खंत व्यक्त केली. जगामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारावर कृषी क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा आत्मसात करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धता मिळाली आहे. पण दुर्दैवाने या कृषिप्रधान देशामध्ये मूठभर लोकांच्या मागणीवरून केंद्र शासनाने या ट्रायल वर बंदी घातल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कोंडमारा होतोय, त्यासाठी शेतकऱ्यांनी आता पुढाकार घेऊन गावागावातून ग्रामसभेच्या ठरावाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे ही जीएम टेक्नॉलॉजी वरची बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी ग्रामसभेच्या माध्यमातून करावी असे आवाहन केले.

यावेळी बाहेर कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी किर्तीराज  गायकवाड यांनी गुलाबी बोंडअळी च्या व्यवस्थापनासाठी यथोचित मार्गदर्शन केले व त्यासोबत फवारणी करत असतांना सुरक्षा किटचा वापर व त्यासंबंधाने घ्यावयाची काळजी दक्षता,याबाबत उपयुक्त मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना चर्चेच्या माध्यमातून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात आलं. कापूस या पिकामध्ये फेरोमोन ट्रॅप कामगंध सापळे ट्रायकोडरमा व फवारणी या संदर्भाने वापरण्यासाठी कीटक नाशकाचा वापर कसा करावा, या संदर्भाने मार्गदर्शन झाले. यावेळी फवारणी करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांना कृषी विभाग व बाहेर कंपनीच्या वतीने फवारणी सुरक्षा कीटचे वाटप मनीष भाऊ व राजूभाऊ चिद्दरवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला या गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेश भाऊ जाधव नेहमीचं जाधव, दाऊ काळे, दिगंबर देवकर, रवि राठोड, देवराव राठोड, भारत चव्हाण, उमेश प्रल्हाद राठोड, रोहिदास पवार, शासन व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोविड-19 सारख्या विषाणूजन्य संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावाची आदर्श आचारसंहितेचे पालन करून या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भाऊ राठोड बायरचे प्रतिनिधी यांनी केले.

तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (३१ ऑगस्ट) : तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचा कारभार मागील अनेक वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. पैसे दिल्याशिवाय कोणतेही अर्जाकडे ढुंकूनही बघायचे नाही. असा अलिखित कायदाच येथे तयार केल्याचे दिसत आहे.
    
२०२१-२२ आर्थिक वर्षापासून फेरफार आभासी पद्धतीने सुरू झाले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून शेकडो फेरफार प्रकरणे प्रलंबित असून आभासी पद्धत असल्याने दिरंगाई होत असल्याचे चे उत्तर सर्वांना देण्यात येत आहे. शिवाय मार्च, एप्रिलमधील काहींचे अर्ज गहाळ झाले असून, कोणीही याकडे लक्ष द्यायला देण्यास तयार नाही. कार्यालयात अधिकारी कधी येतात कधी जातात हा मोठा संशोधनाचा विषय असून,कनिष्ठ कर्मचारी सुद्धा अधिकारी नसल्याने बराच काळ बाहेर घालवीत असतात चौकशी केली तर साहेब मिटींगला गेले. मोजणीसाठी गेले असे उत्तर मिळते.
    
शेतकरी बांधवांना कृषी कर्जासाठी नकाशा सक्तीचा केला असून, त्यांचे अत्यल्प शुल्क असूनही १०० रुपये घेतल्याशिवाय नकाशा दिला जात नाही. कुणी नियमाप्रमाणे शुल्क दिले तर आठ दिवस नकाशाच दिला जाणार नाही. शेतकऱ्यांना नाहक तुटल्या जात आहे.
        
अशातच एका विधवा महिलेस घरकुल मंजूर झाले. त्यासाठी तिने ५ महिन्यापूर्वी फेरफारचा अर्ज दाखल केला होता. त्यात ५ रुपयाची टिकीट नसल्याने अर्ज हेतूपरस्पर प्रलंबित ठेवण्यात आला. विधवा महिलेने पोचपावती वर तिकीट असल्याचे दाखवून दिल्याने तो अर्ज पुन्हा घेतला. या विधवा महिलेस ५ महिन्यापासून चकरा मारावयास लावूनही तिथे फेरफार न झाल्याने तिचे घरकुल वापस गेले. त्यामुळे ही महिला हक्काच्या घरापासून वंचित झाल्याने येथील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांवर लगाम कोणी लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तेरणा हायस्कूल एन-6 सिडको औरंगाबाद येथील कार्यरत क्रीडा शिक्षक रमेश प्रधान यांना आदर्श क्रिडा मार्गदर्शन गौरव पुरस्कार !


सह्याद्री न्यूज | संतोष गडवे 
औरंगाबाद, (३१ ऑगस्ट) : राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रमेश प्रधान यांना आदर्श क्रीडा मार्गदर्शन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आज पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थराज्यमंत्री भारत सरकार मा.ना.डाॅ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य मा.राजेंद्र दर्डा हे होते. क्रीडा महर्षी डाॅ.दत्ताभाऊ पाथ्रीकर तसेच संस्थापक अध्यक्ष मा.सचिन मुळे यांच्या हस्ते आदर्श क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार गौरव प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम भानुदास चव्हाण हाॅल येथे संपन्न झाला.

लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या भ्रष्टाचारी भाजपा महापौर व आयुक्तांवर फौजदारी गुन्हा दाखल करा - नगरसेवक देवेंद्र बेलेंची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : आज चंद्रपूर शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली, ही सभा ऑनलाइन असल्याने नगरसेवकांना सभागृहात येणे बंधनकारक होते, परंतु विरोधी पक्षातील नगरसेवकांना महानगरपालिकामध्ये कुठे ही येण्यास बंदीचे आदेश नसतांना मनपातील महापौर व आयुक्तांनी नगरसेवकांना महानगरपालिका गेट वर आत येणाऱ्या नगरसेवकांना पोलीस बंदोबस्त ठेवून आत येऊ दिले नाही.

आज जी घटना घडली ती महानगरपालिका इतिहासात पहिल्यांदाच घडली की, लोकशाही मध्ये महानगरपालिका सदस्यांनाच पालिका मध्ये येऊ न देणे म्हणजेच लोकशाही ला काळिमा फासण्याचे काम या भ्रष्ट्राचारी भाजपा महापौर यांनी केले व याला दुसरे भ्रष्ट्राचारी आयुक्त यांनी साथ दिली.
नगरसेवकांना महानगरपालिकामध्ये आत येऊ न दिल्याने महानगरपालिका गेट जवळच गट नेते पप्पू देशमुख, काँग्रेसचे देवेंद्र बेले, नंदू नागरकर, अशोक नागपुरे, अमजद अली, निलेश खोब्रागडे, या नगरसेवकानी स्वतः चे शर्ट काढून महापौर व आयुक्ताचा निषेध करून यांच्यावर सिटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदार आंबोरे यांना पत्र देऊन फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.

तसेच या भ्रष्टाचारी महापौर व आयुक्तांना सद्बुद्धी देवो म्हणून हे आंदोलन करण्यात आले. सदरहु आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, देवेंद्र बेले, सुनीता लोढिया, अशोक नागपुरे, अमजद अली, निलेश खोब्रागडे, संगीता भोयर, ललिता रेवलीवर, आदिसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हैसदोडका येथील तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३१ ऑगस्ट) : म्हैसदोडका येथील तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. सुरेश विठ्ठल घागी (२८) रा. म्हैसदोडका असे विष प्राशन करून आपले जीवन संपवलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

आज ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२:३० वाजता च्या दरम्यान स्वतः च्या शेतामध्ये विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्याला मारेगांव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. सुरज हा अविवाहित असून, त्याच्याकडे सुमारे सहा एकर शेती आहे. मात्र,त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

विशेष उल्लेखनीय की, मारेगाव तालुक्यात आत्महत्या चे सत्र सुरूच आहे. दर आठवड्यात सुमारे एक दोन आत्महत्या होत आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. 

एकाच दिवशी दोघांच्या मृत्यूने गावात पसरली शोककळा


सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (३१ ऑगस्ट) : मुसळधार पाऊस झाला आणि वणी तालुक्यातील सोनापूर येथील दोन इसम पुरात वाहून गेले. त्यात सतीश मधुकर देठे (४०) तर राजेंद्र नामदेव उईके (४१) असे वाहून गेलेल्या इसमांची नाव आहेत. ही घटना ३० ऑगस्टला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान उघडीस आली, त्या रोजी वणीसह सोनापूर परिसरात मुसळधार पाऊस झाला, बघता बघता नाले ओढे भरून वाहू लागले होते. मात्र, पाऊस कमी झाला समजून दोघेही राजूर येथे काही कामानिमित्त जाण्यासाठी निघाले असता, ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील सतीश देठे यांचा मृत्यूदेह सकाळी सापडला होता. परंतु राजेंद्र उईके हा बेपत्ता होता. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्याचा शोध सुरु होता, दुपारी राजेंद्र चा ही मृत्यूदेह काही अंतरावर आढळून आला. राजेंद्र यांचा मृत्यूदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. या घटनेने सोनापूरात शोककळा पसरली. 

घुग्घुसला रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न - आ.जाेरगेवारांची उपस्थिती


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३१ ऑगस्ट) : घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड महिला कार्यकर्त्यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण नुकताच घुग्घुस येथे साजरा करण्यात आला. उपराेक्त कार्यक्रमाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या महिला सदस्या नितुताई जैस्वाल यांनी केले होते.

सदरहु कार्यक्रमाला उषा आगदारी, जनाबाई निमकर, माया मांडवकर, गिता बोबडे, सुनिता चुने, विना गुच्छाईत, सुजाता देशकर, बेबी नागतुरे, सलमा सिद्धीक्की, सविता गोहने, जोत्सना मस्के, कामिना देशकर आदीं महिला सदस्या उपस्थित हाेत्या.

मुलानेच काढले जन्मदात्या आईला घराबाहेर, वयोवृद्ध आजार ग्रस्त महिलेला नागपूरच्या संताजी ब्रिगेडने दिला आधार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाचे मुख्य संस्थापक अजयभाऊ धोपटे यांना चित्राताई माकडे यांनी फाेन करुन सांगितले की, स्थानिक दत्तात्रय नगर येथे तीन दिवसांपासून एक वयोवृद्ध महिला रस्त्यावर पावसात झोपून आहे. इतकेच नाही तर ती फार आजारी आहे. त्याच क्षणी कुठलाही वेळ न लावता तात्काळ अजय धाेपटे यांनी ही माहिती संताजी ब्रिगेडच्या टीमला दिली. रवींद्र महाजन यांच्या स्कार्पिओ गाडीने अवघ्या दहा मिनिटात ती टीम त्या ठिकाणी पोहचली. वस्तीतील काही नागरिकांनी त्या वृद्ध महिले बद्दल माहिती देताना सांगितले की, प्रॉपर्टीच्या वादामुळे तिच्याच मुलांने या वृद्ध महिलेस तीन दिवसापूर्वी या ठिकाणी सोडून दिले आहे. टीमने सर्वप्रथम तिच्या मुलाला फोन करून त्या ठिकाणी बाेलिवण्याचा प्रयत्न केला असतांना त्याच वेळी त्या स्थळी त्या वृद्ध महिलेची बहीण आली व तिने सांगितले की या वृद्ध महिलेच्या मुलाच्या भीती पाेटी आम्ही हीची मदत करण्यास असमर्थ झालाे हाेताे. पण आज तुमची टीम आल्यामुळे आमच्यात माेठी हिंमत आली आहे. आता मी तिला आपल्या घरी ठेवून तिची सेवा करण्यास तयार आहे. अशी ती या वेळी म्हणाली. संपूर्ण टीमने त्या वृद्ध महिलेस आधार दिला व सदरहु वृद्ध महिलेस तिच्या बहिणीच्या घरी सुखरुप रित्या पाेहचवून दिले. दरम्यान, याच वेळेस त्या पीडित आजार ग्रस्त वृद्ध महिलेचा मुलगा तेथे आला. टीमने त्याला समजून सांगितले यानंतर तू आईला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला तर तुझी गाठ आमच्याशी आहे. तेव्हा त्याने टीमची माफी मागितली.

या टीमने त्या वृद्ध महिलेची जबाबदारी तिच्या पोराला न देता.तिच्या सख्ख्या बहिणी वर साेपविली वयाेव्रूध्द महिलेला मदत करण्यांस संताजी ब्रिगेडचे विजय भाऊ हटवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, गजानन तळवेकर मुख्य संघटक, रुपेश तेल मासासरे कोषाध्यक्ष, मंगेश साकरकर सहसंघटक, रवींद्र महाजन वरिष्ठ सल्लागार, रवींद्र बावनकर वरिष्ठ सल्लागार, परेश भानारे उपाध्यक्ष नागपूर शहर यांची माेलाची मदत लाभली.

व्‍यंग्‍यचित्रकार प्रभाकर दिघेवार राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (३१ ऑगस्ट) : व्यंगचित्रकले द्वारे उमरखेड नगरीचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा महावितरण कंपनीत कार्यरत प्रधान यंत्रचालक प्रभाकर दिघेवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रभाकर दिघेवार गेल्या जवळपास २५ वर्षांपासून व्यंगचित्रकला क्षेत्रात कार्यरत असून ते आपल्या कलेद्वारे अनेक सामाजिक तसेच ज्वलंत प्रश्नांवर सतत जनजागृती करीत असतात. त्यांचे पर्यावरण क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या ऋतुचक्रात होत असलेला बदल व त्यामुळे शेतकऱ्यांवर कोसळणारे संकट यावरही त्यांनी अनेक व्यंगचित्रांव्दारे प्रकाश टाकला आहे. वृक्षसंवर्धन, पाणी बचत, वीज बचत, रेन हार्वेस्टिंग, हागणदारी मुक्त गाव, स्वच्छता अभियान, इत्यादी अनेक विषयावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते सतत जनजागृती करीत असतात. त्यांची एकूण व्यंगचित्रकार क्षेत्रातील तसेच सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्य पाहून त्यांना सन २०२१ च्या राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वर संस्थान येथे आज एका छोटेखानी कार्यक्रमात गोपालभाऊ अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.विजय माने, भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक वानखेडे, एपीआय गाडे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे पूर्व महाराष्ट्र अध्यक्ष दीपक ठाकरे, सर्व सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख यांनी अभिनंदन व्यक्त व्यक्त केले.

करंजखेड (तांडा) येथे तीज महाउत्सव साजरा

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (३१ ऑगस्ट) : तीज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच. बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव म्हणजेच तीज. मुळात बंजारा समाजातील तीज उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून त्यांच्या तीज उत्सवाला सुरुवात होते.

करंजखेड तांडा येथे बंजारा समाजाचा सण खास करून मुलींच्या वतीने दहा दिवसाचा तीज महोत्सव मोठ्या संख्येने साजरा केला जाते. यावेळी उपस्थित करंजखेड तांड्याचे नायक रामधन राठोड, कारभारी भरोस चव्हाण व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड, पुनाजी जाधव, बाचु राठोड व तालुकाध्यक्ष आर बीपी सुनील प्रकाश राठोड, मनोहर चव्हाण, प्रसराम राजू राठोड, बबन चव्हाण, रामलाल चव्हाण, सूर्यभान राठोड, तानाजी राठोड, करण चव्हाण, सुनील चव्हाण, नरेंद्र आडे, निलेश राठोड, गोकुळ कृष्णा बलवान, विजय चव्हाण, विक्रम राठोड, रामेश्वर पवार, हे हजर होते.

तसेच बंजारा समाजाच्या ज्येष्ठ महिला मंडळी धुरपताबाई रामधन राठोड, कमलाबाई लक्ष्मण चव्हाण, जिजाबाई विश्राम चव्हाण, रंजना ताई गोर बाळूभाऊ राठोड, विमलाबाई बळीराम राठोड, धानी बाई सकरू जाधव, कमलाबाई परसराम जाधव, बेबीबाई जानसिंग जाधव, मंदाबाई बबन चव्हाण, सिंधुबाई सुदाम चव्हाण, शोभाबाई नंदु चव्हाण, सुनिता लव राठोड व सर्व बंजारा समाज मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.  

एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या शासकीय वाहनाला अपघात

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३१ ऑगस्ट) : वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या शासकीय वाहनाला राळेगांव कळंब मार्गावर अपघात झाल्याची घटना काल ३० ऑगष्टला रात्री घडली. यवतमाळ येथे ते कामानिमित्त गेले होते. राळेगाव मार्गे ते वणीला परत येत असतांना त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात एसडीपीओ व वाहन चालक जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यवतमाळ येथे कामानिमित्त गेलेले वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या शासकीय वाहनाला राळेगांव कळंब मार्गावर अपघात झाला. यवतमाळ येथील काम आटपवून ते राळेगांव मार्गे वणीला येत असतांना त्यांच्या वाहनाला राळेगांव कळंब मार्गावरील सावंगी गावाजवळ जवळ समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. अल्पशा विश्रांती नंतर काल पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. पाऊस सुरु असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने भरधाव कार एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या शासकीय वाहनाला जाऊन भिडली. धडक एवढी जोरदार होती की, शासकीय वाहनाचा पार चुराडा झाला. या अपघातात एसडीपीओ संजय पुज्जलवार व वाहन चालक जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या वाहणाला भीषण अपघात


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (३१ ऑगस्ट) : वणी येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचा राळेगाव ते वडकी मार्गावरील सावंगी टर्निंग जवळ भीषण अपघात झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार आपले कार्यालयीन काम आटपुन यवतमाळ वरून राळेगाव मार्गे वणीकडे निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे वाहन चालक परेश मानकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार हे वाहनांनी प्रवास करीत होते. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती राळेगाव येथील ठाणेदार मुडे यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि अपघातात जखमी झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांना यवतमाळ येथील संजीवनी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. बातमी लिहेपर्यंत हा अपघात कशामुळे झाला. अजून पर्यंत माहिती मिळाली नसुन, समोरील तपास राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.

कळंब शहरात अभ्यासिका सुरू करा - राष्ट्रवादी युवती काँग्रेसची मागणी

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (३० ऑगस्ट) : शहरात व तालुक्यात MPSC व UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी यांची संख्या जास्त वाढत असून, त्यांना सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका हवी आहे. अशा मागणीचे पत्र देण्यात आले. सदर निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या जिल्हा अपाध्यक्षा शुभांगी चांदोरे, व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर अध्यक्ष नंदिनी शेंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा मनीषा ताई काटे (भोसले), स्वेता माहुरे, राणी दर्वे, वैशाली गुलाने, वृषाली टेकाम, कल्याणी बुल्ले, सोनाली विधाते, आरती कोडापे, सागर सहारे, वैभव वाटकर, प्रज्वल डगवार, मोठया संख्यने विद्यार्थी उपस्थित होते.

पडोलीच्या विकासासाठी सदैव कटीबध्द - आ. किशोर जोरगेवार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : पडोली हे चंद्रपूरचे स्वागतद्वार आहे. चंद्रपूरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा पडोलीतून जातो. त्यामूळे या भागाचा सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. येथील विकासासाठी आपण ७६ लाखांचे कामे मंजूर केले असून येथील विकासासाठी मी सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
     
काल रविवारी पडोली येथील शेकडो युवकांच्या उपस्थितीत आमदार जोरगेवार यांच्या हस्ते यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यंग चांदा ब्रिगेडचे नेते राकेश पिंपळकर, विक्की रेगन्टीवार, नकुल वासमवार यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
      
आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडमध्ये मोठ्या संख्येने युवक शामील होत आहे. सामाजिक क्षेत्रात संघटना उल्लेखनीय कार्य करीत आहे मात्र या सोबतच या संघटनेच्या माध्यमातून नागरिकांचे अधिकाधिक प्रश्न सोडविण्याचा आमचा मानस आहे. पडोली येथील यंग चांदा ब्रिगेडची शाखा सुरु होत आहे. या शाखेच्या माध्यमातून या भागातील नागरिकांच्या अडचणी माझ्या पर्यंत पोहचाव्यात असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
          
पडोलीचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे या निधीतून येथील सिमेंट काँक्रिटचे मार्ग, स्मशानभूमी, यासह इतर विकासाचे कामे केल्या जाणार आहे. पूढे ही या भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी माझे प्रयत्न असणार असल्याचे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या भागात लाईट नसल्याने येथे हायमास्क असला पाहिजे अशी मागणी आली होती. ती पण आपण पुर्ण केली आहे. आज त्याचे लोकार्पणही संप्पन्न झाले. येथे स्वर्गरथची मागणी आली असून या स्वर्गरथसाठी मी १५ लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसेच या चौकाचे सौदर्यीकरण करणे व येथील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठीही येत्या काळात निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ते म्हणाले,  
गणेश पाचभाई, राहूल सोनकुसरे, राजा शेख, अमोल आमटे, रुपेश गावतुरे, संजू गोलवंशी, राकेश केळकर, बाबा शेख, शेखर मेश्राम, रितेश केळकर, रितीक यादव, चंद्रकांत शेलोटे, निक्की यादव, अमिर शेख, बबलू काजी, सलीम काजी, भाग्यवान गनफुले, दिपक मिश्रा, शुभम ठेमस्कर, अयाम कच्ची, साहिल शेख, रजा शेख, सुरज साव, मुर्तजा शेख, शारुख शेख, अमोल चौधरी, गणेश देशमूख, मुकेश लाळसे, सोनू गुरुनुले, प्रमोद शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती.

चंद्रपूरात निघाला आक्राेश माेर्चा: जननायक बिरसा मुंडा स्मारकाच्या पुनर्स्थापनेसाठी आदिवासी बांधव उतरले आज रस्त्यावर !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : चंद्रपूरात निघाला आक्राेश माेर्चा जननायक बिरसा मुंडा स्मारकाच्या पुनर्स्थापनेसाठी आदिवासी बांधव उतरले आज रस्त्यावर ! 

चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : आज दुपारी १.१५ वाजता आदिवासी बांधवांचा भव्य आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला. सदरहु मोर्चा शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजन करून स्मारकापासुन निघुन चंद्रपूर महानगरपालिकेवर पाेहचला.

महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत स्मारक उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अशोक तुमराम, जितेश कुळमेथे, किशोरभाऊ पोतनवार, प्रदिप गेडाम, नरेन गेडाम, जमुना तुमराम, रंजना किन्नाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आयुक्तांसोबतच्या या चर्चेतुन अजुनही काही फलित हाती येण्याची अपेक्षा नाही अशी उदासवाणी भाषा काही कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केली आहे. 
हा आक्रोश मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मुख्य मार्गावरून पुढे निघत बस स्थानकासमोर १० मिनिटांसाठी मुख्य रस्त्यावर बसुन संपुर्ण रहदारी थांबवण्यात येऊन जाेरदार घोषणाबाजी करण्यांत आली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला असतांना पाेलिस प्रशासनातर्फे थांबवण्यांत आला. येथे मोर्चाचे जाहिर सभेत रूपांतर होऊन यात प्रामुख्याने नरेनजी गेडाम, अंकुशजी वाघमारे, जितेश कुळमेथे, रवी मेश्राम, हिराचंदजी बोरकुटे, प्रल्हादभाऊ कोटनाके व अशोक तुमराम यांची समयोचित भाषणे झालीत. यानंतर एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी स्मारक उभारणी संदर्भात उद्या मंगळवारी दोन वाजता बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या मोर्चात बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी जमुना तुमराम, प्रिती मडावी, वैशाली मडावी, मंगला बुरांडे, ताराबाई आत्राम, जितेश कुळमेथे, अशोक उईके, गोकुल मेश्राम, पुरूषोत्तम सोयाम, पराग खोब्रागडे, बाबा महेशकर व अशोक तुमराम यांनी अथक परिश्रम घेतले. या आक्राेश माेर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधव सहभागी झाले हाेते. दरम्यान आज प्रशासना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मनपा कार्यालय ठिकाणी, व शहरातील काही मुख्य चाैकात पाेलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता.

काँग्रेस प्रदेश कार्यकारणीत कासावार व काळे यांची निवड


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (३० ऑगस्ट) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेत काँग्रेस रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यातूनच महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात वणीचे माजी आमदार वामनराव कासावार व वसंत जिनींग चे अध्यक्ष देविदास काळे यांची वर्णी लागली आहे.
वामनराव कासावार यांची प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून निवड झाली, तर देविदास काळे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. कासावार यांनी वणी विधानसभेचे चार वेळा नेतृत्व केले असून, विधानसभा क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे, तसेच यापूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची ही धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती. याच कार्याची दखल घेऊन त्यांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश केला आहे. तसेच देविदास काळे यांनी ही वसंत जिनींगच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळताच कायापालट केला. त्यामुळे त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये उत्साह दिसून येत आहे.

पाटबंधारे विभागाने प्रकल्पाच्या नावावर शेतकर्‍यांचे स्वप्न केले भंग


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (३० ऑगस्ट) : आर्णी तालुक्यातील कवठा बाजार, कोसदनी, साकुर, मुकींदपुर , दोनवडा, या गावामध्ये सन १९८२- १९८३ साली अधरपुस प्रकल्पाचा नावाखाली भूसंपादन करुन सिंचन विभागाने ३८ वर्षात कुठल्याही सिंचनाचा येथील शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. 
या भागातील ४३ शेतकर्‍यांच्या जमिनी अधर पुस प्रकल्पाचा नावावर सिंचन विभागाने प्रकल्पाच्या नावावर संपादित केल्या गेल्या होत्या पंरतु नाममात्र मोबदला देउन अतिशय उपजाऊ जमिनी अधिग्रहण केल्या गेल्या. पाटसंराचे पाणी शेताला मिळणार या आश्वासनावर शेतकर्‍यांनी जमिनी दिल्या पंरतु ३८ वर्षात सिंचनाचे कुठलेही काम इथवर पोहचू शकले नाही.

या पाचही गावाचा भूभाग डोंगराळ असल्याने प्रकल्पाचे काम अथवा पाणी इथवर पोहचवण्यात असमर्थ आहोत असे सिंचन विभागाने आपले मत व्यक्त केले आहे. 
सतत च्या नापिकी व दुष्काळामुळे व सिंचनाचा लाभ मिळत नसल्याने येथील शेतकरी हतबल झाला असून या अधीग्रहणामुळे काही शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. 
(१)कवठा बाजार २९ एकर ९२ गुंठे , (२)मुकीदपुर ०९ एकर २१ गुंठे, (३)साकुर ८६ एकर ५६ गुंठे, (४)कोसदनी ३४ एकर ०२ गुंठे, (५)दोनवाडा १०० एकर ९१ गुंठे एकुण २६० एकर ६२ गुंठे 

 पाच गावातील अधिग्रहन करण्यात आलेली एकुण जमिन २६० एकर ६२ गुंठे सिंचन विभागाने प्रकल्पाच्या नावावर अधिग्रहण करुन शेतकर्‍यांना प्रकल्पाचा नावावर ठेगा दाखविला आहे.

काही शेतकरी तर भूमिहीन झाले आहे. येथील शेतकरी सनदशिर मार्ग अवलंबून या शेतकऱ्यांच्या जमिनी वरील शासनाचा हक्क काढुन आमच्या जमिनी आमच्या ताब्यात देण्यात याव्या अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्राद्वारे केली आहे.

तालुक्यात बनावट सुगंध तंबाखूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (३० ऑगस्ट) : पांढरकवडासह संपूर्ण तालुक्यात व शहरातील सुगधं भंडार व काही किराणा दुकानात मोजके व्यापारी प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री गेल्या अनेक वर्षा पासून करत आहे. बंदी असलेले हे सुगंधित तंबाखू चक्क बनावट/नकली असतांना सुद्धा नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता झटपट पैसा कमवण्याच्या नांदात ते खुलेआम विकत आहे. परंतु अन्न व औषधी प्रशासन विभाग यावर कुठलीच कारवाई करण्याचे सौदार्य करत नसून याकडे  जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत आहे.

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेता शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी आणली. तसेच अवैधरित्या तंबाखूची विक्री करणाऱ्यावर कायद्याने कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाच्याकडे देण्यात आल्याचे बोलल्या जाते. मात्र, पांढरकवडा शहरातील काही सुगधं भंडार व किराणा दुकानाचे मोजके व्यापारी प्रतिबंधित बनावट/नकली तंबाखूची सर्रास विक्री होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे डोळे झाक होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर पूर्ण बंदी घातली असतांना दरम्यान, या कालावधीत सुद्धा बेभावाने हे व्यापारी तंबाखूची विक्री आपल्या घरूनच करत पान टपरीवाल्या कडून आर्थिक लुटमार करत असल्याची ओरड होत होती. परंतु यावर संबधीत प्रशासनाचे दूर्लक्ष होत होते. आता तर हेच मोजके व्यापारी झटपट पैसा कमावण्याच्या नांदात नागरिकांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करत मजा, हुक्का, ईगल, बागवान, बाबा १२०, रत्ना, आदी सारख्या प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूच्या नावावर चक्क बनावट/नकली तंबाखूची खुले आम विक्री शहरासह ग्रामीण भागात आपल्या मालवाहतूक ने पान टपरी वाल्यांना करत आहे.
यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने संबधित विभाग हा कुंभकर्णी झोपेत तर नाही ना ? असाही सवाल जनमानसात उपस्थित होत आहे.

भाजपा मच्छिमार सेलच्या वतीने भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (३० ऑगस्ट) : भाजपा मच्छिमार सेल च्या वतीने भाजपा ओबीसी मोर्चा पश्चिम विदर्भ संयोजक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष मा.श्री.राजू भाऊ डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केळापूर इथे करण्यात आले.

मार्गदर्शक भाजपचे जिल्हा सचिन किशोर बावणे, सहकारी जिल्हा सचिव डॉ.अंगाईतकर, जिल्हा सचिव शंकर लालसरे व भाजपा मच्छिमार सेल यवतमाळ चे जिल्हा महामंत्री प्रदिप नागोराव भनारकर व ओबीसी आघाडी यवतमाळ चे जिल्हा उपाध्यक्ष रमेश ऊगेवार यांच्या हस्ते करण्यात आले.

पहापडचे शाखा अध्यक्ष प्रविण हामंद, केळापूर चे सामाजिक कार्यकर्ते संजय राऊत, सुनिल पारशिवे, रोशन मसराम, प्रविण भनारकर, राहुल गेडाम, संदीप विश्वकर्मा, प्रविण इजगीलवार, योगेश पारशिवे, राहुल गेडाम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

पुरोगामी साहित्य संसदेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नरेंद्र सोनारकर यांची नियुक्ती


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
बल्लारपूर, (३० ऑगस्ट) : शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघ संलग्नित 'पुरोगामी साहित्य संसद' च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी बल्लारपूर शहराचे रहिवासी पत्रकार,कवी-साहित्यिक, नरेंद्र सोनारकर यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी आणि राज्य कोअर कमिटीने केली आहे.        
     
पुरोगामी महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी, अंधश्रद्धेचे समूळ नष्ट करण्यासाठी पुरोगामी कवी, साहित्यिकांची हक्काची संसद निर्माण व्हावी यासाठी पुरोगामी साहित्य संसद नरेंद्र सोनारकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काम करणार आहे.
सोनारकर यांनी गेली अनेक वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक, साहित्यिक आंदोलनात सक्रिय भूमिका बजावून आपल्या लेखणीने अनिष्ट रूढी, समाज विघातक परंपरा, अंधश्रद्धा यावर प्रखर हल्ला चढविला आहे. परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारांना पेरण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे.
      
साहित्य समीक्षक,प्रखर वक्ता,पत्रकार,कवी, साहित्यिक नरेंद्र सोनारकर यांची साहित्य संसदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने पत्रकार मित्र,साहित्य क्षेत्रातील कवी-साहित्यिकांनी त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. तर अत्यंत चुरशीच्या वेळी विजय सूर्यवंशी यांनी दिग्गजांना डावलून महाराष्ट्राचे अध्यक्षपद दिल्याबद्दल सोनारकर यांनी त्यांचे आणि कोअर कमिटीचे आभार मानले आहे.

तालुक्यातील पाटणबोरीत डेंगू मलेरिया चा शिरकाव

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (३० ऑगस्ट) : तालुक्यातील पाटण (बोरी) सह परिसरात गेल्या एक महिन्यापासून डेंगू च्या रुग्णात वाढ होत असल्याने मलेरिया व डेंगू चा मोठ्या प्रमाणात शिरकाव दिसत आहे. मलेरिया टायफाईड डेंगू  सदृश्य आजारने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

गेल्या दीड वर्षापासून आधीच नागरिक कोरोना महामारीने चिंताग्रस्त असून, आता पुन्हा मलेरिया, टायफाईड, डेंगू या सदृश्य आजाराने  लोकं परेशान आहे. गावोगावी परिसरात डेंगू आजरांची संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. लहान मुलांसह व मोठ्यांना सुद्धा डेंगू ची लागण होत असल्याने सरकारी दवाखान्यात भर्ती होत आहे. तर काही रुग्ण आदिलाबाद, यवतमाळ आणि नागपुर येथील खासगी दवाखान्यात जाऊन आपला इलाज करून घेत आहे.

या गंभीर विषयाची गावापातळीवर उपाय योजना राबविणे आवश्यक असून, गावातील नाली रस्ते, शेणखत, ठिकठिकाणी साफसफाई होत नसल्याने तसेच जागो जागी सांडपाणी जमा होऊन त्या पाण्याचे डबके तयार होत असल्याने रोगराई पसरत असून, रुग्ण संकेत वाढ होताना दिसून येत आहे. येथील ग्रामपंचायत चे साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकात ओरड आहे. परिणामी मलेरिया डेंगूचे रुग्णात वाढ  होत आहे. सध्याचे वातावरण किटक जन्य आजारला पोषक आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून कीटक जन्य सदृश रुग्णांची संख्या वाढत आहे, या रोगराईला आळा घालण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय कीटक जन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच मलेरिया, टायफाईड, डेंगू, चिकन गुनिया, सदृश्य आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी घरासमोर परिसर स्वछ ठेवावा तसेच घरसमोर कुठेही पाणी जमा होऊ देऊ नये, कूलर चे पाणी आठवड्यात बदलत राहावे. शिवाय  गावातील अनेक वार्डालगत शेणखतांचे ढिगारे असल्याने त्यापासून सुद्धा रोगराई पसरत असून, ग्रामपंचायतने या धिगाऱ्यांचा विल्हेवाट लावला असेही मत व्यक्त होत आहे.

गावत सांडपाणी पाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधी, रोगराई पसरत असून, नाल्या वेळीच साफ होत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंच्यायतीने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन गावातील नाली स्वच्छता याकडे लक्ष्य द्यावे. तसेच फॉगिंग मशीन करण्यात यावे, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

सुमेध ऍग्रो ट्रेडर्स तर्फे बोंडअळी नियंत्रण व फवारणी आयोजित

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (३० ऑगस्ट) : दिनांक २९/०८/२०२१ रोज रविवार ला सायंकाळी 6:00 वाजता बोंडअळी नियंत्रण व फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन सभा ठेवण्यात आली होती. सभेला श्री. जाधव साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा, श्री. श्रीकांत जी बोबडे साहेब, गट विकास अधिकारी पं.स.वरोरा, श्री. डोंगरकार साहेब, मंडळ कृषी अधिकारी, श्री. धात्रक साहेब कृषी विकास अधिकारी पं.स. वरोरा, श्री. खिरट्कर साहेब, विस्तार अधिकारी, श्री. लोखंडे साहेब कृषी पर्यवेक्षक, तसेच सरपंच सौ. इंदूताई खिरटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कंपनी प्रतिनिधी तर्फे हरीहरा ऍग्रो बायोटेक चे जिल्हा प्रतिनिधी श्री. धावेकर व प्रसाद जोशी, ट्रपिकल ऍग्रो सिस्टिम चे श्री. अमोल गहूकर, श्री. संगीत काळे, अंकुर सिड्स आणि धरती ऍग्रो केमिकल तर्फे श्री. अभिजीत घोरपडे, रामटेके साहेब, सुमिटोमो केमिकल चे जिल्हा प्रतिनिधी श्री. जावेद शेख, श्री. देठे साहेब, श्री. चामाटे साहेब, यांनी उत्कृष्ट मोलाचे मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे श्री. बादल असुटकर, चेतन माथनकर, श्री. सुभाष आपटे, निखिल सोमलकर यांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजित कार्यक्रमासाठी डोंगरगाव रेल्वे येथील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले. त्या बद्दल समस्त डोंगरगाव वासियांचे सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, वरोरा तर्फे उपस्थितांचे आभार मानले.

चंदनखेडा येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (३० ऑगस्ट) : इनरव्हील क्लब ऑफ वरोरा व अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने चंदनखेडा येथे मोफत नेत्रोपचाराचे तपासणी चे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची खासियत,या शिबिरात योग्य दराचे चस्मे वाटप करण्यात आले. तसेच ज्यांना ऑपरेशन ची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची योग्य किंमतीत ऑपरेशन केले. तसेच शिबिरातील इनरव्हील क्लब च्या वतीने दोन रुग्णांचा ऑपरेशनचा खर्चही भरला गेला.

या कार्य प्रसंगी वरोरा येथील डॉ. लांबट नेत्र तज्ञ् यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी चंदनखेडा येथील डॉ.संतोष झाडे वैद्यकीय अधिकारी, डॉ.जयश्री भोंगळे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुळेवार, सरपंच नानाजी जांभुळे, उपसरपंच भारती उरकांडे, डॉ.जगदीश बोढे, रुग्णवाहिका चालक पवन भोस्कर तसेच आशा वर्कर बुरावार आणि तालेवार यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला आहे.  

सुमारे 500 लोकांनी या शिबिरामध्ये लाभ घेतला. या कार्यक्रमात इनरव्हील अध्यक्षा मधू जाजू, सचिव सौ.À वंदना बोढे, सदस्य दिपाली टिपले, माजी अध्यक्षा तथा अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या अध्यक्षा सौ. माया बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयोजित कार्यक्रमाचे संचालन सौ. माया बजाज यांनी केले तर मधू जाजू यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी क्लब व संमेलनाच्या सर्व पदाधिकऱ्यांनी परिश्रम घेतले.

नकाेड्याच्या शेकडाें कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : देशाच्या राजकारणात काँग्रेस—भाजपाला पर्याय म्हणून, अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्वातील आम आदमी पार्टी फार वेगाने या जिल्ह्यात वाढत आहे. दरम्यान,काल रविवारी चंद्रपूर विधानसभेतील नकोड्याच्या शेकडो युवकांनी गणपती गेडाम यांचे नेतृत्वात आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला.
   
दिल्लीतील सुशासन, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, नेत्यांना मिळत असलेल्या मोफत वीज, पाणी, उत्तम आरोग्य आणि शिक्षण हे सामान्य माणसाला देवूनही देशातील नफ्यातील दिल्ली हे एकमेव राज्य असल्यांचे केंद्र सरकारच्या कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. असे मत सुनील मुसळे यांनी व्यक्त केले. दिल्लीतील सामान्य माणसाचे सरकार, चंद्रपूर जिल्ह्यात विवीध निवडणुकीच्या माध्यमांतून आणण्याचा संकल्प आम आदमी पार्टी जिल्हा कमीटीने केला असून, या दृष्टीने आपचे कार्यकर्ते दिवस रात्र परिश्रम घेत आहे. मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीने सामान्य नागरिकांसाठी केलेले काम, कोरोणा काळात सामान्य रुग्णांना दिलेला दिलासा यामुळे आम आदमी पार्टीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जनता विश्वास ठेवतील असा आशावाद मुसळे यांनी एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.
     
ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती, त्यावेळचा भ्रष्टाचार, भाजपावाले बाहेर काढून 'ईडी, सिबीआय' लावतील अशी त्यांना भिती आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे भविष्य भाजपा—काँग्रेस च्या हातात सुरक्षित नसून, हे दोनही पक्ष एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. 
या परिस्थितीत जनतेला स्वच्छ आणि चांगला राजकीय पर्याय आम आदमी पार्टीच असल्याची खात्री पटत असल्याने, मोठया प्रमाणावर नागरिक आम आदमी पार्टीत प्रवेश करीत आहे. काल प्रवेश करणाऱ्या मध्ये अविनाश भारशंकर, गणेश बावणे, अरुण उमरे, महेश हंसकार, राजू आसपवार, बळेश्वर साहू, शुभम सुबे, प्रेमदास सोयाम, महादेव गेडाम, मनोज दुबे, गणेश देशकर, गंगाधर मांदाडे कवडु नवले यांचेसह शेकडो युवकांचा समावेश आहे.
 
आगामी मनपा, नगर परिषद व इत्तर होणाऱ्या सर्व निवडणूका आम आदमी पार्टी लढविणार असून राजकीय कार्यकर्त्यानी व नागरीकांनी आम आदमी पार्टीत सहभागी व्हावे असे आवाहन आप कडुन यावेळी करण्यात आले.

नकाेडा येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमाला आपचे जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, मयूर राईकवार ,संतोष दोरखंडे, अशोक आनंदे ,अमित बोरकर, सोनू शेत्तियार, धनराज भोंगले, सागर बि-हाडे, विकास खाडे, आशीष पाझारे आदीं उपस्थित होते.

मच्छिन्द्रा येथे खावटी अनुदान योजनेचे जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० ऑगस्ट) : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथील ४० लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेचे उर्वरित किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

आदिवासी विभागातील लाभार्थ्याकरिता महाराष्ट्र शासनाची खावटी योजना आदिवासिंना दिनांक २८ ऑगस्ट रोजी गावातील जेष्ठ नागरिक माजी सरपंच श्रीधर पेंदोर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली. मागील चार महिन्यापूर्वी रुपये २०००/- इतके लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा झाले व उर्वरित अंदाजे २०००/- चे अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावशक्य वस्तूंची किट येथील ४० पात्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली. 
या अनुदान खावटी मध्ये मटकी (१किलो), चवळी (२किलो), हरभरा (३किलो), पांढरा वटाणा (१किलो), तूरडाळ (२किलो), उडीद डाळ (१किलो), मीठ (३किलो), शेंगदाणा तेल (१ लिटर), गरम मसाला (५००ग्रॅम), साखर (३किलो), चाय पावडर (५००ग्रॅम), मिरची पावडर (१किलो), असे ऐकून १८ कि. ग्रॅ. प्लस १ लिटर चा समावेश आहे.

अशा कठीण कोरोना काळात आदिवासिंना खावटी योजनेचा लाभ मिळाल्याचे समाधान पात्र लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. अनुदान योजना वाटप करते वेळी गावातील तरुणांनी मदत म्हणून साहित्य उतरवण्यापासून ते वाटप करण्यापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना मदत केली. त्यावेळी हरिदास पेंदोर, बादल कुमरे, सचिन आत्राम, पुरुषोत्तम सोयाम यांनी हातभार लावला. 

देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहातून चालना


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (२९ ऑगस्ट) : देशभरातील तरुणांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात कॅन्सर स्क्रीनिंग, प्लॅस्टिकपासून दीर्घकालीन टिकणारे रस्ते बनविणे, फिशपॉन्डचे आधुनिकरण, एयर फिल्टरमार्फत इंधन बचत, पोल्ट्री व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना आज कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हॉटेल ट्रायडन्ट येथे आयोजित समारंभात गौरविण्यात आले. तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी स्टार्टअप्सना संपूर्ण प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले. तर, स्टार्टअप्स आणि राज्य शासनामध्ये भागीदारी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
विजेत्या उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. सप्ताहासाठी देशभरातून १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी नोंदणी केली होती, त्यातील निवडक १०० स्टार्टअप्सनी सोमवारपासून ऑनलाईन आयोजित सप्ताहात मंत्री, गुंतवणूकदार, तज्ज्ञ, उद्योजक, शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना आज गौरविण्यात आले. प्रशासनात नाविन्यता आणणारे व अभिनव बदल घडवू शकणारे कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्यसुविधा, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), प्रशासन आणि इतर क्षेत्रातील स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले.
मंत्री नवाब मलिक यावेळी म्हणाले की, राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या या सप्ताहास देशभरातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला. एकविसावे शतक हे डिजिटल क्रांतीचे शतक आहे, यामध्ये जगात भारत देश अग्रस्थानी राहील. महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात आपले विशेष योगदान देत आहे. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याबरोबरच यासंदर्भातील धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. विविध खरेदी, शासनास हव्या असलेल्या विविध सेवा यामध्येही तरुणांच्या नवसंकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना संधी देण्यात येईल. राज्यात महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. यापुढील काळातही युवक-युवती आणि महिलांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी शासनामार्फत विविध निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, देशाच्या ग्रामीण भागासह शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या अनुषंगाने सप्ताहामध्ये सहभागी तरुणांनी विविध संकल्पना मांडल्या. याशिवाय कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या बनलेल्या आरोग्य क्षेत्रासाठीही नवनवीन संकल्पना सादर करण्यात आल्या. मत्सविकाससारख्या क्षेत्रासाठीही तरुण नवनविन संकल्पना शोधत आहेत. या सप्ताहाच्या माध्यमातून या सर्व नवसंकल्पनांना गुंतवणूकदार तसेच शासनापर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. अशा प्रयत्नातून स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. उद्योग विभागामार्फतही यासाठी व्यापक पातळीवर उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. या सप्ताहामुळे शहरी भागासह ग्रामीण तरुणांना व्यासपीठ मिळाले आहे. कृषी, आरोग्य, पाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा अशा विविध क्षेत्रात काम करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळाले आहे. शिवाय त्यांना आपले प्रॉडक्ट उद्योजक आणि शासनासमोर सादर करण्याची संधी मिळाली आहे. या उपक्रमातून तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याने इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कौशल्य विकास विद्यापीठ, आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. अशा विविध उपक्रमांमधून तरुणांमधील व्यावसायिकता, उद्योजकतेला चालना देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सप्ताहाच्या आयोजनामगील भूमिका सांगितली. तरुणांच्या बदलत्या आशा-आकांशांना चालना देणे तसेच त्यांच्यातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा शासन यंत्रणेत वापर करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे. तरुणांचाही शासनासमवेत भागीदारी करण्यामध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून उद्योजक, गुंतवणुकदारांनाही नवनवीन संकल्पना मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिक्षण क्षेत्रातील इलिमिनो किड्स एलएलपी, हेसा टेक्नॉलॉजीज, रिझरव्हॉयर न्युरोडायव्हर्सिंटी कन्सलटंट्स या स्टार्टअप्सना गौरविण्यात आले. तसेच प्रशासन क्षेत्रातील सीव्हीस, डेफिनिटीक्स सॉफ्टवेअर सोल्युशन्स, प्रानटेक मीडीया, कृषी क्षेत्रातील आर्यधन फायनान्शियल सोल्युशन्स, ग्रामहीत, क्रुशक मित्र ॲग्रो सर्व्हीसेस, शापोज सर्व्हीसेस, आरोग्य क्षेत्रातील ब्लॅकफ्रॉग टेक्नॉलॉजीज, हेल्थ व्हील्स, पेरीविंकल टेक्नॉलॉजीज, विंडमिल हेल्थ टेक्नॉलॉजीज, शाश्वत पायाभूत सुविधा आणि मोबीलिटी क्षेत्रातील ग्राउंड रिॲलिटी एन्टरप्राईजेस, क्यूईडी ॲनॅलिटीक्स, स्मॉल स्पार्क कन्सेप्ट्स, योटाका सोल्युशन्स, शाश्वतता क्षेत्रातील आय कॅपोटेक, मॅकलेक टेक्निकल प्रोजेक्ट लॅबोरेटरी, पक्षीमित्र पोल्ट्री टेक्नॉलॉजीज, सोलीनास इंटिग्रीटी तर इतर क्षेत्रातील जेएचकेपी टेक्नॉलॉजीज, नेचर डॉट्स या स्टार्टअप्सना गौरविण्यात आले.
कार्यक्रमात उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, फार्मइजीचे सहसंस्थापक डॉ. धवल शाह, हंड्रेड एक्स डॉट व्हीसीचे संस्थापक संजय मेहता, एसीटी ग्रँटस्चे प्रवक्ते संदीप सिंघल, आयएमसीचे माजी अध्यक्ष राज नायर यांच्यासह सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तहसील कार्यालय महागाव येथे निरोप समारंभ संपन्न


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२९ ऑगस्ट) : तहसील कार्यालय महागाव यांचे वतीने आदरणीय स्वप्नील कापडणीस उपविभागीय अधिकारी उमरखेड तसेच श्री एन.जे. इसलकर तहसीलदार महागाव व इतर कर्मचारी यांना निरोप देण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी देऊळगावकर सर प्रभारी उपविभागीय अधिकारी उमरखेड तथा तहसीलदार उमरखेड अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  विश्वंबर राणे साहेब, डॉ. संतोष आदमूलवाड, सौ. माया ठोके मॅडम मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम स्वप्नील कापडणीस उपविभागीय अधिकारी यांचा सन्मान शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच एन जे इसलकर तहसीलदार महागाव यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर कर्मचारी श्री पाईकराव, भडंगे, पांडे, अश्विनी फाटे, पुरी मंडळ अधिकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी देऊळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की इसलकर साहेब यांनी तहसीलदार पदाचा प्रभार हा उत्तम रित्या सांभाळला. इसलकर साहेब यांनी कर्मचाऱ्यांना व येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपुलकीची वागणूक देऊन सर्व सामान्य जेनतेचे कामे केली व तसेच उपविभागीय अधिकारी कापडणीस साहेब यांचा कार्यकाळ सुद्धा चांगल्या प्रकारे गेला सदर कार्यक्रमाला सर्व कर्मचारी अधिकारी हजर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर एस. एस. अदमूलवाड नायब तहसीलदार यांनी केले तसेच सूत्रसंचालन शंकर चव्हाण व आभार प्रदर्शन राजू वैद्य यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व अधिकारी, कर्मचारी, मंडळअधिकारी, तलाठी, शिपाई व कोतवाल यांनी सहकार्य केले.

कोलगाव येथील लाभार्थ्यांना खावटी योजनेचा किराणा साहित्य वाटप

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (२९ ऑगस्ट) : आज मौजा कोलगाव येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत खावटी योजना ही लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील किराणा वाटप आज लाभार्थ्यांना मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात प्रती पात्र कुटुंबास रुपये २०००/-खात्यावर जमा करण्यात आले होते.

या योजनेतुन ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबाना कोरोना काळात आधार देण्याचा उद्देश आहे. आज कोलगाव येथील लाभार्थ्यांना किरणा साहित्य वाटप करण्यात आले.

त्या वेळी गणेश जेनेकर सरपंच, सौ.निताताई गावडे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व सुमित सोनटक्के सर, मनोज ढेगळे सर, बंडु गिलबिले उपस्थित होते. 

माथार्जून (पाटण आई) येथे शामा दादा कोलाम संघटना समिती गठीत


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२९ ऑगस्ट), : आज दिनांक २९/८/२०२१ ला पाटण आई देवस्थान येथे नविन शामा दादा कोलाम संघटना समिती गठीत करण्यात आली आहे.

त्या मध्ये झरी तालुका अध्यक्ष मा.कैलास लालुजी आत्राम, उपाध्यक्ष मा.पांडु चिनू टेकाम, सचिव मा.देवा गोली टेकाम, कोषधयक्ष मा.संजय रामदास आत्राम, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सर्व सल्लागार मंडळीने मिळुन निर्णय घेतले. यावेळी  सर्व कोलाम बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते, या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष जानराव सोनु दडांजे, उपाध्यक्ष गंगाधर आत्राम, सचिव बाळू आत्राम, सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. तुकाराम आत्राम, माजी अध्यक्ष संतोष मेश्राम, माजी सचिव आत्माराम आत्राम व यवतमाळ चे विजय ढोबरे साहेब व सामजिक कार्यकर्ता सोनेराव आत्राम इत्यादी उपस्थित होते.

अचानक विज पडून ६ बकऱ्या दगावल्या


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२९ ऑगस्ट) : तालुक्यातील दोन घटना ताजी असतांना आता तिसरी घटना समोर आली आहे. वरूड येथील मन हेलावून टाकणारी एक घटना घडली. वरूडच्या टेकडी परिसरात अचानक विज पडून तब्बल ६ शेळ्या दगावल्या, त्या कवडु नागोशे यांच्या शेतालगत चरत असतांना अचानक विज कोसळली आणि सहा बकऱ्या जागीच ठार झाल्या आहे.

ही घटना रविवार (२९ ऑगस्ट) ला ४.३० वाजताचे दरम्यान, घटना घडली असल्याचे कळते.
या दुर्दैवी घटनेत नग ३ जिजा नागोशे यांच्या शेळ्या आहेत, तर महादेव घोसले यांच्या नग ३ शेळ्या दगावल्या आहेत. अशा ऐकूण सहा नग दगावल्याचे कळते. यामध्ये जवळपास ८०/ हजार रूपयांच्या वर नुकसान झाले असल्याचे स्थानिकातून बोलल्या जात असून, शेळी मालकाला आर्थिक मदत मिळावी असे मत व्यक्त होत आहे.

तालुका विविध घटनेने हादरला : मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबता थांबेना!


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२९ ऑगस्ट) : तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी बुरांडा (खडकी) येथील एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. मृतकाचे नाव बळीराम कर्णू धुर्वे (३७) असे आहे.
बळीराम धुर्वे हा बुरांडा (खडकी) येथील रहिवाशी होता. तो ट्रॅक्टर चालक होता. तसेच शेतमजुरीही करायचा. गेल्या १५-२० दिवसांपासून तो गावात नव्हता.  शनिवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी तो गावात परतला होता. त्यानंतर रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास तो घरून निघून गेला होता. रविवारी दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान, गावानजीक असलेल्या विनोद चांदवडकर यांच्या शेतातील बंड्यात बळीरामचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. बळीरामने गळफास घेतल्याचे कळताच पोलीस पाटील बबन जोगी यांनी मारेगाव पोलीस स्टेशन ला  माहिती दिली. मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले,घटनेचा पंचनामा करून मृत्यूदेह शवविछेदनासाठी पाठवला. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप असून रात्री ११ ते १२ दरम्यान, ही घटना घडली असावी असा कयास आहे. बळीराम यांच्या पाठीमागे पत्नी आणि मुलगा आहे.

तर...दुसरी घटना तालुक्यातील रामपूर येथील एका अविवाहित तरुणीने शुक्रवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तरुणीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र, आज तिची प्राणज्योत मालवली. शिवानी महादेव रामपुरे (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. रामपूर येथील रहिवाशी होती. शिवाणीने शुक्रवार दि. २७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेस विषारी कीटकनाशक प्राशन केले. ही घटना माहीत होताच घरच्यांनी शेजारच्यांच्या मदतीने तिला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तरुणीची तब्येत चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शिवानीच्या मृत्यूचे नेमके कारण कळले नाही. 

मारेगाव तालुक्यात दर आठवड्यात सुमारे २ आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहे. मात्र, अद्यापही या गंभीर प्रश्नाकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना प्रशासनाचे.

येणाऱ्या निवडणूका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार - धनंजय गायकवाड


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२९ ऑगस्ट) : आता नगरपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळच येऊन ठेपलेल्या आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने जोमात तयारी करून शहरातील विश्रामगृह येथे येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीचे संदर्भात महिला आघाडी चे वतीने नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये यवतमाळ पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. धनंजय गायकवाड यांनी पक्ष संघटन मजबूत करून गाव तेथे शाखा निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महागाव नगरपंचायत पूर्णपणे ताकत लावून एकजुटीने लढण्याचे आवाहन करण्यात आले.

येणाऱ्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी तालुक्यातील पदाधिकारी यांना दिला तसेच त्यादृष्टीने तयारी करण्याचा सुचना दिल्या, यावेळी धम्मावती वासनिकताई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष यवतमाळ आणि करूनाताई चौधरी यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
          
या बैठकीत प्रकाश डांगे, दिलीप काळबांडे, शे. महेबूब, शे. अहमद शेख हारून, जल्लाउद्दिन काझी यांनी पक्ष प्रवेश केला. धनंजय गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. सौ. वंदनाताई भवरे, तालुकाध्यक्ष शे. अश्फाक शे. आगा, शहराध्यक्ष पप्पूभाऊ कावळे यांनी या बैठकीचे आयोजन केले. 
          
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका सल्लागार रामराव कांबळे, प्रास्ताविक विजय लहाने माजी जिल्हाध्यक्ष व आभार पप्पूभाऊ कावळे यांनी मानले. सौ. शोभाताई कावळे, शकुंतलाबाई वंजारे, गयाबाई सांगडे, बेबीबाई बहाद्दूरे, श्याम कांबळे, सचिव नामदेव लहाने, श्रीराम पवार इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

रासा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या



सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
वणी, (२९ ऑगस्ट) : रासा येथील युवकाची गावालगत  असलेल्या तलावाजवळील काटेरी झुडपात युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला. 

आत्महत्या की घातपात अशी चर्चा परिसरात सुरु असून, रासा येथील निलेश सुधाकर चौधरी (३५ वर्ष) असे नाव आहे. मृतकाच्या अंगावर खरचटलेच्या खुणा आढळुन आल्याने, चर्चेला उधान आले आहे.

घटनेची माहिती गावातील लोकांनी पोलीस प्रशासनाला देताच, पोलीस प्रशासन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
घटनेचा तपास पोलीस प्रशासन करीत असून, तपासा अंती मृत्यूदेहाचे खरे कारण समोर येईल.

मेघा ताई एक उत्तम शिक्षिका

 
संकलन : किरण घाटे

मेघा ताई या एक उत्तम शिक्षिका आहेत, त्याच सोबत साहित्य क्षेत्रात त्या अग्रेसर असून त्यांनी वृत्त पत्रातून स्त्री विषयक विपुल लेखन केले आहे. आकाशवाणी वर त्यांचे बरेच कार्यक्रम झालेले आहे. त्यांना अभिनयाची तसेच नृत्याची खूप आवड आहे. त्या आपल्या कलेतून त्यांनी सावित्रीबाई फुले बोलतेय, विवेकानंद, बाबांना श्रद्धांजली, मोबाईलचा गोंधळ ती फुलराणी असे अनेक एकपात्री प्रयोग सादर करून रसिकांची मने जिंकली, त्यांनी आजवर अनेकदा रक्तदान केलेले आहे.

सामाजिक वनीकरण या माध्यमातून त्या वृक्षारोपण करीत असतात. २०१९ मधे त्यांना महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ नाशिक येथे त्यांनी कृतीसत्रात सहभाग घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.आजपर्यंत बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. २०१९ मधे नवरत्न साहित्य परिषद अहमदनगर यांच्या तर्फे ताईंना नारी रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना कविता लेखनाची सुध्दा आवड असून लवकरच त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांचे विषयी लिहावे तेव्हढे कमीच आहे.

सहजं सुचलं महिला व्यासपीठासाठी मायाताई काेसरे, विजया भांगे, प्रभा अगडे, सुविधा बांबाेडे, विजया तत्वादी, डॉ.अंजली साळवे यांचे सह अधिवक्ता मेघाताई धाेटे यांचे योगदान फार माेलाचे व तेव्हढेच महत्वाचे आहे. हे विसरता येण्यासारखे नाही.

-साै.स्मिता बांडगे
शिक्षिका मूल जि.चंद्रपूर
मो. ९४२१७१८३४७

वरोरा एअरब्रोन अकॅडमी च्या वतीने ६० किमी पद यात्रा


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (२९ ऑगस्ट) : एअरब्रोन अकॅडमी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. कमांडर सागर कोहळे, प्रवीण चिमूरकर, तुराणकर यांच्या नेतृत्वाखाली एअरब्रोन अकॅडमी च्या वतीने वरोरा ते चंदनखेडा पर्यंत ६० किमी पायी पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये ७० मुलींनी सहभाग घेतला होता.

या ६० किमी पद यात्रेतील सहभागी व आयोजकांची सुधीरभाऊ मुडेवार यांनी चंदनखेड्यात राहण्यासाठी व जेवणाची उत्तम व्यवस्था केली. पद यात्रे दरम्यान वाटेत आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व्यवस्था गांधी उद्यान, रॉयल रायडर्स, रोटरी क्लब यांनी केली होती. या ६० किमी पद यात्रेचा उत्साह वाढवण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा, नितेश जैस्वाल, गांधी उद्यानचे मनोज कोहळे, इनरव्हीलच्या अध्यक्षा मधू जाजू, आरोग्य सभापती दिपाली टिपले, माया बजाज, बोधे मॅडम हर्षदा कोहळे, रॉयल रॉयडर्स चे अदनान सिद्दीकोट हे उपस्थित होते.

आयोजकांसह सहभागी मुली वरोरा परत येऊन क्रीडा क्लब येथे ही पदयात्रा समाप्त झाली. यावेळी सर्व मुलींचा सत्कार करण्यात आला व प्रोत्साहन शुभेच्छा दिल्या. एअरब्रोन अकॅडमी वरोराचा स्तुत्य उपक्रमाला 
शहराचे नामवंत आ. नगराध्यक्ष एहतेशाम अली यांच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात यावेळी आले.

स्वताच्या व्हाँट्सअपवर स्टेटस् ठेवून "ताे" आत्महत्या करण्यांस निघाला..

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
स्वताच्या व्हाँट्सअप नंबर वर स्टेटस् ठेवून ताे चक्क आत्महत्या करण्यांस निघाला पण अनेकांच्या समयसुचकते मुळे ताे सहीसलामत बचावल्याची घटना काल शनिवार दि.२८आँगष्टला उपराजधानी नागपूरात घडली. या घटनेतील युवकाचे नांव योगेश नासरे असून ताे खुद्द एक रुग्ण सेवक असल्याचे बाेलल्या जाते. या बाबत असे कळते की नागपूर परिसरातील अनेक रुग्णांना सतत सेवा देणां-या याेगेशने काल स्वतःच्या व्हाट्सअप नंबर वर आत्महत्या करणारी स्टेटस ठेवली होती. शहरातील स्थानिक
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे व्हाट्सअपवर स्टेटस बघितल्यावर सर्व व्हाट्सअप ग्रुप वर हा मेसेज लगेच वायरल केला. एव्हढेच नाही तर संताजी ब्रिगेड पदाधिका-यांनी D.C.P. ऑफिस अजनी येथे पोहोचून अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना योगेश नासरे यांचे व्हाट्सअप स्टेटस दाखवले. लोकेशन माहिती बघताच पोलीस अधिकारी मदतीला धावून आले त्यातही एक देवदूत विष्णू शेजोडे निवासी शेगाव हा फुटाळा तलावाच्या सुंदरी करणाचे काम करत असताना त्याने व्हाट्सअप वरची माहिती बघितली. त्यास त्याच क्षणी फुटाळा तलावाच्या पायरी वर एक संशयित व्यक्ती बसलेला दिसला. ताे व्यक्ती म्हणजे योगेश नासरे हाेता. शेजाेळ यांनी त्यास हाक दिली. तेव्हा तो तिथून निघुन गेला. त्याच वेळी शेजोळ यांनी त्याचा पाठलाग करीत त्याला थांबविण्याचा बराच प्रयत्न केला पण योगेश बाईकवर असल्यामुळे तो समोर निघून गेला. नंतर त्यांनी धावून त्याचा पाठलाग केला. ताे पर्यंत योगेश काही अंतरावर निघून गेला हाेता. याेगेशने त्या ठिकाणी विष प्राशन केले. वेळेचा विलंब न लावता शेजोड यांनी संताजी ब्रिगेडच्या काही पदाधिकार्‍यांना या बाबत माहिती दिली. लोकांच्या मदतीने बाईक वर बसून योगेशला मेडिकल करीता आणित असतांना पाेलिस घटनास्थळी पाेहचले. नंतर अंबाझरी पोलिस स्टेशनच्या मदतीने त्यांस मेडिकल कॉलेजला उपचारार्थ आणण्यांत आले. संताजी ब्रिगेड तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी याेगेशचा प्राण वाचविण्यांसाठी ही महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली.


या कामगिरीत अजय धोपटे विजय हटवार, रवींद्र बावनकर, परेश भांनारे सुरेश शेंद्रे, अमोल नासरे, मंगेश साकरकर व इतर पदाधिका-यांचे सहकार्य लाभले. परंतु या घटनेतील रुग्ण सेवक योगेशने आत्महत्या करण्यांचा निर्णय का घेतला यांचे कारण हे व्रूत्त लिही पर्यंत कळु शकले नाही. या घटनेने अख्ख्या नागपूरात खळबळ उडाली हे मात्र तेव्हढेच खरे आहे.