सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (२९ ऑगस्ट) : तालुक्यातील दोन घटना ताजी असतांना आता तिसरी घटना समोर आली आहे. वरूड येथील मन हेलावून टाकणारी एक घटना घडली. वरूडच्या टेकडी परिसरात अचानक विज पडून तब्बल ६ शेळ्या दगावल्या, त्या कवडु नागोशे यांच्या शेतालगत चरत असतांना अचानक विज कोसळली आणि सहा बकऱ्या जागीच ठार झाल्या आहे.
ही घटना रविवार (२९ ऑगस्ट) ला ४.३० वाजताचे दरम्यान, घटना घडली असल्याचे कळते.
या दुर्दैवी घटनेत नग ३ जिजा नागोशे यांच्या शेळ्या आहेत, तर महादेव घोसले यांच्या नग ३ शेळ्या दगावल्या आहेत. अशा ऐकूण सहा नग दगावल्याचे कळते. यामध्ये जवळपास ८०/ हजार रूपयांच्या वर नुकसान झाले असल्याचे स्थानिकातून बोलल्या जात असून, शेळी मालकाला आर्थिक मदत मिळावी असे मत व्यक्त होत आहे.