सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (१० जुलै) : कळंब शहरातील नेहमीच दुर्लक्षित असलेला परिसर माथा, तथागत नगर, पारवेकर नगर, परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून डेंगी, मलेरिया टायफाईड चे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे यावर नगरपंचायत कळंब यांनी तातडीने लक्ष देऊन परिसरात डासरोधक फवारणी करावी या मागणी संदर्भात मुख्याधिकारी कळंब यांना भारतीय बौद्ध महासभा, भीम टायगर सेना व समता सैनिक दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी जयकुमार भवरे, महेंद्र बलवीर, शुशिलाताई मिचरवाड, प्रमोद तायडे, प्राणिल खिराडे, विक्की नरगडे, रोमांत पाटील, बबलू वाघमारे, स्वप्नील मिचरवाड, भारत जवादे, शुभम पिसे इत्यादी आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते.