एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा; प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिले निर्देश

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (२८ जुलै) : ‘एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा; शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट.

‘एमपीएससी’कडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पद भरती करताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.