सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरात वीज, स्टोरेज क्षमता, भरपूर पाणी ऊपलब्ध असताना सुद्धा शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असा आरोप करत अनेक प्रश्न 'जैसे थे' असल्याने समस्यांचे बाजारगाव असलेल्या वणी शहरातील संपूर्ण प्रश्न तातडीने सोडवण्यात यावे अशा आशयचे निवेदन आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेला देण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, जिल्हा समन्वयक सुधीर थेरे, वणी तालुका प्रमुख संतोष कुचनकर, तालुका संपर्कप्रमुख प्रकाश कराड, उपतालुका प्रमुख लुकेश्वर बोबडे, शहर प्रमुख विनोद ढुमणे, शहर संपर्कप्रमुख राजू तुराणकर, शहर संघटक मनीष बत्रा, अजय चन्ने शहर सचिव, उपशहर प्रमुख राजीव पाटील, राहुल कोलते, आनंद घोटेकर, प्रसिद्धी प्रमुख सांकेत भुजबळ, प्रेमा धानोकर उपसरपंच भांदेवाडा, राजु इद्दे तालुका सचिव, अरविंद राजूरकर उपतालुका प्रमुख, सुभाष कुमरे, विजय ठाकरे, राजू झाडे, भारत डंबारे, यादव आसुटकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
निवेदनकर्त्यांनी शहराला तत्काळ पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करणे, इंदिरा गांधी चौक ते अग्रवाल कंट्रोल यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे कामाची सुरुवात करावी, इंदिरा गांधी चौक परिसरातील खुल्या नालीचे बांधकाम तत्काळ सुरु करण्यात यावे. शहरातील साई मंदीर, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत रस्ता दुभाजकात अती मोठी होणारी झाडे लावण्यात आली आहे, जी मोठे झाल्यानंतर एस टी बस, जड वाहतुकीची मोठी वाहने झाडांच्या फांद्या रस्त्यांवर आल्याने अपघाताचे कारण ठरू शकते अशी नियमबाह्य झाडे दुभाजकातून तत्काळ काढून त्या ठिकाणी निविदेतील नमूद झाडे लावण्या संदर्भात चर्चा कऱण्यात आली. हमीद चौक ते पंचशील चौक
पुढे असंही निवेदनात म्हटलं की,या दरम्यानचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी तसेच ब्राह्मणी रोडवर विवेकानंद शाळेजवळ पाणी साचलेले असून शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच दर रविवारी भरणारा आठवडी बाजार नियोजित जागेवर न भरता रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्यामुळे तो नियोजित जागेवरच भरविण्यात यावा. व आरोग्यच्या दृष्टीने संपूर्ण शहरांमध्ये कीटकनाशक फवारणी करून मच्छर मुक्ती अभियान राबविण्याची मागणी कऱण्यात आली, या संपूर्ण प्रश्नांची नगरपरिषदने गांभीर्याने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही सात दिवसाच्या आत करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा नगर परिषद आवारात धरणे आंदोलनाचा करण्याचा इशारा देण्यात आला आहे.