सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगांव : दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय् हक्कासाठी संविधनात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतीकारी संघटना म्हणजे बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि त्या संघटनेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून दिनांक 14ऑक्टोंबर रोजी नागपुर येथील टिळक भवन येथे दलीत आदिवासी भूमिहीन ओबीसी जमिन हक्क परिषद संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली असुन उद्घघाटक म्हणून लोर्ड बुद्धा टीव्ही चे संपादक भैयाजी खैरकर तर प्रमुख मार्गदर्शक नागपुर विद्यापीठाचे माजी कुलगुरू पुरण मेश्राम, टिळक भवन चे व्यवस्थापक प्रभाकर दुपारे व प्रमुख उपस्थिती आर पी आय नेते महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त अनील गांगुर्डे भारतीय दलीत पँथर चे औंरंगाबाद येथील लक्ष्मण भुतकर सहीत विविध संघटनेचे विचारवंत या परिषदेला उपस्थित राहणार असुन यवतमाळ जिल्ह्यातून बिगर सातबारा शेतकऱ्याने सहभागी व्हावे याकरीता बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा ओबीसी नेते देवराव वाटगुरे यांच्या अध्यक्षतेखाली मांरेगाव येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डा सुखदेव कांबळे, शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे उपस्थित होत्या.