Page

आर्थिक कोंडीने शेतकरी पुत्राची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सततच्या नापिकीमुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. शेतातून निघालेला माल बाजारपेठेत विक्रीला नेल्यास भाव मिळत नाही. पेरणीच्या काळात बँकांकडून पीककर्जासाठी नकारघंटा वाजविली जात आहे. चोहोबाजूने आर्थिक कोंडी होत असल्याने जगावं की मरावं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होत आहे. एकीकडे पेरणीची लगबग सुरू असताना दुसरीकडे पेरणीच्या काळातही शेतकरी असो की शेतकरीपुत्र, मृत्यू चा फास आवळताहेत. 

पत्नी, मुलांना सोबत घेऊन शेतकरी राबराब राबतो. मात्र, त्याच्या हाती कर्जबाजारीपणाशिवाय काहीच येत नाही. मागील वर्षाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाची निसर्गाने माती केली. शेतातून निघालेला माल मिळेल त्या भावात शेतमाल विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

आतापर्यंत तालुक्यात निम्म्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. हातात पैसाच नसल्याने बियाणे, खते आणायचं कुठून अशी परिस्थिती आहे. अशीच काहीशी परिस्थिती केगांव येथील शेतकरी पुत्राची होऊन त्याने शुक्रवारच्या रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांचे वय थकल्याने हा तरुण आपल्या वडिलांच्या शेतात राबत होता. मात्र, सतत च्या नापिकी आणि कर्जबाजारीने पुरता हतबल झाला असता काय करावे, असं चित्र डोळ्यात खेळत,त्याने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवले. त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं व त्यानंतर पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हनुमान प्रभाकर मेश्राम (27) रा. केगांव असे त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचं नाव असून शनिवारी दिनांक 29 जून रोजी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 

त्याच्या पश्चात आई-वडील,एक भाऊ व एक विवाहित बहीण असा बराच मोठा परिवार आहे. घरातील हनुमान हा कर्ताधर्ता असून त्याच्या अकाली निघून जाण्याने मेश्राम परिवारावर मोठं दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

आरतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने केली लॉकअपमध्ये आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : शहरातील आनंदवन येथिल पंचवीस वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (24) रा. चोपडा (जि. जळगाव) ह. मु. वरोरा या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

वरोरा पोलीस स्टेशनच्या कस्टडी मध्येच आज सकाळी साडे आठ च्या दरम्यान बुटाच्या लेसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आरोपी 4 जुलै पर्यंत सात दिवसाच्या पोलीस कोठडीत होता. स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवनात आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीची बुधवारी घरात शिरून आरोपीने हत्या केली होती. प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून झाल्याचा संशय होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान याला गुरुवारी संध्याकाळी अटक केली होती. आरोपीने पोलीस स्टेशन च्या कस्टडी मध्ये आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.
 
या आत्महत्या प्रकरणातील बरेच प्रश्न अनुत्तरीत असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. अजून पर्यंत अधिकृतरित्या पत्रकारांना माहिती मिळाली नसून शव विच्छेदनासाठी वरोरा किंवा चंद्रपूर रुग्णालयात शव नेण्यात येणार असल्याचे कळले.

विकासपुरुष मा.ना.श्री. संजयभाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...


आमच्या कार्यसंघाचे नेतृत्व
केकच्या तुकड्यासारखे वाटणाऱ्या अत्यंत आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमचे मार्गदर्शन आणि मार्गदर्शन खरोखरच प्रेरणादायी आहे आणि इथल्या प्रत्येक शिवसैनिकासाठी आशीर्वाद आहे ! तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टींबद्दल धन्यवाद आणि मी आणि माझी टीम तुम्हाला सतत यशाच्या पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो..!

शुभेच्छुक :- श्री विशाल किन्हेकर 
शिवसेना तालुका प्रमुख, मारेगाव (जि यवतमाळ) 

पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती व वृक्षारोपण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना-युवासेना मारेगाव शाखा यांच्या माध्यमातून हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तालुक्यासह मारेगाव परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर व युवासेना तालुका प्रमुख तुकाराम वासाडे विकसनशील युवा नेतृत्व असून अनेक सामाजिक बांधीलकी जपत गोरगरिबांना कायमच मदत करीत असतात. विकासाचे महामेरू पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गौसेवा व वृक्षारोपण करण्यात आले. अनेक कारणांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असून तो थांबविण्यासाठी वृक्ष जतन करणे काळाची गरज आहे. सर्वांनी वृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी केले. याप्रसंगी विजय मेश्राम उप तालुका प्रमुख, तुकाराम वासाडे युवासेना तालुका प्रमुख, सचिन ढोके युवासेना उपतालुका प्रमुख, डॉ बदकी शहर संघटक, तेजस कापसे युवासेना उपशहर प्रमुख, शंकर नागोसे युवासेना, राज कापसे शहर प्रमुख, कुंदन ताजने, अरविंद परचाके, अनिल राऊत, हरिभाऊ रामपुरे, जीवन वैद्य, महादेव लोणारे, शंकर कापसे यांच्या सह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन वृक्षलागवड केली. विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसैनिकाकडून पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.

आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आदिवासी टायगर सेना आक्रमक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : चंद्रपूर येथील आदिवासी मुलीला जातीवाचक शिवीगाळ, मारझोड व अश्लिल शिवीगाळ करून केस ओढून छातीवर हात लावणारे आरोपी 40 दिवस होऊन अटक न झाल्याने पिढीत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आज आदिवासी टायगर सेना व पीडित मुलीला घेऊन चंद्रपूर येथे पत्रपरिषद घेण्यात आली.

आरोपी वर 16/05/2024 ला भादवी 354(A) (1)(i), 294,506, 34 सह अनुसूचित जातीजमाती (अत्याचार प्रतिबंधक) 3(2)(va),3(1)(W) गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु अजूनही आरोपी प्रबोधकुमार जाडाजी,पंकज सिंग, कुमार पाल हे अजूनही मोकाट आल्याने वारंवार हे फिर्यादी मुलीला धमकी देत आहेत की,केस मागे घ्या. नाही तर जिवे मारू अशी धमकी देत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांनी वारंवार उडवा उडवी चे उत्तर देत आहे.अशी माहिती फिर्यादी मुलींनी आदिवासी टायगर सेना चे अ‍ॅड. संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, प्रा हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष, माजी सैनिक ड्रेफुल आत्राम, जिल्हा उपाध्यक्ष, प्रियंका मडावी जिल्हा युवती अध्यक्ष, रंजीत मडावी जिल्हा अध्यक्ष युवक, विराज सुरपाम जिल्हा महासचिव युवा. ह्यांना निवेदन देऊन व आपबीती सांगितली, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत आदिवासी टायगर सेना च्या वतीने पोलिस अधीक्षक चंद्रपूर, उप विभागीय पोलिस अधिकारी ह्यांना भेट देऊन निवेदन देण्यात आले. तरीही पोलिस विभाग मार्फत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.

आज पत्रकार परिषद घेऊन पोलिस विभाग ह्यांना धारेवर धरले. फिर्यादी युवतींनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, मला व माझ्या परिवाराला काही झाल्यास ह्यांची सर्व जबाबदारी पोलिस विभागाची राहील. तसेच आरोपींना अटक न केल्यास मी आत्मदहन पोलिस अधीक्षक कार्यालय समोर करेल असा ईशारा पत्रपरिषद घेत दिला.

पांढरकवडा येथील बालकाच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड


सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : मोहल्यात राहणाऱ्या मोहल्यातीलच बालकाची त्याच्या सम वयाच्या बालकाने चाकूने वार करून हत्या केल्याने पांढरकवडा शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजता च्या दरम्यान समोर आली आहे.

सय्यद नावेद सय्यद हारून (16) असे मृतक बालकाचे नाव आहे. तो चिकन सेंटर वर मजुरीने काम करत होता, अशी माहिती आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पांढरकवडा पोलिसांनी रात्रीच आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आई नजीमा सय्यद, मोठा मुलगा सय्यद मुनीर, सय्यद नावेद व सर्वात लहान मुलगी अल्फीया सय्यद हे तिघेही रा. चंद्रशेखर वार्ड, पांढरकवडा येथे एकत्र राहतात. नावेद हा पांढरकवडा येथील चिकनच्या दुकानांमध्ये मजुरीचे काम करीत असून तो सकाळीच 7 वाजता कामावर जातो आणि रात्री 9 ते 9.30 वाजता च्या दरम्यान,आपल्या घरी परत येतो. शुक्रवार दिनांक 28/06/2024 रोजी रात्री परत येत असतानाच मोहल्यात राहणाऱ्या वार्डातील बालकाचे रस्त्यात नावेद याच्याशी भांडण सुरू आहे असे समजले. भांडणाच्या दिशेने सय्यद नावेदचे कुटुंबिय गेले असता त्याच्या पाठीत चाकू भोकसला होता, तेव्हाच आईने त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता नावेद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. दरम्यान, घटनास्थळावर आलेल्या फिर्यादी सह बहिण व बहिणीचा पती व नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी गंभीर अवस्थेत असलेल्या सय्यद नावेद सय्यद हारून याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला यवतमाळ येथे हलविण्यात आले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून तो मृत पावल्याचे घोषित केले. या एकसारख्या वयाच्या बालकाची हत्येने शहरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपी केवळ सोळा वर्षाचा असून त्याला रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात 302 अन्वये गुन्हा दाखल केला नेमका खून कोणत्या कारणाखाली केला, याबाबत निश्चित माहिती पोलिसांनी दिली नाही. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केली असून लवकरच आरोपीच्या विरोधात आरोप पत्र तयार करण्यात येईल असेही सांगण्यात आले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार दिनेश झामरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये तपास करीत आहे.

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्धीत येत असलेल्या परीसरात दिवसभर मटका, झंडीमुंडी, तीन पत्ती, गांजा विक्री चा महापूर वाहतो. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी अवैध व्यवसाय समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, अशा आशयचे निवेदन राष्ट्रवादी (पवार गट) च्या वतीने वणी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ व आयुक्त अमरावती यांना देण्यात आले.  
शिरपूर पोलीस स्टेशन च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका बाजार खुलेआम भरतोच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भालर कॉलनी, तरोडा, सुंदर नगर,बेलोरा पुलिया, ढाकोरी, मुंगोली, शिंदोला, अभय फाटा, चारगाव चौकी येथे दिवसभर अवैध धंदे सुरू असुन अनेक ठिकाणावरून या ठिकाणी मटका, जुगार खेळण्यास नागरिक येथे येतात. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून कास्तकार पैसे घेऊन येतात व मटका, जुगार, झंडीमुंडी खेळतात, यात ते संपूर्ण पैसा हारून जातात. त्यामुळे या परीसरात जोमात वाढलेला अवैध बाजार शिरपूर ठाण्याच्या हद्दीतून बंद व्हावा यासाठी वणी शहराध्यक्ष किशोर काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पवार गट) यांच्या नेतृत्वात मागणी करण्यात आली आहे. आजचा युवा वर्ग या अवैध मटका, जुगार, गांजा च्या व्यसनाने उध्वस्त होण्याच्या मार्गांवर असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न होत आहे. पोलीस कारवाई का होत नाही, पंरतु जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्याचा विडा उचलला आहे. त्याला मात्र स्थानिक पोलीसांनी पाठ दाखविली आहे. रोज मजुरी, बांधकाम मजुर या ठिकाणी येवुन मटक्यावर आपले पैसे लावतात त्यामुळे आलेली सर्व मजुरी मटका चालविणाऱ्याला देवुन दारू ढोसुन घरी मुलाबाळांना मारहाण करण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहे. त्यामुळे शिरपूर ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या मटका बाजार त्वरीत बंद करून बाजार पुन्हा सुरू होवु नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी विशेष उपाययोजना आखावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष किशोर काळे यांनी मागणी केली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किशोर काळे युवा शहर अध्यक्ष, मुबीन शेख युवा जिल्हा उपाध्यक्ष, धनराज येसेकर, योगेश्वर चौधरी, शशिकांत चौधरी, प्रशील खाडे,आर्या राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

बिगर सातबारा शेतकरी संघटनेची नागपूर येथे बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नागपूर : राज्यातील दलीत आदिवासी समाजाच्या लोकांनी महसूल व वन जमिनीवर शेती प्रयोजनसाठी अतिक्रमण केलेले असुन दरवर्षी मशागत करून जीवनावश्यक जिन्नसाची पेरणी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. परंतु तत्कालीन सरकारने 12 जुलै 2011 शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे त्या शासन निर्णयामुळे राज्यातील दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी हया धोक्यात आल्या आहेत.

वर्षां नु वर्ष सदर जमिनीवर अवलंबून असलेल्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी जर निष्कासित झाल्या तर हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी लॉर्ड बुद्धा चे भैय्यासाहेब खैरकर यांच्या अध्क्षतेखालील तत्काळ नागपूर येथील नागभवन येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करून आंबेडकर चळवळीतले विचारवंत यांना निमंत्रित करून दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी धोक्यात आल्या असुन तात्काळ उपाययोजना करणे काळाची गरज असल्याचे सांगून लवकरच राज्यव्यापी परिषद नागपूर येथे आयोजित करून सरकारचे लक्ष्य केंद्रित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,असे मत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी बैठकीत व्यक्त केले असता बैठकीला अवरजून उपस्थित असलेले भंते हर्षबोधी यानी सांगितले की दलीत आदिवासी समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेल्या जमिनी जर धोक्यात आल्या असतील तर लवकरच उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या उपस्थित नागपूर येथे राज्यव्यापी परिषद घेण्यासाठी ठराव सर्वानुमते घेण्यात आला व एक शिषटमंडळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती बैठकीत सांगीतली. 

यावेळी मानावी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेश अध्यक्ष अशोक तिडके, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे युवा नेते अजय भाऊ मंडपे, आंबेडकर विचारवंत पुरण मेश्राम, प्रेमलाल उके, भैय्यासाहेब खैरकर, सचिन मुन सहित शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे उपस्थित असुन पहिल्याच बैठकीत दलीत आदिवासी समाजाच्या लोकांना न्याय हक्कासाठी भंते हर्षबोधी यानी उपाय योजना सांगितल्यामुळे बैठकित बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून सर्वांनी आभार व्यक्त केले.





संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात मंदरवासीयांचे निवेदन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा खोळंबा सुरु आहे. संपूर्ण उन्हाळा ग्रामीण भागातील नागरिकांनी त्रास सहन केला. आता पावसाळा सुरु झाला असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साप, विंचू अशा सरपटणा-या प्राण्यांचा वावर असतो. रात्रीच्या वेळी हे प्राणी दिसत नसल्याने अनेकाना या प्राण्यांचा दंश होतो. प्रसंगी लोकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे मंदर येथील रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयात संजय खाडे यांच्या नेतृत्वात अधिका-यांची भेट घेतली. यावेळी निवेदन देत विद्युत वितरण सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन देते वेळी गणेश, देवराव देऊळकर, किशोर बोढे, विजय परसुटकर, प्रतिक बुरडकर, गणेश निखार, अरविंद भट, प्रवीण उपे, संदीप गोपाळकर, संदीप निब्रड, बंडू उपरे, वैभव सोयाम, प्रवीण करडभुजे, आशिष बुच्चे, विजय बोढे, गुरुनाथ आडे, अल्ताफ शेख, अमोल चोपणे, संजय कापसे, महादेव बुचे यांच्यासह मंदर येथील रहिवासी उपस्थित होते.

अन्यथा कार्यालयावर धडक 
तालुक्यात मंदरच नाही तर उकणी, भालर, लाठी इत्यादी गावात देखील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याबाबत अधिका-यांशी चर्चा केली आहे. त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र समस्या सुटली नाही. किंवा रात्री लाईट गेल्याने सर्पदंशासारखा अनुचित प्रकार झाल्यास महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली जाईल. - संजय खाडे 

बसअभावी शालेय विद्यार्थ्यांची सहा किलोमीटर पायपीट


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बसअभावी शालेय विद्यार्थ्यांना सहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यामुळे महागांव बस स्टॉप ते सिंधी-महागावात बस फेरी सुरू करण्यात यावी, अशा आशयचे निवेदन आज (ता.२८) जून रोजी महागांव येथील उपसरपंचांनी वणी आगार प्रमुख यांना दिले. 

शासनाने विद्यार्थ्यांकरिता शिक्षण घेण्याच्या दृष्टीकोणातून शाळेत येजा करण्यासाठी मानव विकास मिशन ची बस सेवा विना मूल्य करण्यात आली आहे. या मानव विकास अंतर्गत ग्रामीण भागाला जास्त प्राध्यान देण्यात आले असून,आजही मात्र तालुक्यातील अनेक गावापर्यंत बस सेवा पोहचत नाही. अशीच काहींसी स्थिती महागांव येथे आहे. 

महागांव बस स्टॉप ते महागांव पर्यंत बस सेवा नसल्याने कुंभा भारत विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बस अभावी पायपीट करावी लागत आहे. परिणामी सन २४-२५ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून उपसरपंच अविनाश लांबट यांनी मानव विकास मिशन व अहिल्यादेवी होळकर अंतर्गत महागांव ते महागांव स्टॉप पर्यंत बस सेवा तत्काळ सुरू करण्याची निवेदनातून मागणी केली आहे. निवेदन देताना सरपंच रामचंद्र जवादे (दापोरा गट ग्रामपंचायत) हे उपस्थित होते. 
 





देवतळे दाम्पत्यांचे सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठे यश मिळाल्यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणूकीसाठी रणनिती आखणे सुरु केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील गटाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही अशी ताठ भूमिका घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणून चंद्रपूरातील माजी जि.प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे आणि त्यांचे पती विजय देवतळे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कार्यवाही सुरु केली असून, त्याचाच एक भाग म्हणून देवतळे दाम्पत्यांचे निलंबन करण्यात आले आहे. विजय देवतळे यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तसेच 2023 मध्ये कृ.उ.बा. समितीच्या वरोरा निवडणुकीत भाजपासोबत हातमिळवणी करुन काँग्रेस उमेदवारांना पराभूत केले होते.

2024 च्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत देखील त्यांची भूमिका पक्षविरोधी होती. यासर्व बाबींचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने देवतळे दाम्पत्यांचे निलंबन केले आहे, असे पत्र त्यांना देण्यात आले आहे.

दरोड्यातील 3 आरोपी नागपूर रेल्वे स्टेशन येथून अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : केळापूर तालुक्यातील करंजी येथील वाहन चालकाला मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना 7 जून रोजी घोगुलधरा (ता. मारेगाव) फाट्यावर घडली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना नागपूर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली.ही कारवाई यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली.

करंजी येथील सलीम सुलतान गिलाणी (44) हे आपल्या वाहनात पॅसेंजर घेऊन जात असताना मारेगाव तालुक्यातील बोटोणीच्या समोर घोगुलधरा फाट्यावर गिलाणी यांना लाथाबुक्क्‌यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यावेळी चाकूचा धाक दाखवून 20 हजार 900 रुपये बळजबरीने हिसकावले. या प्रकरणी पो.स्टे मारेगाव येथे फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरुन अप क्र. 198/24 कलम 395, 364 (अ), 342, 326, 504, 506, भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, इतर आरोपी फरार होते.

फरार आरोपींचा शोध घेत असताना सदर तिघे नागपूर येथून बाहेर राज्यात जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांना मिळाली. त्यावरून सपोनि अमोल मुडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा वणी, पांढरकवडा आणि यवतमाळचे पथक नागपूरकडे सरकारी व खासगी वाहनाने रवाना होवुन नागपुर रेल्वे स्थानक परीसरात वेगवेगळे पथक तयार करुन आरोपींचा कसोशिने शोध घेतला असता आरोंपीना पोलीस दिसताच पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे पथकांनी आरोपींचा पाठलाग करुन रेल्वे स्टेशन परीसरातुन नमुद तीनही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. शुभम सुधाकर कापसे (30) रा. जामनकरनगर यवतमाळ, विकास दिनेश खुडे (31), सूरजनगर यवतमाळ व प्रफुल्ल नारायणराव चौकडे (36) रा. आठवडीबाजार यवतमाळ या तिघांना ताब्यात घेतले. तसेच आरोपींना गुन्हयात वापरलेल्या वाहनाबाबत विचारपुस करुन स्क्रापीयो वाहन क्र (एम एच 14 डी ऐ 2727) किमंत अंदाजे 12,000,00 /- रुपयेची ताब्यात घेवुन आरोपी सह पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन मारेगाव येथे पोहचुन तपासी अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले. 

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात सपोनी अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अमलंदार उल्हास कुरकुटे, नरेश राउत, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, सतिष फुके सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

आनंदवनात २५ वर्षीय तरुणीचा "मर्डर"

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : येथील प्रसिद्ध स्वर्गीय बाबा आमटे यांच्या "आनंदवन" आश्रमात एका पंचवीस वर्षीय तरुणीचा निर्दयी खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस असून, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

आरती दिगंबर चंद्रवंशी (25) रा. आनंदवन वरोरा असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती बऱ्याच वर्षांपासून आनंदवनात आपल्या आई व अंध वडिलांसह राहत होती. या घटनेसंबंधित एका 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आल्याचे समजते आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून आनंदवनमध्ये दाखल होता, आरती चंद्रवंशी हिची हत्या केल्याचे त्याने पोलिसासमोर कबूल केले. त्याने बुधवारीच्या रात्री आरोपी समाधान कोळी रा. चोपडा जिल्हा जळगाव ह. मु. याने आरतीची हत्या केली. 26 जून रोजी आईवडील उपचारासाठी सेवाग्राम येथे होते, ते उशिरा आल्यानंतर तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घरातील बाथरूम आढळून आला होता. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने व जलद गतीने शोध घेतल्यानंतर चोपडा जि.जळगाव ह. मु. वरोरा येथील संशयित आरोपी समाधान कोळी याला अटक केली आहे. गुन्ह्याचा हेतू व पद्धत निष्पन्न करण्याकरता पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.

सदर कारवाई श्री. मुंमक्का सुदर्शन, मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रीना जनबंधू, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती नायोमी साटम, सहायक पोलिस अधीक्षक, उपविभाग वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, स. पो.नी विनोद जांभळे, पो. उप नि धीरज मसराम, पोहेका दिलीप सुर, दीपक दुधे, किशोर बोधे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बदामवार, महेश गवतूरे, रोशन तमशेट्वार यांनी केली.

"यापूर्वीही याच आनंदवनात आत्महत्येचे प्रकरण तापले होते, मात्र वर्ष उलटले. परंतु पोलिसांचे हात अजूनही रिकामेच आहेत, आता ते आत्महत्या प्रकरण कधी उघड होणार का? असा प्रश्न उपस्थित या नुकत्याच "मर्डर" प्रकरणाने होत आहे. "

महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यांना २९ जून पर्यंत पोलीस कोठडी!


सह्याद्री चौफेर | लखन लोंढे 

महागांव : मागील ३ महिन्यापूर्वी महागांव तहसील मधील भ्रष्ट महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यांचे विरोधात पुराव्यासहित भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर, त्याने आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी महागांवच्या ३ पत्रकारांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केले होते. 

हिवरा येथील पांडूरंग सखाराम आंडगे या शेतकर्‍याने पांदण रस्ता खूला करुन मिळण्यासाठी प्रकरण गेल्या ३ वर्षापासून सुरु असून शेतकरी आंडगे यांनी न्याय मागण्यासाठी ५ वेळा उपोषण केले. परंतू महागांव तहसील व जिल्हा प्रशासनाने सातत्याने घोर निराशा करत शेतकरी आंडगे यांना न्याय तर दिलाच नाही. परंतू महसूल खात्याला काळीमा असणारा महसूल सहाय्यक यांनी दि. २१/०६/२०२४ रोजी ४० हजार रुपयाची लाच मागीतली. तडजोडीअंती ३० हजार रुपयांमध्ये बोलणी फिक्स झाली होती.
शेतीसाठी जाण्याकरिता रस्ता नसल्यामुळे त्रासाने मेटाकूळीस आलेल्या शेतकरी पांडूरंग आंडगे यांनी थेट एसीबी कार्यालय, यवतमाळ गाठले, आणि अनेक दिवसापासून भ्रष्टाचार करणारा महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर याला ३० हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडून देवून चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनात खळबळ उडाली आहे. उशीरापर्यंत आरोपी प्रवीणकुमार पोहरकर याची चौकशी सुरु होती. पुसद सत्र न्यायालयाने आरोपी महसूल सहाय्यक प्रवीणकुमार पोहरकर यास २९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे कळते. सदर कार्यवाही लाच लुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या टीमने सापळा रचून ही कारवाई पार पाडली.

मारेगाव ते घोडदरा बस सेवा सुरू करा - ग्रामस्थांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव ते घोडदरा बस सेवा सुरू करावी, अशी मागणी घोडदरा येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.आज गुरुवारी यासंदर्भात वणी आगार यांना निवेदन देण्यात आले. 

मौजे घोडदरा येथील विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी मारेगाव येथे रोज येत असतात. परंतु बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना घोडदरा ते मारेगाव येण्याजाण्यासाठी आटापिटा करावा लागत आहेत. त्यामुळे शिक्षणाची निकड लक्षात घेऊन बस सेवा सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश आत्राम यांच्या नेतृत्वात वणी आगार प्रमुखांना निवेदनातून करण्यात आली. विशेष म्हणजे,घोडदरा ते मारेगाव बस सेवा सुरू करण्यासाठी ग्राम.पं.घोडदरा मासिक सभा दि.10/06/2024 रोजी ठराव सुद्धा घेण्यात आला आहे. 

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते तथा प्रा. शैलेश आत्राम, विनोद आत्राम, शितल परसुटकर नलू धोबे, वंदना राऊत, मेघा सहारे, रत्नमाला नेहारे, प्रतिभा धोबे, सुरेख मेश्राम, सरीता राऊत, हरिदास वऱ्हाटे, प्रकाश सोनटक्के, रघुनाथ आवारी, राजू नवले, नारायण ठाकरे, प्रमोद चांदेकर आदींची उपस्थिती होती. 

निधी अभावी "मोदी आवास" घरकुल बांधकाम ठप्प!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी "मोदी आवास" घरकुल योजना राबविण्यात येत आहे. मात्र, त्या योजनेचा लाभ (निधी) थांबल्याने घरकुल लाभार्थीचा संसार उघड्या वर आला आहे. त्यामुळे "मोदी आवास" घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना राहिलेले देयके त्वरीत देण्यात यावे, अशा आशयचे निवेदन बुधवारी (ता.26) सरपंच संघटनेच्या वतीने पंचायत समिती चे गटविकास अधिकारी भिमराव व्हणखंडे, मारेगाव यांच्या मार्फत मा. हंसराज अहिर, राष्ट्रीय अध्यक्ष इतर मागास वर्ग भारत सरकार नई दिल्ली, यांना देण्यात आले. 

सन २०२३-२४ च्या मोदी (ओ.बी.सी.) आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना जो लाभ (निधी) मिळत होता, त्या निधीला दि. २३/०५/२०२३ पासून ब्रेक लागलेला आहे. मात्र, पावसाळा सुरु झाला असून लाभार्थ्यांचे बांधकाम योजनेच्या देयकापासून ठप्प पडले आहे. निधी अभावी लाभार्थ्यांना थातुर-मातुर झोपड्या करुन आपल्या कुटुंबासह ऐन पावसाळ्यात उघड्यावर गुजरान करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे जिवन धोक्यात आले, असून ही योजना ग्रामीण भागातील लोकांना हिताची कि धोक्याची असा गंभीर प्रश्न लाभार्थ्यातून उपस्थित होत आहे.

तालुक्यातील लाभार्थ्यांची सध्याची अवस्था पाहता,आणि पावसाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन "मोदी आवास" घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना राहिलेले देयके तत्काळ देण्यात यावे,करीता अखिल भारतीय सरपंच परिषदचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मा. हंसराज अहिर, राष्ट्रीय अध्यक्ष इतर मागास वर्ग भारत सरकार नई दिल्ली, यांना निवेदन दिले. 

निवेदनावर अध्यक्ष अविनाश लांबट, सुरेश लांडे, मालाताई गौरकार, राहुल आत्राम, नंदाताई मेश्राम, चंदू जवादे, प्रवीण नान्हे, श्रीकांत गौरकार, ललिता गौरकार, प्रशांत भंडारी,दिलीप आत्राम, शशिकांत तावाडे, गोवर्धन तोडासे, प्रमोद आत्राम, मारोती तुराणकर,रुपेश ढोके, गणेश लांडे, सदाशिव मेश्राम सह सर्व सरपंच उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कास सूट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर व टाटा न्यास (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून खाजगी भागीदारी तत्त्वावर चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या माध्यमातून १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरु करण्यात येत आहे. या फाऊंडेशनला जमीन भाडेपट्टयाच्या करारनाम्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्कातून सूट देण्याचा निर्णाय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
राज्य शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर व टाटा न्यास (ट्रस्ट) यांच्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या खाजगी भागीदारी तत्त्वावरील १०० खाटांच्या कर्करोग रुग्णालयाकरिता चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन या कंपनीस/संस्थेस मौजे चांदा रै., ता.जि. चंद्रपूर येथील १० एकर जमीन ३० वर्षासाठी नाममात्र रू. १/- प्रतीवर्ष या दराने भुईभाडयाने जमीन उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णालयामुळे खेड्यातील तसेच शहरातील सर्वसामान्य स्तरातील कर्करोगग्रस्तांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. यठिकाणी केंद्र शासन व राज्य शासनाच्या आरोग्य योजनेच्या दरामध्ये कर्करोग उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यासह रुग्णासोबतच्या एका व्यक्तीस अत्यल्प दरामध्ये रहिवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अटीस अधीन राहून या फाऊंडेशनला दिलेल्या जागेच्या भाडेपट्टा करारनाम्यास मुद्रांक शुल्क भरणा करण्यापासून सूट देण्यास आज मान्यता देण्यात आली.

महसूल सहायक प्रविण पोहरकर एसीबी च्या जाळ्यात, तीस हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागाव : हिवरा येथील पांडूरंग सखाराम आंडगे या शेतकर्‍याचे पांदण रस्ता खूला करुन देण्याचे प्रकरण गेल्या तिन वर्षापासून सुरु असून शेतकरी आंडगे यांनी न्याय मागण्यासाठी पाच वेळा उपोषण केले.परंतू महागाव तहसील व जिल्हा प्रशासनाने सातत्याने घोर निराशा करत शेतकरी आंडगे यांना न्याय तर दिलाच नाही परंतू महसूल खात्याला काळीमा फासणारा महसूल सहायक याने दि.२१जुन रोजी चाळीस हजार रुपयाची लाच मागीतली.
       
आधीच शेतरस्त्याच्या त्रासामुळे मेटाकूटीस आलेला शेतकरी पांडूरंग आंडगे यांनी थेट एसीबी कार्यालय गाठले आणि अनेक दिवसापासून भ्रष्टाचार करणार्‍या महसूल सहायक प्रविण पोहरकर याला तिस हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडून देवून चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनात खळबळ उडाली आहे.आज उशीरापर्यंत आरोपी प्रविण पोहरकर याची चौकशी सुरु होती. पोलीस उपअधिक्षक यवतमाळ उत्तम नामवाडे यांच्या टीमने सापळा रचून ही कारवाई पार पाडली.

रोजगार हमीची थकीत रक्कम तत्काळ अदा करा- सरपंच संघटनेची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विहीरी मंजुर करण्यात आल्या असुन या योजनेअंतर्गत विहीरीचे बांधकाम सुरु आहे.मात्र, अजुनही अनेक विहीरीचे देयके अदा करण्यात आलेली नाही.त्यामुळे शेतकरी, तथा शेतमजुर अडचणीत सापडले आहेत.

सन 2023-24या आर्थीक वर्षा मध्ये शासनाच्या वतीने 404 विहीरीला मंजुरात देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात कायम स्वरुपी सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी व त्याच्या उत्पन्नात भर पडवा म्हणुन शासनाने ही योजना सुरु केली आहे. या हंगामात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात विहीरीचे बांधकाम पुर्ण झाले असुन अनेक विहीरी बांधकाम पुर्ण होण्याच्या मार्गांवर आहे. परंतु अजुनीही लाभार्थ्याना लाभाची रक्कम वितरण करण्यात आली नाही.त्यामुळे शेतकरी, शेतमजुर अडचणीत सापडला असुन विहिरीच्या बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

थकीत असलेली ही रक्कम तत्काळ अदा करावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषद तालुका शाखा मारेगावचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे यांना देण्यात आले आहे. उपसरपंच सुरेश लांडे, खैरगाव सरपंच रामचंद्र जवादे, कोथुर्ला सरपंच श्रीकांत गौरकार,वनोजा उपसरपंच प्रशांत भंडारी,बोरी सरपंच प्रवीण नान्हे, मारोती तुराणकर, पहापळ सरपंच राहुल आत्राम, टाकळी उपसरपंच दिलीप आत्राम, महिला अध्यक्ष मालाताई गौरकार, पिसगांव सरपंच मंदाताई मेश्राम,पाथरी सरपंच गोवर्धन तोडासे, पाथरी उपसरपंच शशिकांत तावाडे, यांचे सह इतर सरपंच उपसरपंच सदस्य यांची उपस्थिती होती. 

संघर्षाचे दुसरे नाव गीत घोष - उत्तम गेडाम

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : गीत घोष यांचे आयुष्य संघर्षाने असून, घोषित,पिडीत, आदिवासी सर्वहारा माणसांचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी वर्तमान काळातील सुखाचा व गरजांचा त्याग करून त्याग करुन ते आदिवासींच्या हक्कांसाठी बौद्धिक आंदोलनात्मक भुमिका घेऊन लढत आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय असून संघर्षाचे दुसरे नाव "गीत घोष" आहे असे, मत जन्मदिवस सोहळ्यात अध्यक्ष या नात्याने उत्तमराव गेडाम यांनी व्यक्त केले.

सामाजिक योध्दा गीत घोष यांच्या पृथ्वी अवतरण (वाढदिवसाच्या) निमित्ताने त्यांचा जन्म दिवसाच्या निमित्ताने अ.भा.संवैधानिक हक्क परिषद, आदिवासी सोशल फोरम,वणी च्या पुढाकारात हा कार्यक्रम दि.२४ जून २०२४ ला शासकीय विश्रामगृहात वणी येथे आयोजित केला होता. या सोहळ्याचे अध्यक्ष माजी शिक्षणाधिकारी तथा साहित्यिक व कवि मा.उत्तमरावजी गेडाम हे होते, प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मा. मनिषाताई तिरणकर, यवतमाळ, सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई मेश्राम, वणी, आदिवासी सोशल फोरमचे अध्यक्ष मा.रमेश मडावी हे होते.तसेच श्री.भाऊरावजी आत्राम,सौ. मंथनाताई सुरपाम, संतोष चांदेकर, महेश आत्राम, चेतन सुरपाम, हे उपस्थित होते. 

पुढे बोलताना गेडाम सर म्हणाले की, गीत घोष हे आपल्याला आयुष्याचा त्याग देवून कन अन कन, ज्ञान आणि संघर्ष समाजासाठी समर्पित करत आहेत. प्रमुख अतिथीनी बोलताना आमची आज ओळख आहे, ती गीत घोष साहेबांच्या मार्गदर्शन आणि पुढारपणामुळेच निर्माण झाली आहे,असे मत व्यक्त केले. सर्वांनी त्यांना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संतोष चांदेकर यांनी केले तर आभार कृष्णाजी मडावी यांनी मानले.

वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 26 जून च्या सकाळी सहा वाजता अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसिलदार उत्तम निलावाड यांनी पकडून तहसील कार्यालय मारेगाव येथे जमा केले आहे. या कार्यवाहीने वाळू चोरट्या मध्ये चांगलीच धडकी भरली आहे. 

मारेगाव तालुक्यातील आपटी, सावंगी आणि कोसारा येथील शासनाच्या घाटातील रेती 24 जून 2024 पर्यंत डेपोत साठवून, बुकिंग धारकांनाच वाळू देण्याची परवानगी होती. कालावधी संपल्याने महसूलने शिल्लक वाळू (25 जून) ला ताब्यात घेतली. मात्र, बुकिंग च्या नावाखाली काही वाहनधारक एखादी ट्रिप चोरून नेताहेत हे लक्षात येताच आज बुधवारीला सकाळी 6 वाजता सावंगी परिसरातील सावंगी कोसारा या मार्गांवर दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर क्र. (एम एच 34 बी ई 2966) व दुसरे विना नंबरचे ट्रॅक्टर आहे. 

उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या उपस्थितीत कार्यवाही नायब तहसीलदार भगत, मंडळ अधिकारी गुघाने तलाठी सोयाम, शिंगणे, वानखेडे, मडावी व मारेगाव तहसीलचे कर्मचारी यांनी केली. तालुक्यातील अवैध वाळू चोरट्यावर कारवाई सह वाहन जप्ती सातत्याने सुरु राहणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. 

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती उत्साहात


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : राजमाता अहील्यादेवी होळकर यांनी त्याकाळी कुठल्याही सुखसुविधा नसतांनी 29 वर्ष आदर्शवत राज्यकारभार केला. परंतु आता आपल्याला एवढ्या सुखसुविधा असतांनाही आपण त्यांच्या एक कार्य सुध्दा व्यवस्थीत करून शकत नाही ही आजची स्थिती आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शनपर भाषणात त्या बोलत होत्या. कार्यक्रमात दिप पुजन, रॅली, व्याख्यान, नवोदित अधिकारी कर्मचारी यांचा व 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व समारंभाचे आयोजन केले होते. या भरगच्च कार्यक्रमासाठी विचारपीठावर उपस्थित डॉ. विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा सदस्य, क्रिष्णा खोपडे, आमदार पूर्व नागपूर, पांडुरंग मेहर भवानी मंदिर ट्रस्ट्री, राजकुमारी सेलोकर माजी नगरसेविका, मनीषाताई अतकरे माजी नगरसेविका,भगवती पाल अध्यक्ष, डॉ. विनोद बरडे ईत्यादी उपस्थित होते. 

मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांनी राजमाता अहील्यादेवी होळकर यांच्या विचारांवर आदर्शांवर प्रकाश टाकत आताची परिस्थिती व अहील्यादेवी होळकर यांच्या काळातली परीस्थिती यातील फरक समजावून सांगितला. आपण निव्वळ जयंती साजरी करून जमणार नाही तर, त्यासाठी आपल्याला त्यांच्या आदर्शांवर काम करावे लागेल. त्यासाठी मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. सर्वांनी आपलीं जिवनशैलीत बदल केला पाहिजे,आरोग्यदायी जिवनशैलीचा उपयोग अवश्य केला पाहिजे. 

पुढे बोलताना सौ.बरडे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, शाळां बांधल्या, पाणवटे बांधले, न्यायासाठी सुध्दा अहील्यादेवी एकनिष्ठ होत्या, धार्मिक पुजक होत्या, निव्वळ पूजाच करत बसल्या नाही तर कुशलतेने लढाया सुद्धा लढल्यात. अश्या आदर्श राजकारणी, समाजकारणी, रणरागिणी, विरांगणा, लढवैयी अश्या अनेक उपाध्या मिळालेल्या पुण्यश्लोक राजमाता,राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या उपस्थितांना शुभेच्छा देत त्यांचा आदर्श घेवुन आपण आपले आयुष्य सार्थकी लावावे,अशाही अधीसेवीका तथा सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे ह्या म्हणाल्या. कार्यक्रमास विद्यार्थी, महिला व पुरुष व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

आरटीईसंबधी न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रवेश थांबवा गटशिक्षणाधिकारी कोंडवार यांना दिले निवेदन

सह्याद्री चौफेर | संतोष कदम 

दिग्रस : आरटीई प्रवेशा संबंधित न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कॉन्व्हेंट शाळेतील प्रवेश प्रक्रिया रोखण्यात यावी, यासाठी गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांना दि. २४ जून रोजी मो. शहबाज मो. अकिल सह नागरिकांच्या स्वाक्षरीने निवेदन सादर केले. 

आरटीईद्वारे इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांचे विविध कॉन्व्हेंटमध्ये २५ टक्के अंतर्गत प्रवेश सुरू होते. त्याद्वारे खूप विद्याथ्र्यांची आजपर्यंत आश्चर्यकारकरित्या प्रगती झाली. जगातील काही निवडक देशांमध्ये अशा प्रकारची सुविधा सुरू आहे, हि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु सध्या आरटीई प्रवेशाला जी अडचण आलेली आहे. त्याद्वारे शासनच स्वतः केलेल्या विकासात्मक कार्यास अडचण निर्माण करत आहे. सर्वसामान्यरित्या पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश शालेय सत्रात मे ते जूनच्या कालावधीमध्ये घेत असतात. परंतु आरटीई संबंधित निर्णयामुळे येत्या जुलै महिन्यात आरटीई प्रवेशा संबंधित निर्णय येणार, असे झाल्यास पालकांत संभ्रम निर्माण होणार आणि पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या काळजीत, ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना सुद्धा ते व्याजाने पैसे आणून किंवा काहीतरी आर्थीक घडी बसवून विविध कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेणार आणि अशा होतकरू विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व असे नुकसान होणार कारण आपल्या पाल्यांच्या काळजीतून ते काही वर्ष त्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवणार नंतर आर्थिक परिस्थिती विस्कटल्यामुळे त्या विद्याथ्र्यांचे भविष्यातील शिक्षण अपूर्ण राहण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात नमूद आहे. 

पंतप्रधान म्हणतात, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. ऐकूनच आरटीई प्रवेशा संबंधित होत असलेल्या निर्णयाचा सखोल विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, ही सार्थ अपेक्षा, अन्यथा ही भारताच्या उज्वल भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मो. शहबाज मो. अकील, मो सोहेल मी अकील, शे.सोएब मो. अकील, मो- नाहीद अ. कादर, मो-शाहिद अ. रशिद, मो. फैजान म. इरफान, मो. हसनैन म. गाझी, अनमोल विलास कांबळे, शे. अकबर अ. मजीद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पहापळ येथील अपात्र, अंत्योदय व प्राधान्यक्रम योजनेततील लाभार्थ्यांची चौकशी करा - भैय्याजी कनाके यांची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पहापळ येथील शासकीय राशन कार्ड धारक लाभार्थीच्या अंत्योदय व प्राधान्यक्रम योजनेतील लाभार्थी डी वन चौकशीची मागणी भैय्याजी कनाके ग्रा. पं. सदस्य तथा पेसा समिती अध्यक्ष पहापळ यांनी तहसीलदार साहेब (पुरवठा विभाग) यांना करण्यात आली.
तालुक्यातील पंचायत समिती, मारेगाव अंतर्गत येणाऱ्या पहापळ येथील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, शेतमजूर, आत्महत्याग्रस्त, विधवा,आणि अपंगत्व असणाऱ्या लाभार्थ्याला लाभ न पोहचवता आर्थिकदृष्टया व डी वन मध्ये समाविष्ट असणाऱ्या सक्षम लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत, असा आरोप ग्रा. पं सदस्य भैय्याजी कनाके यांनी थेट रास्त धान्य दुकानदार यांच्या वर केला असून निवेदनात असेही म्हटले की, कोणत्या निकषावर सधन शेतकरी यांना प्राधान्यक्रम तथा अंत्योदय रेशनकार्ड देण्यात आले तसेच अंत्योदय रेशन कार्डची फोड करून फोड केलेले अंत्योदय रेशन कार्ड यांना कोणत्या निकषावर कायम लाभ दिला जात आहे. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भैय्याजी कनाके सह ग्रामपंचायत सदश्यांनी केली आहे. 

गावातील पात्र लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेऊन अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत असून याबाबत दिनांक 27/03/2024 ला ग्रामपंचायतच्या मासिक सभेच्या ठरवात पात्र लाभार्थ्यांची निवड करून अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद त्वरित करण्यात यावा व संबंधित राशन धान्य दुकानदारावर वरील नमूदप्रमाणे याची सखोल चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार तथा जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांचेकडे निवेदनातून करण्यात आली आहे. 
निवेदनावर सह्या सौ.वर्षां चौधरी, सौ. वर्षां मांदाळे, श्रीमती शांताबाई ठाकरे, सौ माधुरी ठाकरे, सौ. चंदा शेंडे, सौ संध्या ठेंगणे, सौ संगीता गुरनुले, सौ कौशल्या येरकाडे, सौ. मंगला बोकडे, सौ. सुनीता झोडे,श्रीमती तारा बाई झोडे, सौ. कमल शेंडे, श्रीमती शांताबाई चहारे, श्रीमती सिंधूबाई आत्राम, श्रीमती हिराबाई पिंपळशेडे, सौ तानेबाई झोडे, श्री. प्रफुल शेंडे, श्री. लक्ष्मण शेंडे आदीं च्या आहेत.

शामादादा कोलाम संघटना यवतमाळच्या कार्यकर्त्यांची कळंब-दत्तापूर येथे बैठक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कळंब : क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना यवतमाळ जिल्ह्याची बैठक दिनांक 24 ला कळंब तालुक्यातील दत्त निरंजन माहूर दत्तपूरात जिल्हा अध्यक्ष राहुल आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मा. धाबेकर साहेब, पंडीत घोटेकर, मा. राड्रॉ साहेब, मा.सुरेश मुंडाली, मा गुजाराम दादा, श्री. चांदेकर साहेब, कोलाम समाजाचे जेष्ठ परमपूज्य मोकशे महाराज, समाजसेवक हरिभाऊ रामपुरे, हभप लोणसावले महाराज (सालेभट्टी), श्री.अंकुश कासारकार, श्री. दिलीप मलांडे, श्री. ईश्वर दादा (शा. को. घा ता. अ) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या बैठकीत येणाऱ्या 1 ऑगस्ट 2024 ला शामा दादा कोलाम यांची जयंती निमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपण यासह राजकीय व संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम शामदादा यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

सन 1990 पासून कोलाम समाजातील तीन व्यक्तींनी निवडणूक लढविली होती, त्यांना मिळालेली मते व समाज कुठे मागे पडतो आणि आता काय करायला पाहिजे याबाबत विस्तृत चर्चा झाली, समाज एकजूट असेल आणि आर्थिक भांडवल कमी असले तरी निवडणूक लढवता येत असा मौलिक मंत्र बैठकीत मांडण्यात आला. चांदेकर साहेब यांनी सन 1992 ला लढवलेली निवडणूक आणि त्यातील गोडकडू अनुभव विषद केली. उमेदवार कसा असावा यावर मार्गदर्शन करण्यात आले, जयंती निमित्ताने समाजाने एकत्रित राहण्याचे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप मलांडे तर आभार प्रदर्शन अंकुश गाडेकर यांनी मानले. या आयोजित बैठकीला मारेगाव,कळंब, राळेगाव व घाटंजी तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कळंब व राळेगाव तालुक्यातील माकपाच्या कार्यकर्त्यांची मेटिखेडा येथे बैठक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मेटीखेडा : कळंब व राळेगाव तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा ची संयुक्त बैठक दिनांक २३ ला मेटीखेडा येथील श्यामदादा कोलाम चावडीत कॉ. सदाशिव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या बैठकीत राजकीय व संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम कॉ. शंकरराव दानव यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर वनात राहणाऱ्या अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक भूमिहीन नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी भूमी सुधार कायदा करून जमीन देण्याचे ठरविले. परंतु भूमी सुधार झालाच नसल्याने आदिवासी व अन्य वनात राहणाऱ्या इतर पारंपरिक लोकांनी वन जमीन, रेव्हेन्यू जमीन, देवस्थान जमीन आदी जमिनीवर उदरनिर्वाहासाठी अतिक्रमण करून शासनाच्या कुठल्याही मदतीविना शेती वाहून देशाच्या अन्न उत्पादनात महत्त्वाचा वाटा उचलत आहेत. त्यामुळे मोठ्या कष्टात ते शेती करून उपजीविका चालवीत आहेत. परिणामी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने व अखिल भारतीय किसान सभा देशभरातील ह्या भूमिहीन अतिक्रमित शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून आंदोलन करीत आहेत. सन २००४ साली डाव्या आघाडीचे ६१ खासदार निवडून आले होते. त्यावेळेस कम्युनिस्ट पक्षाचा रेट्याने वनाधिकार कायदा २००६ करण्यात येऊन अंमलात आणला. ह्या कायद्यानुसार प्रत्येक वन जमीन कसनाऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून कम्युनिस्ट पक्ष सातत्याने संघर्ष करीत आहे. पुरावे गोळा करताना आदिवासी बांधवांना अडचण येते म्हणून त्यामध्ये २००८ व २०१२ मध्ये आंदोलनाचे मार्गातून सरकारला कायद्यात बदल करायला लावला. असे असताना आता अनेक भामटे ह्याचा फायदा घेत अतिक्रमण धारकांकडे जाऊन त्यांना जमिनीचे पट्टे मिळवून देतो म्हणून पैसे उकळण्याचे कार्य करीत आहेत. ह्यापासून अतिक्रमण धारकांनी सावध राहून अश्या लोकांना हाकलून लावावे, असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे.

या बैठकीला कळंब व राळेगाव तालुक्यातील अनेक प्रमुख स्त्री व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

तेली समामाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे 

राळेगाव : सन २०२४ मध्ये १० वी १२ वी मध्ये गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा हा दि २२ जुन २०२४ ला रोज शनिवारी तेली समाज तालुका राळेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. अंतरगाव येथील कु.रिया विलास रेवतकर चिखली येथील अनुज धीरज उमाटे, श्रद्धा नंदकुमार भटकर, जान्हवी भोजराज रहाटे, वनोजा येथील पवन सुधीर बुरले, कार्तिक विजय बेलखेडे, अपर्णा प्रभाकर दांडेकर दापोरी येथील, वेदांत विठ्ठल चांभारे,धानोरा येथील कु.वेदिका बालाराम घीणमिने, समीक्षा किशोर फटिंग, तन्मय शंकर डफ, हर्षल गजानन घीणमिने, खैरी येथील ओम विनोद माहुरे, पिंपळगाव येथील कु.अनुश्री धनराज मसुरकार, कु.अनुष्का हेमंत गुजरकर,झरगड येथीलकु जान्हवी रमेश राडे राळेगाव येथील कु.सोनल सुनील साठोणे,हिमांशू प्रदीप पावडे उपरोक्त यादीतील विद्यार्थी यांचा सत्कार तेली समाज राळेगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला. 

यावेळी अशोक काचोळे जिल्हा उपाध्यक्ष तेली समाज, निलेश गुजरकर तातेश्वर पिसे अध्यक्ष राळेगाव तालुका तेली समाज, ज्ञानेश्वर नावाडे उपाध्यक्ष , संदीप क्षीरसागर उपाध्यक्ष उपाध्यक्ष, गणेश बुरले उपाध्यक्ष, अभय मासुरकर उपाध्यक्ष, सुरेश पाटील उपाध्यक्ष, सचिन राडे उपाध्यक्ष, घनश्याम फटिंग सचिव, विनोद नरड सहसचिव, विनोद माहुरे प्रसिद्धी प्रमुख, बाळुभाऊ धुमाळ राळेगाव शहर अध्यक्ष, निलय धिनमिने युवा आघाडी अध्यक्ष, चंदुभाऊ उगेमुगे कोषाध्यक्ष ,मयुर जुमळे सचिव, सचिन शेंडे सहसचिव,सुनिल सावरकर प्रसिद्धी प्रमुख, निखिल बावणे कोषाध्यक्ष, शुभम बेलखेडे सदस्य ,दुर्वेश उमाटे, सदस्य, प्रमोद ढाले सदस्य, रुपेश लाकडे सदस्य, सचिव चंदेनखेडे, सदस्य ,अक्षय जयसिंकर सदस्य,प्रणव देवतळे सदस्य, सुनिल क्षीरसागर सदस्य, पंकज पाटील सदस्य,अभिनव देवतळे. संजय कारवटकर, अँड संदीप राडे, वाल्मिक मुंडे , किशोर फटींग, गोपाल भटकर, सुरज गुजरकर,प्रदीप पावडे,व आदी राळेगाव तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कत्तलखाण्याकरिता वाहून नेणाऱ्या 12 जनावरांची सुटका

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यात अवैध धंदे फोफावले असून अशा अवैध धंद्याना उधळून लावण्यासाठी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. रविवारी सायंकाळी नाकाबंदी करून मुकुटबन मार्गावर 23 लाख 58 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 
दिनांक 23 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी शहरात पेट्रोलिंग करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली की,काही इसम त्यांचे वाहनात जनावरे (गोवंस) कोंबून वाहतूक वरोरा-वणी मुकुटबन मार्गे आदिलाबाद कडे घेऊन जात आहे. खबऱ्याच्या माहितीवरून स्थागुशा पथकाने मुकुटबन मार्गावरील पेटूर गावाजवळ नाकाबंदी करून सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान भरधाव येणाऱ्या चार वाहनांना थांबवून पंचा समक्ष या वाहनाची तपासणी केली असता प्रत्येक वाहनांमध्ये जनावरे (बैल) एकमेकांच्या पायाला आखूड दोरीने बांधून निर्दयीपणे चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबलेल्या स्थितीत दिसून आले. बेलोरा पिकप वाहन क्रमांक (MH 29 BE- 6324), चालक अक्षय अनिल करलुके (वय 28) रा. पूरड-नेरड (ता. वणी), वाहन क्रमांक (MH 32 O- 0237), चालक नितेश रवींद्र किनाके, (वय 22) रा.वंधली ता. वरोरा जिल्हा. चंद्रपुर, वाहन क्रमांक (MH 07 P- 36 68), चा चालक निलेश बंडुजी कोल्हे, 28 वर्ष रा.लोणाराता.ता. समुद्रपुर जिल्हा. वर्धा, बेलोरा पिकप विना नंबर च्या गाडीचा चालक सय्यद शाकीर सय्यद मेहमूद 28 वर्ष रा. चिखलवर्धा ता. घाटांजी जिल्हा यवतमाळ, यांचे ताब्यातील चार वाहनातून 12 बैल व चार वाहन असा एकूण 23 लाख 58 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीकडून चौकशी केल्याने सदर जनावरे सय्यद खय्यम सय्यद गफार रा. मुकुटबन (ता. झरी जामणी) यांच्या सांगण्यावरून वाहतूक करीत असल्याचे सांगितले. सदर जनावरे श्री गुरु गणेश गौशाला, वणी येथे व्यवस्था करण्याकरिता ठेवण्यात आले. आरोपी विरुद्ध वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अप्पर अधीक्षक पियुष जगताप, स्था.गु.शा. पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात सपोनी अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडूरे, पोलिस अंमलदार उल्लास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सतिश फुके सर्व स्था.गु.शा.यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

मंगी वासियांचे आमदार प्रा. अशोक उईके यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राळेगाव : तालुक्यातील मंगी येथील नागरिकांनी राळेगाव विधासभेचे आमदार प्रा. अशोक उईके यांना गावातील विविध समस्यांचे निवारण करण्याबाबत निवेदन देण्यात आले. ते सध्या मतदार संघातील गावागावात भेट देत आहे, गावाकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहे. उईके यांनी मंगी येथेही सदिच्छा भेट दिली, यावेळी शुभम पायघन, स्वप्नील शिंदे, धीरज झाडे, पंढरी रोगे, प्रशांत खडसे, अभिषेक खडसे, नितेश रोगे यासह असंख्य गावकरी उपस्थित होते. 

निवेदनात मंगी डिगडोह ते नागपूर हैद्राबाद महामार्ग ला जोडणारा रोड मागील 10/15 वर्षांपासून नादुरुस्त आहे, तो लवकरात लवकर दुरुस्त करावे, गावातील स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्या येतात विशेषतः पाण्याची समस्या आहे त्या पूर्ण करणे, गावातील जि.प. शाळा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, त्यासाठी आजतागायत शासनाची मदत मिळाली नाही, उलट गावाकऱ्यांनी लोकवर्गणीतून शाळेची डागडुग्गी केली. त्यासाठी आपण स्वतः पाहणी करून शक्य तेवढ्या लवकर पूर्तता करणे, तसेच महत्वाचे म्हणजे शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे ती अडचण तातडीने सोडवणे, वन्य प्राण्यांचा शेतात हैदोस घालून शेत मालाचे नुकसान होत आहे,आपण लोकप्रतिनिधी या मतदार संघांचे असल्यामुळे ह्या समस्यांचे निवारण करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनातून मागणी केली जात आहे. 

पुढे निवेदनात असंही म्हटलं आहे की, आपल्या पक्षाच्या आणि आमदार साहेबांच्या प्रचारासाठी आम्ही झटलो परंतु आमच्या शेताचा माल शेतातून घरी आणण्यासाठी चांगला रस्ता नाही, आमच्या पिढ्यानं पिढ्या शेती करित आहे तरी देखील शेतात जाण्यासाठी धड रस्ता नाही, शेती साठी पाणी मिळत नाही, विजपूरवठा नाही, साहेब तुम्ही आमचे भाग्य विधाते आहात परंतु आपले गरीब जनतेकडे फारसे लक्ष नाही, आम्हाला न्याय द्यावा व निवेदनाची दखल घेऊन उपाय योजना कराव्यात अशी ग्रामवासियांकडून आग्रही मागणी करण्यात आली आहे. 

केळापूर येथे बिगर सातबारा शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पांढरकवडा : दलीत, आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या वनजमिनधारकांच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संविधानात्मक मार्गाने पाठपुरावा करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने केळापूर येथे खरिप हंगामात पेरणी करिता संरक्षण बाबत बैठक बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांच्या अध्यक्षेतेखाली केळापूर येथील जगदंबा संस्थान येथे नुकतीच संपन्न झाली असुन या महत्वपूर्ण बैठकीला संघटनेचे नेते भाई जगदीश कुमार इंगळे उपस्थित होते.

या बैठकीला मार्गदर्शन करताना भाई म्हणाले की,शासनाने हस्तलिखित सातबारा उतारा लिहणे बंद करून संगणकीय प्रणाली मध्ये विकसित केला.परंतु दलीत आदिवासी समाजाच्या लोकांनी महसूल व वन भूमीवर शेतीसाठी अतिक्रमण केले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मशागत व पेरणी करनार आहेत,परंतु पटवारी पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 17प्रमाणे आंदोलनात्मक भूमिका घेऊन पाठपुरावा करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून आंदोलनाची जबादारी दलीत पँथर चे केंद्रीय कार्य अध्यक्ष तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या कडे सोपविण्यात आली आहे. 

मार्गदर्शन करताना भाई म्हणाले की, प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू आहे परंतु महसूल व वन भूमी वर पेरणी केलेल्या पिकांच्या नोंदी घेऊन पिक विमा भरून घेणे अपेक्षित असताना पिकांचा विमा भरून घेतल्या जात नाही म्हणजे सरकार जाती जाती मध्ये माणसा माणसा भेदभाव करत होते परंतु आता पिकासोबत सुद्धा भेदभाव करत असल्याचा आरोप करून विमा हा पिकांचा आहे मग ते पिक बिगर सातबारा जमिनीवरील असो की, सातबारा असलेल्या जमिनी वरील पिक हे पिकचं असते. परंतु पिकसोबत भेदभाव होत असल्यामुळे त्यासाठी सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही असे भाई जगदीश कुमार इंगळे यांनी सांगीतले तसेच ज्या लोकांचा वर्षानुवर्ष जमिनीवर कब्जा आहे अश्या जमिनीवर खड्डे खोदून जमीन निष्कासित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर सुद्धा गांभीर्याने विचार करावा लागेल असे भाई नी बैठकीत सांगीतले.

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अजय भाऊ मंडपे, युवा नेते अजय भाऊ खाडे उपस्थित होते. या बैठकीला बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते उरकुडा गेडाम, मानवी हक्क सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डॉ रेखा मॅडम यानी व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीचे आभार प्रदर्शन पुरुषोत्तम कोडपे यांनी केले असुन झारी (जामणी) तालुका व केळापूर तालुक्यातील अनेक गावचे बिगर सातबारा शेतकरी महिला पुरुष सहभागी होते.

शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरू -मनसे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रशासन व वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने तालुक्यात शेतकरी त्रस्त आहे. “शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्यांना खपवून घेणार नाही”,शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरू, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी पत्रपरिषदेत खडसावून सांगितले.

मारेगाव शासकीय विश्राम गृहामधील आयोजित पत्रपरिषदेत बोलताना उंबरकर म्हणाले, एकीकडे शेतकऱ्यांवर चहूबाजूंनी संकट येत असतानाच पेरणी करण्यासाठी बियाणे खरेदी केल्यानंतर मात्र, काही बियाणे बोगस निघत आहेत. बेरोजगारी वाढली आहे, महावितरण चा भोंगळ कारभार सातत्याने सुरूच आहे, वनविभाग, कृषी विभाग, व तहसील यांचे जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच आता राजू उंबरकर यांनी पत्र परिषद घेऊन तालुक्यातील समस्या उजागर करण्यासाठी सुरुवात केली आहे. विद्यमान लोकप्रतिनिधिवर ताशेरे ओढत लोकप्रतिनिधीचे उदासीन धोरण येथे कारणीभूत ठरत असल्याचा आरोप यावेळी उंबरकर यांनी केला.

तालुक्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असतानाच मनसेसैनिक रस्त्यावर उतरून प्रशासनाचा खरा मुकुट जनतेसमोर आणण्याचं कामं करणार असल्याचा गर्भीत ईशारा देण्यात आला.

या परिषदेत पक्ष नेते राजू उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, महिला तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, उपाध्यक्ष उदय खिरटकर, शेख नबी, आदी तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सारंग बोथले मित्र परिवाराचे शाखा अभियंता यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कायर परिसरातील महावितरण कंपनीच्या जीर्ण झालेल्या विद्युत तारा मुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता बळावल्याबाबतचे निवेदन शाखा अभियंता मुकुटबन यांना 21 जून रोजी देण्यात आले. मात्र, अजूनही यासंदर्भात काही हालचाली झाल्या नसल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभाराची प्रचिती सारंग बोथले मित्र परिवाराने आणून दिली.

कायर रोड मलकापूर परिसरातील वीजेच्या जीर्ण तारामुळे कधी जीवितहानी होईल याचा काहीही नेम नाही. याबाबत संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले,मात्र पावसाळा लागला; दोन दिवस लोटूनही महावितरण कंपनीकडून कोणतीही उपाययोजना करत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सारंग बोथले यांनी सांगितले. आग्रहाची विनंती आहे की,त्वरित नवीन वीज तारा जोडणी करून पुढील अनर्थ टाळावा, अशी मागणी निवेदनातून लवकरात लवकर निकाली काढण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते सारंग बोथले यांचे नेतृत्वात शाखा अभियंता मुकुटबन यांना करण्यात आली.

निवेदन देतेवेळी अक्षय पुल्लेवार, पिंकू गोहोकार, सुरज पुल्लेवार, अनुप चटकी, गणेश देठे, सतीश मोहितकर, व सारंग बोथले मित्र परिवार उपस्थित होते.

वळण रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी गावाचा वळण रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. 

येथील गावाजवळील पूलाचे काम मागील चार महिन्यापासून संत गतीने चालू असल्याने गावाकऱ्यांना बाजूने जाण्यासाठी तयार केलेला वळण रस्ता पुराणे वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकाच पावसात वळण रस्ता वाहून गेला. परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे.

वनोजा देवी मार्गावरील गावालगतचा वळण रस्ता दिनांक 22 जुन च्या रात्री आलेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. हा वळण रस्ता इतका कमजोर आहे, की पहिल्याच पावसाने पूर्ण वाहून गेला. त्यामुळे नाल्या पलीकडील शेतकऱ्यांची पेरणीची कामे, विद्यार्थ्यांची शाळा, आरोग्याचा प्रश्न, दैनंदिन व्यवहार, शासकीय कामे अडली आहे. 

पावसाळा जवळ येत असल्यामुळे या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाची स्पीड वाढवण्यात यावी,पर्यायी मार्ग मजबूत करण्यात यावा, अशी मागणी कंत्राटदाराकडे अनेकदा वनोजा (देवी), येथील नागरिकांनी केली होती. परंतु, यांची दखल न घेतल्याने वळण रस्ता वाहून गेला,ही मानव निर्मित समस्या उभी झाली असून पर्यायी रस्ता प्रशासनाने त्वरित तयार करून द्यावा अशी मागणी वनोजा देवी येथील नागरिक करित आहे.

युवतीचे अंघोळ करताना मोबाईलने फोटो काढत होता, तेवढ्यात…

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आंघोळ करीत असलेल्या युवतीचे मोबाईलने फोटो काढत होता, तेवढ्यात तीची नजर त्याच्याकडे फिरकली आणि हा घृणास्पद प्रकार उजेडात आला. दिनांक 20 जूनला ही कार्यवाही करण्यात आली. मात्र,महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे वाढल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

सतेंद्र सुखरी प्रसाद (25) असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना राजूर (कॉलरी) येथील आहे. तरुणी घरी स्नान करीत असतांना हा आरोपी बाथरूम जवळ आला, व छुप्या पद्धतीने तिचे भ्रमणध्वनी मध्ये शूट करू लागला. परंतु हे दुष्कृत्य करतांना या तरुणांवर तीची नजर फिरकली. तीने आरडाओरड करताच आरोपीने पोबारा केला.

तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. पालकांनी मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. तीने पोलिसांसमोर घडलेला सर्व प्रकार सांगितला. फिर्यादीच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी सतेंद्र प्रसाद याच्या विरुद्ध भादंविच्या कलम 354 (सी), 354(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात दत्ता पेंडकर व जमादार अविनाश बनकर हे करीत आहे.

परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी रद्द करा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : महाराष्ट्र शासन तर्फे विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती 'समान धोरण' नावाखाली घातलेल्या जाचक अटी शिथील करण्याबाबत राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा यवतमाळ तर्फे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
     
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय वि‌द्यार्थीना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये 'समान धोरण' नावाखाली दि. 30/10/2023 रोजीच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे काढण्यात आलेल्या परीपत्रका नुसार जाचक अटी घातल्या आहेत. इ. 10वी, 12वी व पदवीला 75टक्के गुणांची अट घालतानाच शिक्षण शुल्काला 30 ते 40 लाखांची मर्यादा घातली आहे. यामुळे दलित वि‌द्यार्थांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी परदेशी शिष्यवृत्तीचा संपुर्ण खर्च हा शासनाकडून उचलला जात होता. यामध्ये शिक्षण शुल्क, विमान भाडे, मासिक निर्वाह भत्ता आदींचा समावेश होता.

मात्र, आता मा. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बहुजन समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी समान धोरण आखले आहे. त्यामुळे आताच्या परीपत्रकेनुसार पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी 30 लाख आणि पी.एच.डी. करिता 40 लाखांची मर्यादा घालण्यात आली आहे. वार्षीक 12 लाख रुपये निर्वाह भत्ता यातच समाविष्ट करण्यात आलेला आहे. अशा अभ्यासक्रमासाठी सध्या वि‌द्यापीठांचे शुल्क 65 ते 90 लाख असल्याने साहजिकच शासनाची शिष्यवृत्ती अपुरी पडते.

  तसेच 8 लाखांची उत्पन्न मर्यादा असणारा वि‌द्यार्थीच परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार असल्याने अशा उमेदवारांचे वार्षीक 50 लाखांचे शिक्षण शुल्क कुठून द्यावे, हा गंभीर प्रश्न आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यास पुढे पी.एच.डी साठी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही, असाही बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच सरकार 8 लाखांची उत्पन्न मर्यादा आणि 75 टक्के गुणांची अट घालून संविधानातील तरतुदींनाच बगल देत आहे.

या विषयाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय चर्मकार महासंघ विदर्भ प्रमुख संबा वाघमारे यांच्या आदेशाने जिल्हा यवतमाळ तर्फे वणी उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा यवतमाळ चे अध्यक्ष महेश लिपटे सर, वणी शहर अध्यक्ष प्रकाश राजूरकर, युवा जिल्हा उपाध्यक्ष आकाश डूबे, सदस्य योगेश सोनोने, अनिकेत वाघमारे, निलेश वाघमारे द्वारा अटी शिथिल करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

चक्क! तहसील कार्यालयाच्या प्रांगनातून जप्ती केलेले वाहन नेले चोरून

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सिनेस्टाईलने पाठलाग करून तहसीलदार श्री उत्तम निलावाड साहेब यांनी पाच महिन्याअगोदर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना ट्रक वर जप्ती ची कारवाई केली होती. तोच ट्रक मारेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत तहसील प्रशासन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

मारेगाव तालुक्यात अवैध उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांच्या वाळू चोराचे मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग निर्भीडपणे कंबर काम करित आहे. तहसीलदार उत्तम निलावाड हे आल्यापासून आतापर्यंत जवळपास 23 च्या वर वाहनांवर दंडात्मक कारवाया, आणि 4 वाहन धारक यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मारेगांव येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर अमरावती विभागात तस्कराच्या मुसक्या व वाळू वर नियंत्रण मिळवण्यात मारेगाव महसूल विभाग प्रथमस्थानी आल्यामुळे साहजिकच मारेगाव महसूल विभागाचे पथक आणखीच ऍक्टिव्ह झाले आहे. मात्र,दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी जप्ती करण्यात आलेला ट्रक अज्ञाताने तहसीलमधून लांबवीला आहे.

मागील फेब्रुवारी महिन्यात अवैध वाळू उत्खनन करून वाळू भरलेला ट्रक क्र. (MH 36 - 1675) या वाहनावर तालुक्यातील मौजे महादापेठ येथे पाच किलोमीटर सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडला होता. महसूल विभागाने सदरील वाहनातील वाळू तहसील कार्यालयाच्या कंपाउंडमध्ये जमिनीवर टाकून सदरचे ट्रक तहसील आवारात उभा करण्यात आला होता. सदर वाहनाबाबत दिनांक 07/02/2024 रोजी मा. उपविभागीय अधिकारी वणी यांना प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलेला आहे. मात्र, जप्तीच्या जाचक अटीने व  दंडात्मक कारवाईने मागील चार महिन्यापासून जप्त असलेले वाहन (ट्रक) तहसील कार्यालयाच्या समोर उभे लावलेले होते.

दरम्यान, 15 ते 17 जून 2024 या तीन दिवसाच्या सुट्ट्याचा कालावधीत अज्ञाताने हा उभा असलेला ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारातून चक्क! चोरून नेल्याची तक्रार महसूल विभागाने पोलिसात केली आहे. श्री. सतिष गुलाबराव सुरुळकर रा. 771, कबिर वार्ड न. 9 खापा तालुका सावनेर जि. नागपूर या मूळ मालकाचे वाहन असून ट्रकची किंमत रुपये 9,00000/- (अक्षरी नऊ लाख रुपये) आहे. मात्र, या आश्चर्यजनक घटनेने तालुक्यात पुरती खळबळ उडाली असून घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करित आहे.