Page

देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी या महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला.

मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास "स्वीप" च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संचालक दीपाली मासिरकर, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सल्लागार साधना राऊत, `अपने आप` स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू व्यास, नागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर आदी उपस्थित होते.

दीपाली मासिरकर म्हणाल्या, ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आयोजित आजच्या मतदान जनजागृती उपक्रमात एक जागरूक मतदार म्हणून मोठ्या संख्येने सहभागी झालात. तुम्ही जागरूक झालात तुमच्या सोबतच्या सगळ्यांना मतदान करण्यास सांगावे. आपल्या एक-एक मताचे योगदान महत्त्वाचे आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाची प्रक्रिया सुलभ केली आहे. देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत’, असे त्यांनी सांगितले तर मतदानातील सहभागाबाबतही श्रीमती मासिरकर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

श्रीमती मुकादम यांनी मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे, त्यामुळे काय फरक पडू शकतो याचे महत्व या महिलांना पटवून दिले. मतदान करणे हा आपला हक्क आहे. तुम्ही स्वतः मतदान करा आणि आपल्या परिसरातील महिलांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असून तो आपला अधिकार आहे. २० मे २०२४ रोजी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्रीमती राऊत म्हणाल्या, भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक घटकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहेत. या निवडणूक प्रक्रियेत एकही जण मतदानापासून वंचित राहू नये, प्रत्येक घटकाने मतदान करावे व मतदानाचा टक्का वाढावा, हा उद्देश आहे.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना वोटर स्लिपचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी केले. आभार तहसीलदार पल्लवी तभाने यांनी मानले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धोरणात अनेक तृट्या; शेतकऱ्यांत नाराजी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : २०२४-२५ सालाचे पिककर्ज वाटप करण्याकरीता जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून नुकतेच धोरण जाहीर झाले असुन त्या धोरणामध्ये अनेक तृट्या असल्याने सहकारी संस्थाचे कर्जदार शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरलेला आहे. हे अन्यायकरक धोरण तत्काळ रद्द करून नवीन धोरण राबवत सर्व शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करावे, अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्राम, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ,यांच्या वतीने आज (ता.३०) एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार निलावाड यांच्या मार्फत करण्यात आली.

शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे सहकारी संस्थाचे सभासद ३१ मार्च पुर्वी नियमित भरणा केला गेला तसेच काही कारणाने थकीत सभासद असल्याने त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकमुस्त रक्कम भरणा ची योजना (ओटीएस) त्यामध्ये सुध्दा मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेतले व त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने संस्थेच्या सभासदांना वाटप सुध्दा दिला. परंतु या चालु हंगामत मात्र, काही जणांना कर्जवाटपातुन वगळण्यात आल्याचे धोरणामध्ये दिसुन येत आहे, परंतु अशा ओटीएस च्या शेतकऱ्याना वाऱ्यावर सोडण्याएवजी वाटप करण्यात यावा. अशी निवेदनकर्त्यांची मागणी आहे.

शेतकऱ्यांची दिवसेंदिवस दयनिय अवस्था पाहता शेतमालाला भाव नाही. मात्र शेतीला लागणारे सालगडी, बियाणे खते, औषधे, मजुर, यामध्ये भरपुर अशी वाढ होत आहे. परंतु शेतकऱ्यांकडून नियमित कर्जाचा भरणा करुन सुध्दा जिल्हा मध्यवर्ती बँकेने मुद्दलइतकेच वाटपाचे धोरण ठरवुन दिल्यामुळे संस्थेच्या सभासदांना वाटप करणे अवघड झाले आहे. व यामध्ये शेतकरी पुर्णतः हतबल झाले आहे. अनेक शेतकरी शेतीला कंटाळुन आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडे देडी-दुपट्टीने कर्ज काढावे लागत आहे. इतर बँका शेतकऱ्यांना दारात उभे ठेवत नाही. अशातच आपली बँक म्हणुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकारी संस्थांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना जो कर्ज पुरवठा होत असतो,त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हात वर केल्याचे दिसुन येत आहे.तसेच १ एप्रिल
नंतर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा वाटपासंबंधीचे धोरणामध्ये कसल्याही प्रकारची हमी दिलेली नसल्याने कर्जदार कर्ज भरणार नाही व पर्यायाने संस्थेचे थकीतचे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही.
अत्यंत किचकट आणि सुरवातीपासून शेवटपर्यंत गोंधळात टाकणारे धोरण असल्याने त्यातून संस्थेबद्दल असलेली नाराजी अधिकच वाढली आहे. आधीच कर्ज वाटपासाठी विलंब होत आहेत. नवीन हंगाम अवघ्या एक महिन्यावर आलेला आहे. त्यामुळे सदर बाबीचा विचार करुन शेतकऱ्यांच्या सोयीने कर्ज वाटप देण्यात यावे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज वाटपाचे धोरण बदलून त्वरित नवीन धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे करावे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा सहकारी संस्था ह्या कर्ज वाटपच करणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. 

निवेदनावर अध्यक्ष वसंत आसुटकर, अध्यक्ष मनोहर गेडाम, अध्यक्ष गजानन किन्हेकर,अध्यक्ष दिनेश मोहितकर, अध्यक्ष सुदर्शन टेकाम, अध्यक्ष दादाराव टेकाम,उपाध्यक्ष गजानन घोटेकर, अध्यक्ष संदीप आस्वले, अध्यक्ष गणू थेरे, उपाध्यक्ष माणिक पांगुळ, संचालक मारोती गौरकार, संचालक अरविंद वखनोर, संचालक मारोती सोमलकर, संचालक अशोक धोबे, माजी संचालक मारोती ठोंबरे, माजी अध्यक्ष नानाजी डाखरे, संचालक गोपाल खामणकर यांच्या सह इतरही सदस्यांच्या सह्या आहेत. 

कर्ज वाटपामध्ये अनेक जाचक अटी जिल्हा बँकेने संस्थेवर लादल्या गेले आहे. यावरून असे दिसुन येते की, जणुकाही बँकेला शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावयाचेच नाही असे दिसुन येत आहे. शेतीकरीता लागत असलेले भांडवल हे दरवर्षी वाढत असुन जिल्हा बँकेने मात्र जेवढी रक्कम शेतकऱ्यांनी ३१ मार्च पुर्वी भरणा केली तेवढाच वाटप त्यांना देण्याचे धोरणात म्हटल्या गेले आहे. त्यामध्ये उदा. मागील वर्षी १ लाख उचल केलेल्या शेतकऱ्यांना जीएसटी, सीएसटी, शेअर्स, प्रोसेस फी च्या माध्यमातुन दीड ते दोन हजार रुपये कटोती करुन ९८०००/- रुपये शेतकऱ्यांच्या हातात मिळतात व परत पुन्हा नवीन कर्ज मिळण्याकरीता ३१ मार्च पुर्वी एक लाखाचा भरणा करून सुध्दा कर्ज वाटप त्यांना एक लाखापेक्षाही कमी मिळतात अशा परीस्थीतीमुळे शेतकऱ्यांनी काय करायचे हा प्रश्न अनेक कर्जदार शेतकऱ्यांना पडला आहे.

काव्याचा दुर्देवी अंत : साखरझोपेत छकुलीला सापाचा दंश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मोरगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील चौदा महिन्यांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी रात्री दरम्यान घडली. मृत चिमुकलीचे नाव काव्या वैभव खेवले (वय १४ महिने) आहे.

तालुक्यातील टाकळी येथील निवासी आई पल्लवी व अवघ्या १४ महिन्याची आईच्या कुशीत झोपलेल्या काव्या ही खाली  निद्राव्यस्थेत होती. अशातच मध्यरात्री दोन वाजताचे सुमारास लांब लचक मन्यार जातीचा साप त्यांच्या अंथरुणात शिरला व काव्याच्या हळूच पायाला चावा घेतला. दंश करताच छकुली काव्या रडायला लागली. रडण्याचा आवाज येताच आईला जाग आली अन शेजारी विषारी साप निदर्शनास आला. दरम्यान आरडाओरड करताच शेजारील काहींनी तो साप पकडला. 

काव्याला लगेचच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे ठोस उपचारपद्धती नसल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलवित असतांना काव्याचा सकाळी सहा वाजता दुर्देवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शिक्षकांचे गतवैभव काळाच्या पडद्याआड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शिक्षक संघटनेचे नेते, इब्टा संघटनेचे विदर्भ प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ता दिवाकर राऊत यांचे नागपूर येथे उपचाररादरम्यान मिडास हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. शिक्षकांसाठी लढणारा एक अष्टपैलू योद्धा म्हणून ओळख असलेले दिवाकर राऊत आज काळाच्या पडद्याआड गेले.

शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांनी संघटना स्थापन केली होती, या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न शिक्षकांचे निकाली काढले होते. संघटना जिल्ह्यात वटवृक्ष झाला होता गेल्या काही दिवसापासून ते तणावात होते यवतमाळतील शिक्षक पदोन्नती प्रकरणांमध्ये त्यांच्यावर काही आक्षेप घेण्यात आले आणि कारवाईत त्यांना निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून ते तणावात गेले. 

त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि उपचार दरम्यान,अचानक प्रकृती अस्वस्थ झाली आणि काही समजण्या पहिलेच त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला. त्यांच्या मागे दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे.

नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडींनी घेतली मतदान करण्याची शपथ 

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी (स्वीप) कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत आज लातूर शहरात पार पडलेल्या हाके व पांढरे परिवाराच्या लग्न सोहळ्यात नवदाम्पत्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींनी 7 मे रोजी मतदान करण्याची शपथ घेतली.
श्रीनिवास मंगल कार्यालय येथे उत्तम हाके यांचे चिरंजीव दिनेश व किसनराव पांढरे यांची कन्या पूजा यांच्या शुभविवाहाचे औचित्य साधून लातूर जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी रामदास कोकरे, स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा यांनी नवदाम्पत्यासह लग्न सोहळ्यास उपस्थित वऱ्हाडी मंडळींना लोकसभेच्या निवडणुकीत 7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याविषयी आवाहन केले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच विविध समारंभाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. याप्रसंगी शिक्षक सुनिल हाके यांच्या सह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच स्वीप कक्षाचे सदस्य उपस्थित होते.

35 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथून सात किमी अंतरावर असलेल्या नवरगाव (धरण) येथे एका 35 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.

उमेश अशोक नक्षिणे (३५) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने नवरगाव येथील पीठगिरणीच्या बाजूला असलेल्या गोठ्यात दोरीच्या सहाय्याने आज सोमवार (29) ला दुपारी अंदाजे 2 वाजता चे दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. 

त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मृतक उमेश याच्या पाठीमागे पत्नी आई एक मुलगा एक मुलगी व मोठा भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 
मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून ही मालिका थांबता थांबेना. मागील आठवड्यात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना पुन्हा आज आत्महत्या ची घटना समोर आल्याने प्रशासनाने तालुक्यात आत्महत्यासारख्या गंभीर विषय रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.

आंबेडकरी समाज हा जगाचे बौद्धिक नेतृत्व करणारा -प्रा. माधव सरकुंडे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळअलिकडच्या काळात संविधानाचे लचके तोडण्यात येत आहेत. सामान्य माणसाचे मूलभूत अधिकार नाकारले जात आहेत. अशा अटीतटीच्या वेळी इतर सर्व लहान मोठ्या समूहांनी स्वत:ला आंबेडकरी चळवळीशी जोडून घेतले पाहिजे. जगातील सर्व धार्मिक समूह हे अवैज्ञानिक क्रियाकलापात व्यस्त असून चिकित्सेला नकार देत आहेत. बुद्ध मात्र सर्व प्रकारच्या आणि सर्व स्तरातील चिकित्सेला प्राधान्य देतो. आंबेडकरी समाज हा वैज्ञानिक जाणीवा असणारा समूह असल्याने तोच जगाचे बौद्धिक नेतृत्व करू शकतो असे प्रतिपादन प्रा. माधव सरकुंडे यांनी केले. ते 'संघर्षस्तंभ' या डॉ अशोक कांबळे गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री वसंत पुरके होते. स्थानिक एकविरा हॉटेल येथे गौरव ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचारमंचावर चित्रकार बळी खैरे, डॉ. प्रकाश राठोड, कवी प्रशांत वंजारे, प्रा. अशोक कांबळे उपस्थित होते.

प्रा. सरकुंडे म्हणाले, आंबेडकरी चळवळीमुळे जीवनाचे मर्म समजते. जीवनाचे ध्येय समजते. उपक्रमशीलता, प्रयोगशीलता आणि वैचारिक दिशा केवळ आंबेडकरी चळवळीतूनच मिळू शकते. आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले पाहिजे.
प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर म्हणाले, अलिकडच्या दहा वर्षांत इतिहास, समाजकारण, सांस्कृतिक वलय या गोष्टींचा अक्षरशः विपर्यास करण्यात आला असून सामान्य माणसांवर खोट्या गोष्टी लादण्यात आल्या आहेत. सर्व संविधानिक स्वायत्त संस्था सत्ताधाऱ्यांनी नियंत्रित केल्या असून या सर्व स्वायत्त संस्था सत्तेच्या बाजूने झुकल्या आहेत. त्यामुळे समकाळाची गंभीर समिक्षा करण्याची गरज आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री वसंत पुरके म्हणाले, मतांसाठी कुठल्याही थराला जाण्याची सत्ताधारी राजकीय लोकांची प्रवृत्ती घातक आहे. राज्यकर्ते अंधश्रद्धेचा प्रसार करून जनतेला भ्रमित करत आहेत त्यामुळे जनतेने जागृत होऊन लोकशाही वाचवली पाहिजे. 'प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय असणे' हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा प्रखर राष्ट्रवाद प्रत्येकाने अंगात रूजवला पाहिजे. 
यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, चित्रकार बळी खैरे, प्रशांत वंजारे, डॉ. अशोक कांबळे यांनी सुद्धा समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. युवराज मानकर यांनी,सूत्रसंचालन कवी सुनील वासनिक यांनी तर आभार युगंधरा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला साहित्य रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

रहदारीच्या मार्गांवर चौकीदाराची दरोडेखोरांनी केली हत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : यवतमाळ-वणी या रहदारीच्या राज्यमार्गांवरील एका गोडावूनच्या बाहेर झोपलेल्या चौकीदाराची हत्या करून अज्ञात दरोडेखोरांनी सलाखीचे वजनी बंडल लांबवल्याची घटना आज सोमवारला सकाळी उघडकीस आली. 

मृतक हा साठ वर्षाचा असून जीवन विठ्ठल झाडे रा. आष्टोना (ता. राळेगाव) असे त्याचे नाव आहे. मात्र,चौदा हजाराच्या सलाखी साठी निष्पाप चौकीदाराची हत्या केल्याने व्यापारीवर्गात कमालीची दहशत निर्माण झाली आहे. 
प्राप्त माहितीनुसार वणी येथील सिमेंट व स्टीलचे व्यावसायिक योगेश ट्रेडर्सचे मालक सुरेश खिंवसरा यांचे यवतमाळ-वणी राज्यमार्गावर सिमेंट गोडावून आहे. त्या गोडाऊनची रखवाली राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथील जीवन झाडे हा व्यक्ती करित असून मागील दहा वर्षापासून खिंवसरा यांचेकडे चौकीदारीचे काम करत होता. काल रविवारीचे रात्री चौकीदार हा गोदामच्या बाहेरील ठिकाणी बाजेवर झोपला होता. दरम्यान, रात्री आलेल्या अज्ञात लोकांनी बाहेर झोपलेल्या चौकीदाराच्या डोक्यावर तसेच पाठीवर जबर हल्ला करुन त्याची हत्या करून दरोडेखोरांनी गोदामाच्या बाहेर ठेवलेले सळाखीचे 4 बंडल अंदाजे किंमत 14 हजार रुपयाचे वाहनात टाकून पोबारा केला. 
आज सोमवारला सकाळी योगेश ट्रेडर्सचा दिवाणजी रोजच्या प्रमाणे गोदामावर गेला तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेबाबत त्याने तत्काळ गोदाम मालक सुरेश खिंवसरा यांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वणीचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी आपल्या चमू सह घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेबाबत फिर्यादी सुरेश खिंवसरा यांनी ठाण्यात तक्रार नोंद करताच वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्याने घेत  प्रकरण तपासात घेतले आहे.


शेतातील बंड्यात साठवून ठेवलेली मिर्ची गेली चोरीला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या रासा शिवारात रस्तालगत असलेल्या एका शेत बंड्याचे कुलूप तोडून सहा पोते सुकेलेली मिरची अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना 25 एप्रिल रोजीच्या रात्री घडली.

भारत कुमरे रा.वणी असे शेतकऱ्याचे नाव आहे. यांचे शेत घोंन्सा मार्गावरील रासा शिवारात रस्ताच्या लगत असून शेतात शेतीउपयोगी साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी बंडा बांधलेला आहे. त्यांनी शेतात लावलेली मिरची तोडून बंड्यात ठेवली होती. दरम्यान,मिरची चे दर बाजारामध्ये घसरण असल्याने ती मिरची सध्या शेतातील बंड्यामध्ये साठवून ठेवली होती. मात्र, या जमा करून ठेवलेल्या बंड्यातील मिरची वर अज्ञात चोरट्यांनी गुरुवारच्या रात्री डल्ला मारल्याने शेतकरी भारत कुमरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

जगाच्या पोशिंद्याने शेतात राबराब राबून पिकवलेले मिर्चीचे पिक कुलूप तोडून नेल्याने शेतकऱ्यांचे मनोबल ढासळले असून याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे कुमरे यांनी माध्यमातून सांगितले आहे.

आज 'या' भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा इशारा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चक्राकार वाऱ्यांच्या विस्कळीत स्थितीमुळे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवली असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचाही अंदाज आहे.

दरम्यान, राज्यात तापमानाचा पारा चढाच असल्याचे पहायला मिळत आहे. काल मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ४३ अंशांच्या वर तापमान गेल्याची नोंद झाली. विदर्भातही सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमान नोंदवले गेले. कोकण किनारपट्टीवर सध्या उष्ण व आर्द्र तापमानाची नोंद होत असून उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील आठवडा आणखी तापणार!
राज्यात पुढील आठवड्यात कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढणार असून नागरिकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. 

आज कुठे कसे हवामान?
कोकण किनारपट्टी भागात आज उष्ण व आर्द्र हवामान राहणार असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे.

तर सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव,अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


स्पीडब्रेकर्सचा धोका: अपघातांवरील उपायच ठरतोय जीवघेणा!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कोरंबी (मारेगाव) समोरील रस्त्यावर जास्त उंचीचा गतिरोधक  उभारण्यात आला आहे. तो वाहनचालकांच्या पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे पंधरवाड्यात किरकोळ सह गंभीर अपघात घडले आहेत.

मागील आठवड्यात तालुक्यातील दहेगाव (घोंसा) येथील एक महिला ही स्पीडब्रेकरमुळे उसळून खाली पडली, ती गंभीर जखमी झाली असून तीच्या वर चंद्रपूरला येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु या मार्गांवर प्रवास करताना अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडत असून येथील ब्रेकरची उंची आणि त्यावर रंगरंगोटी केली नसल्याने असे अपघात घडतात, तरी असे अपघात पुन्हा टाळण्यासाठी स्पीडब्रेकरची उंची कमी करा नाहीतर ब्रेकरच हटवा अशी मागणी होत आहे.
परिणामी रस्त्यावरील अनावश्यक गतिरोधकांमुळे वाहनाची गती, वेळ, इंधन, वाहनांचे नुकसान, खर्चावर परिणाम होत आहे. तसेच जास्त उंचीचा रंगहीन गतिरोधक असल्याने त्याचा त्रास मात्र वाहनधारकांना होत आहे. सर्व काही ढोबळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे समजेल तितकेच अनुकरण प्रशासन करीत आहे. अशी ओरड नागरिकांसह प्रवाश्यातून होत आहे.

काय असावे...
‘पुढे गतिरोधक आहे’ असे गतिनियंत्रण सूचना फलक आवश्यक, पट्टे आवश्यक व ते वेळोवेळी रंगविणे,मार्गांवर मोजकेच ‘रबलिंग’ असावे.

१० वी, १२ वीचा निकाल लवकरच; या प्रकारे डाऊनलोड करा तुमची डिजिटल मार्कशीट..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

विद्यार्थ्यांनो तुमची मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी डिजी लॉकरवर नोंदणी आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रे डाउनलोड कसे करावे. डिजी लॉकरवर १० वी आणि १२ वीचे निकालपत्र अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे डिजीलॉकर खाते असणे आवश्यक आहे.

डिजीलॉकर खाते कसे तयार करावे?
१. DigiLocker च्या साईटला भेट द्या – https://www.digilocker.gov.in
२. इनपुट फील्डसह एक नवीन विंडो उघडेल
३. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि नंतर ‘Continue’ बटणावर क्लिक करा
४. या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. नवीन विंडोमध्ये दिलेल्या जागेत हा OTP भरा.
५. नंतर 'Verify' बटणावर क्लिक करा.
६. लिंक नवीन विंडोवर पुनर्निर्देशित केली जाईल
७. खात्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड सेट करा
८. पासवर्डमध्ये वापरकर्त्याचं नाव नसावं
९. शेवटी, तुमचा आधार क्रमांक सबमिट करा आणि तो OTP किंवा फिंगरप्रिंट पर्यायाद्वारे सेट करा.
१०. तुम्ही आता डिजी लॉकर ॲपवर यशस्वीरित्या साइन अप केले आहे.
डिजीलॉकरवरून महाराष्ट्र १० वी १२ वीचा निकाल कसा डाउनलोड करायचा?
१. युजरनेम आणि पासवर्ड वापरून डिजिलॉकर ॲपवर लॉग इन करा
२. 'प्रोफाइल' पेजवर जा आणि आधार क्रमांक सिंक करा. डिजीलॉकर खाते आधीपासून आधार क्रमांक वापरून तयार केले असल्यास, पुन्हा करण्याची गरज नाही.
३. डाव्या साइडबारमधील 'पुल पार्टनर डॉक्युमेंट्स' बटणावर क्लिक करा.
४. पुढील स्क्रीनवर दोन ड्रॉपडाउन असतील.
५. पहिल्या ड्रॉपडाउनमध्ये, 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ' निवडा.
६. पुढील ड्रॉप-डाउनमध्ये, मार्कशीट निवडा म्हणजे HSC/ SSC मार्कशीट/ स्थलांतर किंवा उत्तीर्ण इ.
७. पुढील स्क्रीनमध्ये महाराष्ट्र एसएससी ॲडमिट कार्ड/महाराष्ट्र एचएससी ॲडमिट कार्डवर नमूद केल्याप्रमाणे उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि रोल नंबर यासारखे आवश्यक तपशील भरा.
८. 'Get Document' वर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र HSC/Maharashtra SSC डिजिटल मार्कशीट/प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
९. ही कागदपत्रे डिजीलॉकर खात्यात सेव्ह करण्यासाठी सेव्ह टू लॉकर बटणावर क्लिक करा.

डिजीलॉकर वापरण्याचे फायदे
शालेय प्रमाणपत्र आणि मार्कशीट व्यतिरिक्त आधार कार्ड, कोविड १९ लसीकरण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्सची सुविधा डिजीलॉकरवर उपलब्ध आहे. आपण या ॲपवर एसएससी मार्कशीट, एचएससी मार्कशीट, रेशनकार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र या सुविधेचा लाभ घेऊ शकता.आपली सर्व महत्त्वाची कागदपत्रे या लॉकरमध्ये ठेवली जाऊ शकतात.


आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी अशा विविधि परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत.

 यात सुनिता श्यामराव मेश्राम, रा. जिवती (69.14 टक्के), प्रितिका जंगु करपाते, रा. भारी (68.23 टक्के), अदिती उमेश जुमनाके, रा. मांडवा, ता. कोरपना (64.44 टक्के), अर्जुन विजु वेलादी, रा. कारगाव, ता. कोरपना (54.46 टक्के) आणि गौरव चित्तरंजन कोवे, रा. मोहाळी, ता. बल्लारपूर (47.46 टक्के) अशी पात्र विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी चंद्रपूर जिल्हयातील असून आदिवासी समाजाचे आहेत तसेच हे विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक स्कुल, देवाडा येथे शिकत आहेत. सर्व पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रकल्प कार्यालयात आमंत्रित करून त्यांना भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार केला.

मिशन शिखर 2023-2024 अंतर्गत जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी चा क्रॅश कोर्स प्रकल्पात राबविला जात असून त्यामध्ये यावर्षी सीईटी करीात 85, जेईई 27, नीट 54 आणि एनडीए साठी 20 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पात्र करणे हा आदिवासी विकास प्रकल्पाचा उद्देश असल्याचे प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार यांनी सांगितले. प्रकल्पात पहिल्यांदाच ऐवढ्या संख्येने आश्रम शाळेतील विदयार्थी जेईई सारख्या परीक्षेत पात्र झालेले आहेत. आदिवासी विद्यार्थीसुद्धा कोणत्याही परिस्थितीवर मात करून घवघवीत यश संपादन करू शकतो, हे या यशाने दाखवून दिले आहे. मे 2024 ला होणा-या विविध मेडिकल / इंजिनिअरींग परीक्षेकरीता मिशन शिखर अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र होतील, असा विश्वास प्रकल्प अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मिशन शिखर उपक्रमास भेट देणारे प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक स्कुल, देवाडा या सर्वांचे कौतुक करण्यात आले आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रकल्पात आदिवासी विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर, समर कॅम्प, ताडोबा शैक्षणिक सहल, भारत दर्शन, परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ, शिक्षकांकरीता भविष्यावेधी प्रणाली नुसार प्रशिक्षण, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासपूरक प्रशिक्षण असे विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

संचालक संजय खाडे यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले. आज कथेचा शेवटचा दिवस होता. या कार्यक्रमाला आज (२७) ला पणन महासंघाचे संचालक तथा जय जगन्नाथ मल्टीस्टेट को.ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, वणी चे अध्यक्ष संजय खाडे यांनी भेट देऊन कथेचे रसग्रहण केले. 

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक हनुमान देवस्थान यांच्या तर्फे संजय खाडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून आयोजकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. 

या कथेला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'त्या' आधार नसलेल्या बातमीची वरिष्ठाकडे चौकशीची मागणी ...


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : कोणताही आधार नसतांना सदर वृत्तपत्राने खोटे वृत्त प्रकाशित करून समाजात हेतूपूरस्पर प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर या वृत्तपत्राच्या संपादक यांचे विरुद्ध कोणतीही कारवाई न केल्यास. याविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा मारेगाव काँग्रेस तालुका कमेटी च्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

चौथ्या स्तंभाला पत्रकारिता, वृत्तपत्र आणि बातम्या म्हणतात. चौथा स्तंभ म्हणजे प्रेस आणि वृत्त माध्यमे, दोन्ही शब्दांच्या वकिलीसाठी स्पष्ट क्षमता आणि राजकीय मुद्दे तयार करण्याच्या अंतर्निहित क्षमतेत. राजकीय व्यवस्थेचा भाग म्हणून ते अधिकृतपणे ओळखले जात नसले तरी, त्याचा महत्त्वपूर्ण अप्रत्यक्ष सामाजिक प्रभाव आहे. मात्र काही जन क्षेत्रात स्वतःची झोळी भरण्यासाठी या प्रभावाचा आधार घेताहेत त्यामुळे माध्यम बदनाम होत आहे असा सुरु अनेकात आहे. कोणाच्याही सांगिवांगी वरून, व आधार नसतांना बातम्या छापण्याचा सपाटा हल्ली दिसून येत आहे. त्यामुळे काही पक्षाचे नेते, पुढारी यांच्यात अस्वस्थता असल्याचे वातावरण आहे. मागील शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणूक पार पडली. या दरम्यान स्थानिक पत्रकारांच्या नावाने आलेला मलिंदा तीन महाठकांनी किंबहुना पदाधिकाऱ्यांनी हडप केला असे खळबळजनक वृत्त 22 एप्रिल 2024 रोजी वर्ध्याहून प्रकाशित करून तीन लोकांची नावासहित बदनामी केली असा, आरोप मारेगाव तालुका काँग्रेस कमेटी च्या वतीने करण्यात आला आहे, या तथ्यहीन बातमी व संपादकच्या विरोधात तहसीलदार व ठाणेदार यांच्या मार्फत जिल्हा वरिष्ठाकडे तक्रार करण्यात आली आहे. 

मागील आठवड्यात झालेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत मारेगाव तालुक्यातील काँग्रेसच्या तीन पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांकडून निधी घेऊन तो निधी पत्रकारांना दिले नसल्याचे खळबळजनक वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर मारेगाव तालुका काँग्रेस सेवादल, तालुका अध्यक्ष, व शहर अध्यक्षांनी सदर बदनामीकारक वृत्त प्रकाशित केले असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली असून, निवेदनातून चौकशी ची मागणी करून संबंधितावर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येइल असा ईशारा सुद्धा देण्यात आला आहे. 

काल (ता.25) रोजी दिलेल्या निवेदनावर माजी म. बा.कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, सोसायटी अध्यक्ष मार्डी वसंत आसुटकर, शहर अध्यक्ष कॉ कमेटी शंकर मडावी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद समिर, पलास बोढे,माजी सभापती शकुंतलाताई वैद्य,आकाश भेले, विलास वासाडे, अरविंद वखनोर, रविंद्र पोटे,रॉयल सय्यद,विजय रोगे, सुधाकर धांडे,यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेली समिती "या" तारखेपासून मराठवाडा दौऱ्यावर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्यादरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे :

समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. त्यानंतर जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक घेण्यात येणार आहे. दि. १६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर हिंगोली येथे दि. १७ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे, नांदेड येथे दि. १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. दि. २१ ऑक्टोबरला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता, धाराशिव येथे दि.२२ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर बीड येथे दि. २३ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात मंगळवारी एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दामले फैल येथे राहत्या घरी त्याने गळफास घेऊन जीवनाचा शेवट केला. 

मनोज भाऊराव उंदीरवाडे (अंदाजे वय 35) असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. 23 एप्रिलला दुपारी 2 वाजताच्या सुमारास मनोज हा घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबियांना आढळून आला.

घराच्या आड्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मनोज याच्या पाठीमागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. 

आज दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस; तोफा धडाडणार


सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

यवतमाळ : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यासाठी सध्या जोरजोराने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत. शेवटच्या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांचा भर असणार आहे.

राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीत 26 एप्रिलला मतदान होत आहे. त्यानिमित्त शेवटच्या दिवशी राज्यात अनेक नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांची अमरावतीत, तर कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची परतवाडा व सोलापूरमध्ये सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांच्या सभा होतील. 

विवाहित इसमाने केली विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील प्रभाग क्रमांक 1 मधील एका विवाहिताने काल मंगळवार च्या रात्री विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

विजय नामदेव काळे (54) असे विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपवलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी अंतिम टोकाचे पाऊल उचलत मारेगाव शिवारात असलेल्या ठाकूर यांचे शेतातील विहिरीत उडी घेतली.

मंगळवारी रात्री 8 वाजताचे दरम्यान, घडलेली घटना उघडकीस आल्यावर मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरारीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. विजय यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगी व मुलगा असा बराच आप्त परिवार आहे.

चक्क...चालल्या कारने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी टळली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दी बर्निंग ट्रेन नावाचा हिंदी चित्रपट 1980 मध्ये आला होता त्या सिनेमात चालती ट्रेन जळत अख्खा सिनेमा दी एंड बघितला असेल असेच दृश्य मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाहनाला बर्निंग दृश्या प्रमाणे अचानक आग लागल्याने वाहन रस्त्यावर जळू लागले. कारला आग लागल्यानंतर कार चालवणाऱ्यानी 'दी एंड' बघितला. मात्र, कार मधील व्यक्तीसह अन्य काही सदस्यांनी कारमधून आधीच आपला जीव वाचवला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच आगीने संपूर्ण वाहनावर नियंत्रण मिळवले आणि काही कळण्यापूर्वी वाहनाने पेट घेतला,आग इतकी वेगाने पसरली की कार पूर्णपणे जळून खाक झाली.

प्राप्त माहिती नुसार मारेगाव वरून खंडणी कडे जात असताना मारुती अल्टो कारने अचानक पेट घेताच गाडीमधील पवन नक्षणे व त्यांची पत्नी व लहान बाळ समयसुचकतेने गाडीबाहेर पडले. सुदैवाने समोरील अनर्थ टळला. अवघ्या काही वेळात कारला आगीने कवेत घेत कार क्र. (एम एच 34 एफ 3898) जळून खाक झाली.

तालुक्यातील खंडणी येथील पवन यदुनंदन नक्षणे सह त्यांच्या पत्नी आणि दीड वर्षाचा चिमुकला हे तिघे बोटोणी येथून खंडणीकडे निघाले. काही वेळातच खैरगांव फाट्यानजिक कारला अचानक आग लागली. आग लागताच गाडीतील तिघेही कारच्या बाहेर पडले. काही समजण्यापूर्वी आगीने कार पूर्णतः जळून खाक झाली. दरम्यान दी बर्निंग ट्रेन सिनेमाचा सिन प्रमाणे प्रवाश्यासह कार मालकाने अनुभवला.. हे विशेष 

जयंता उर्फ खुशाल कातोरे यांचे अपघातात निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वरोरा-वणी राज्यमार्गावर सोमवारी एका सुपरिचित व्यक्तिचा अपघाती निधन झाल्याचे माहिती समोर आली असून जयंता उर्फ खुशाल महादेव कातोरे (56) असे त्याचे नाव आहे. ते शहरातील एका खासगी कामावर कार्यरत होते. 

मृतक खुशाल हे पत्नी सह 22 एप्रिल 2024 रोजी वरोऱ्याला आई ची तब्बेत बघण्यासाठी गेले, आईची भेट घेतली दिवसभर गप्पागोष्टी केल्या आणि त्यानंतर ते परत वणी च्या दिशेने निघाले असता सायंकाळी साडेसात वाजताचे सुमारास अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने खुशाल यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना गणपती मंदिर वणी-वरोरा बायपास जवळ घडली. 

शहरातील एका खासगी कामावर सुपरिचित असलेले सर्वांशी आदराने संवाद साधणारे मनमिळाऊ स्वभावाचे कर्तव्यदक्ष समजल्या जाणाऱ्या खुशाल महादेव कातोरे यांचे असे अकाली निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जयंता उर्फ खुशाल त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व असा आप्त परिवार असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

इंडिया आघाडी ही डुप्लिकेट आघाडी आहे-देवेंद्र फडणवीस


सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

राळेगाव : एकीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांची ओरिजनल आघाडी आहे तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना उबाठा, शरद पवार गट यांची डुप्लिकेट आघाडी आहे. ही आघाडी देशाचा कुठलाही विकास करू शकणार नाही, त्यामुळे मतदारांनी ओरिजनल आघाडीलाच मतदान करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगाव येथे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील
यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये केले.

रविवारी (ता.२१) गांधी ले-आउट येथे ही प्रचार सभा झाली. सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार अशोक उईके, संदीप धुर्वे, संजयरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाने, भीमराव केराम, कृष्णराव पांडव, आशिष जयस्वाल, वसंत घुईखेडकर, राजू उंबरकर, जीवन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते, ज्या दिवशी काँग्रेससोबत युतीची वेळ येईल, त्या दिवशी शिवसेनेचे दुकान मी बंद करेल. पण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची काँग्रेसशी युती करीत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले. सोबतच राज्यानेसुद्धा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले.

गडचिरोलीत लोकशाहीचा विजय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

गडचिरोली… दुर्गम, वनाने वेढलेला, आदिवासी आणि मागास अशी ओळख असलेला जिल्हा. खरे तर विपुल वनसंपदा, खनिजसंपत्ती, नद्यांचा प्रदेश आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा यासोबतच लोकशाहीवर विश्वास ठेवणारा अशी या जिल्ह्याची ओळख असायला हवी.

येथे 19 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा-2024 च्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 72 टक्के मतदारांनी लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी दर्शवित मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे बजावले. मागील दोन्ही लोकसभा निवडणूकीत देखील हा मतदार संघ मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर होता. राज्यात इतर मतदार संघापेक्षा येथील मतदानाचे प्रमाण नेहमीच सर्वाधिक राहीले आहे. उल्लेखनीय म्हणजे इतर ठिकाणापेक्षा या जिल्ह्यात मतदानाची वेळ तीन तासांनी कमी होती, यासोबत दुर्गम आणि वनांच्छादित भागातील वाहतुकीच्या अडचणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंडखोरांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या या सर्वांना न जुमानता तळपत्या उन्हात नागरिकांनी रांगा लावून मोठ्या संख्येने मतदान केले.

मतदारांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद दबावाला बळी न पडता मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्याचा नागरिकांचा अढळ निर्धार अधोरेखित करतो. येथील भरीव मतदान हे लोकशाही प्रक्रियेवरील सामूहिक विश्वासालाही पुष्टी देते. गडचिरोलीच्या नागरिकांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत निवडणूक व्यवस्थेचे पावित्र्य राखले आहे. धमक्यांना धैर्याने झुगारून आणि आपला निवडणूक हक्क सांगून त्यांनी लोकशाहीच्या तत्त्वांप्रती आपली अतूट बांधिलकी दाखवून दिली आहे. गडचिरोलीच्या मतदारांनी दाखवलेले धैर्य आणि मतदानाप्रतिची दृढ भूमिका ही प्रतिकूल परिस्थितीत लोकशाही टिकून राहण्याचा आणि लोकांचा आवाज भीतीने किंवा जबरदस्तीने बंद करता येत नसल्याचा महत्त्वपूर्ण संदेश देते.

निवडणूक सुरळीतपणे घेण्यासाठी जिल्हा प्रशासन देखील दिवस-रात्र राबले. विशेष म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हा निवडणूक अधिकारी श्री संजय दैने हे देखील निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच बदलीने येथे आले होते. त्यातच निवडणुकीच्या चार दिवसांपूर्वी त्यांचे वडील वारले तरी देखील वैयक्तिक दुःख बाजूला सारून त्यांनी निवडणुकीच्या राष्ट्रीय कामात स्वतःला झोकून दिले. त्यांचा पूर्वानुभव दांडगा असल्याने निवडणूक यंत्रणेकडून त्यांनी तत्परतेने कामे करून घेतली. निवडणूक काळात जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान अनुभवी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी लीलया पेलले. गडचिरोलीत आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या शांततापूर्ण वातावरणात निवडणुका कधीच पार पडल्या नव्हत्या. यासाठी श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात तब्बल 16 हजार जवानांची फौज येथे जीवाची जोखीम पत्करून खडा पहारा देत होती. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांनी देखील आपल्या यंत्रणेचा पुरेपूर वापर करत ग्रामीण भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

देशात सर्वत्र लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना त्यात गडचिरोलीतील मतदारांनी धैर्य आणि अडथळ्यांना तोंड देऊन निवडणूक प्रक्रियेशी निभावलेली दृढ वचनबद्धता हा लोकशाहीवरील विश्वासाचा आणि पर्यायाने लोकशाहीचा विजयच म्हणावा लागेल.

खैरी येथे भगवान महावीर स्वामी जयंती उत्साहात

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : तालुक्यातील खैरी येथे श्री जैन श्रावक संघाच्या वतीने जैन धर्माचे २४ वे तिर्थकार भगवान महावीर स्वामी यांची जयंती (ता.२१) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

भगवान महावीर स्वामी यांची जयंती साजरी करण्याकरीता परीसरातील कुंभा, मार्डी, वनोजा देवी, मारेगाव, वडकी, खडकी, पिंपळापुर, वेडशी, येथील जैन बांधव खैरी येथे उपस्थिती दर्शवून भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गानी वाजत गाजत महावीर स्वामी यांचा जयघोष व जियो ओर जिने दो चा जयघोष करीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. 

शोभयात्रा परत महावीर भवन येथे येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी महाभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला होता. भगवान महावीर स्वामी जयंती उत्सवाचे आयोजन श्री जैन श्रावक संघ खैरी यांच्या वतीने करण्यात आले होते.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात झाले 67.57 टक्के मतदान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लोकसभा निवडणूक म्हणजे एकप्रकारे लोकशाहीचा उत्सवच असल्याचं वातावरण निर्माण करण्यात आल्याने लोकांनीही या उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. 19 एप्रिल ला चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पुरूषांसोबतच महिलांनीही मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. रखरखत्या उन्हातही महिलांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केले. 

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 67.57 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 5 लाख 83 हजार 541 महिला तर 6 लाख 58 हजार 400 पुरुष मतदारांचा समावेश आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 18 लाख 37 हजार 907 मतदार आहेत. त्यापैकी 12 लाख 41 हजार 952 मतदारांनी मतदान केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. यात सर्वाधिक 73.24 टक्के मतदान वणी विधानसभा क्षेत्रात झाले.

त्याचबरोबर राजुरा 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.37 टक्के, वरोरा 67.73 टक्के तर आर्णी विधानसभा मतदार संघात 69.52 टक्के मतदान झाले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात 338 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. वणी शहरात 48 तर तालुक्यात 186 मतदान केंद्र देण्यात आली होती. सर्वच मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्वच सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

सर्वच केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. पोलिसांचाही चोख बंदोबस्त दिसून आला. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जून महिन्यात मान्सूनच्या आगमनांसह अनेकांच्या चेहऱ्यावर विजयाच्या आनंदाचे भावपूर्ण आहेत तर काहींच्या नशिबी पराभवाचा पाऊस पडणार आहे. त्या उमेदवारांचे भवितव्य जरी शुक्रवारी ईव्हीएममध्ये लॉक झाले असले तरी कोणाचे भाग्य उघडते याची प्रत्यक्ष सर्वच उमेदवारांसह जनतेला 47 दिवस प्रतीक्षा करावीच लागणार आहे.


"विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42/43 अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत 3 टक्क्यांची वाढ झाली."

वणीत गीत रामायणाचे उत्कृष्ठ सादरीकरण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील संस्कार भारती समिती वणी व जैताई देवस्थान यांच्या संयुक्त, व पारसमल चोरडिया फौंडेशन वणी यांच्या सौजन्याने जैताई मंदिर रंगमंचावर रामनवमीच्या पूर्वसंध्येला नृत्याद्वारे गीत रामायण अशा उत्कृष्ठ कार्यक्रम आयोजित  करण्यात आले, त्यात अनेक गीत रामायण सादरीकरण केले.

कार्यक्रमात राम अष्टकम या शास्त्रीय नृत्याने सुरुवात झाली. त्यानंतर गीत रामायणातील "स्वयें श्री राम प्रभू ऐकती" या गीतावरील नृत्याने गीत रामायणावरील नृत्याला सुरुवात झाली. यात गितरामायणातील 14 गीतांवर कार्यक्रम सादर करण्यात आला होते. त्यानंतर राम जन्मला ग सखे, स्वयंवर झाले सीतेचे, कोण तू कुठला राजकुमार, मज आणून द्या तो हरीण, त्रिवार जयजयकार इत्यादी गीतावर प्रियंका कोटनाके, सागर मुने, निखिल वाघाडे, अपूर्वा तिमांडे, बाल कलावंत लोकित कोरडे, अशोक सोनटक्के, रिद्धी राऊत, हितेश गोडे, पूजा ठाकूर, जयती सुराणा, वैष्णवी लिंगमे, सुनिता डाबरे, आरोही खैरे, सिमा सोनटक्के, अन्वी पावडे, स्पृहा कोरडे, कांचन गुरनुले, मीना वानखेडे, वृषाली मुंजेकर, प्रिया कोणप्रतीवार, दृष्टी कोणप्रतीवार, जयश्री मेहता, सानवी मुंजेकर, गौरव नायनवार, प्रविण सातपुते यांनी नृत्य व नाट्याचे सादरीकरण केले. अतिशय सुंदर आकर्षक कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन अमेझॉन मध्ये टीम लीडर असलेल्या प्रियंका कोटनाके यांनी केले. 

या प्रसंगी जैताई देवस्थान समितीचे अध्यक्ष माधव सरपटवार, ठाणेदार अनिल बेहरानी, पारसमल चोरडिया फौंडेशनचे कुणाल चोरडिया, मुन्नालाल तुगणायत, तिरुमल्ला तिरुपती क्रेडिट को. ऑफ. सोसायटीचे राकेश खामनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

 सागर झेप बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सागर मुने यांनी पुढाकार घेऊन हा गीत रामायण वर नृत्य व नाट्य कार्यक्रम सादर करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विजय चोरडिया व हरणे कॅटरर्स चे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या अलोणे यांनी केले.

पिक अप च्या धडकेत कामगार जागीच ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पिकअप आणि मोटारसायकलची जोरदार भिडंत झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारला संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास वणी- यवतमाळ राज्यमहामार्गांवरील नायरा पेट्रोल पंप नजीक घडली.

मृतक मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथील रविदास हरिदास कोरझरे असल्याची प्राथमिक माहिती वृत्त लिहीपर्यंत प्राप्त झाली असून मृतक हा नरसाळा येथे गिट्टी क्रशर वर चालक म्हणून कार्यरत असल्याचे समजते. मृतकाच्या पाठीमागे पत्नी व दोन मूले असल्याचीही माहिती आहे.

वणीहून पिक अप चारचाकी वाहन क्र. (MH 29 BE  6629) मारेगाव च्या दिशेने भरधाव असताना पिक अप चा टायर फुटूला व समोरून येणाऱ्या मोटारसायकल क्र. (M H 31 AS 2579) स्प्लेंडर कंपनीची दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही घटना विनायक कोटेक्स जिनींग नायरा पेट्रोल पंप जवळ घडली असून या जबर धडकेत त्या कामगार चालकाच्या डोक्याला जबर मार लागून डोकं छिन्नविच्छिन्न झाल्याने तो जागीच ठार झाला. 


मंडपात जाण्यापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा महत्वाचा प्रसंग असतो, पण त्याहून महत्वाचं असतं ते आपल्या देशाप्रती असलेलं कर्तव्य. हेच लक्षात ठेवत वणी विधानसभेतील लाठी गावातील एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं. लग्न मंडपात जाण्यापूर्वी लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी तो नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि आधी त्याने मतदानाचा हक्क बजावला.
      
आज महाराष्ट्रात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली असून पूर्व विदर्भात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच तरूण, म्हातारे-कोतारे, मध्यमवयीन नागरिक, मतदानासाठी सर्वजण उत्साहाने बाहेर पडले आहेत. एवढंच नव्हे तर दिव्यांग नागरिकही त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजवाताना दिसत आहेत.
       
त्यातच वणी विधानसभेतील लाठी गावातील एका तरूण मतदाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी अशा वेशातील एक तरूण मतदान केंद्रावर आला आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या. राहूल खिरटकर असे त्या तरूणाचे नाव असून लग्न मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर आला, अन् तेथे त्याने मतदानाचा हक्क आपला बजावला. 

लोकशाहीसाठी योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं असं राहुलने आवर्जून सांगितल. जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने नागरिकांना केलं. नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोकं त्याचे कौतुक करत आहेत. 

चंद्रपूर मतदार संघात शुक्रवारी अग्निपरीक्षा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उद्या शुक्रवारी (ता.19) पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा- गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश आहे.

भाजपसाठी नागपूरनंतर सर्वात महत्वाचा मतदारसंघ चंद्रपूर आहे. इंडिया,महाविकास आघाडीने या मतदारसंघातील दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. राज्याचे वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत. मुनगंटीवार केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहेत. धानोरकर यांचा मतदारसंघातील जातीय समीकरणावर भर आहे. त्यांनी मतदारसंघात विकासच केलेला नाही. मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. त्यामुळे येथे सर्वांत आटीतटीची आणि चूरशीची लढत होणार आहे.

2019 मधील निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-शिवसेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. ह्या ठिकाणी थेट आमने सामने लढत होत आहे. या दोन्ही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता या मतदारसंघातून कोणाला कौल मिळतो यासाठी जून महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जून महिन्यात मान्सूनच्या आगमनांसह अनेकांच्या चेहऱ्यावर विजयाच्या आनंदाचे भावपूर्ण आहेत तर काहींच्या नशिबी पराभवाचा पाऊस पडणार आहे. येथील उमेदवारांचे भवितव्य जरी उद्या शुक्रवारी ईव्हीएममध्ये लॉक होत असले तरी कोणाचे भाग्य उघडते याची प्रत्यक्ष सर्वच उमेदवारांना 47 दिवस करावीच लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून दुर्गम भागातील मतदान केंद्रापर्यंत आवश्यक मतदान साहित्य पोहोच करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करुन घेतली आहे.

18-19 वयोगटातील सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात आहेत. त्यापाठोपाठ भंडारा-गोंदिया या मतदारसंघात आहेत. रामटेक मतदारसंघात 31,725, भंडारा-गोंदिया 31,353, नागपूर 29,910, चंद्रपूर 24,443 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 24,026 इतके नवमतदार आहेत. यासह 20-29 वयोगटांतील सर्वाधिक मतदारही रामटेक मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 3,83,276, भंडारा-गोंदिया 3,66,570, चंद्रपूर 3,42,787, नागपूर 3,37,961 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,28,735 इतके मतदार आहेत.

30-39 वयोगटातील सर्वाधिक मतदार हे नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 5,06,372, रामटेक 4,90,339, चंद्रपूर 4,25,829, भंडारा-गोंदिया 3,99,115 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,56,921 इतके मतदार आहेत.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 70,698 इतके मतदार आहेत. त्यापाठोपाठ रामटेक 46,413, भंडारा-गोंदिया 38,269, चंद्रपुर 37,480 आणि गडचिरोली-चिमुर 33,559 असे एकूण 2,26,419 ज्येष्ठ मतदार आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले आहे.

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. शिवाय मतदानातूनच आपण आपले व देशाचे उज्वल भविष्य निश्चित करू शकतो. त्यामुळे मतदारांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सामील व्हा, असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मतदारांच्या नावे संदेशपत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहनही केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणतात की, भारत हा उत्सवप्रिय देश आहे. प्रत्येक उत्सव आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो. यावर्षीदेखील लोकशाहीचा उत्सव देशभरात साजरा होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो. या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे.

भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. या मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध आहे.

त्यामुळे येत्या 19 एप्रिल 2024 रोजी 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत सहभागी व्हा. विशेष म्हणजे कोणाच्याही दबावात न येता निर्भिडपणे मतदान करा. लक्षात ठेवा मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सर्व कामे बाजुला ठेवून कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रातून केले आहे.

महाविकास आघाडीचा राजूर येथे झंझावत प्रचार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : इंडिया, महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या निवडणूक प्रचाराला शेवटचा एक दिवस शिल्लक असताना तालुक्यातील सर्वात मोठे गाव ज्याला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते अश्या राजूर गावात आघाडीचे सर्वच घटक पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांच्या भेटी घेत इजारा येथे सभा घेतली. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढत असल्याने लोकशाही, संविधान व देश वाचविण्यासाठी प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले.

महाविकास आघाडीचे घटक पक्षातील उभाठा सेनेचे नेते संजयभाऊ देरकर, कांग्रेसचे डॅनी संड्रावार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कुमार मोहरमपुरी, मो. असलम, डेव्हिड पेरकावार, महादेव तेडेवार, प्रवीण खानझोडे, माजी जि प सदस्य संघदीप भगत, बालाजी मिलमिले, राजू तुराणकर, गणेश मिलमिले, फैजल खान, रावबान उईके, प्रणिता असलम, दिशा फुलझेले, आदींचा प्रमुख उपस्थितीत गावातील प्रमुख मार्गाने प्रतिभाताई धानोरकर यांचा प्रचार करण्यात आला. 

येथील वॉर्ड क्र. 1 येथे संत गाडगेबाबा चौकात कॉर्नर सभा घेण्यात आली. "चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात भाजपाच्या मंत्री असलेल्या व स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेणाऱ्या उमेदवाराचा पुढे कांग्रेसच्या महिला उमेदवार धानोराकर यांना जनतेचा प्रचंड समर्थन मिळत असल्याने भाजपाचा पायाखालची वाळू निसटत असल्याने भाजप कडून घाणेरडे विधान केले जात आहे, तर प्रचार करण्यासाठी सिनेकलाकारांना आणावे लागत आहे. भाजपाचा जनविरोधी कार्यामुळे जनते मध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केल्या जात आहे. सध्या भाजप कडे निवडणूक रोख्या द्वारे आलेल्या पैशाचा महापुरा मुळे कुठलेही गैरप्रकार करू शकतात, त्यामुळे जनतेने ह्यापासून सावध राहावे." असे संजयभाऊ देरकर यांनी कॉर्नर सभेत बोलताना सांगितले, तर कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी, "भाजपाची सरकार ही शेतकरी विरोधी, कामगार विरोधी व महिला विरोधी आणि जगात सध्या युवकांची सर्वात जास्त संख्या असलेल्या देशात शिक्षित युवकच बेरोजगार असल्याने युवक विरोधी भाजप सरकारला सत्तेवरून बेदखल केले पाहिजे" असे आवाहन केले. यावेळेस बालाजी मिलमिले, संघदीप भगत, संतोष माहुरे, डेव्हिड पेरकावार, प्रवीण खानजोडे, यांनीही सभेला संबोधित करून "हुकूमशाहीला घालवून लोकशाहीचा विजय करून धनबल भाजपापासून गाफिल न राहता सावध राहण्याची गरज आहे" असेही ते म्हणाले.

या राजूर गावातील प्रचाराला भाकपाचे कॉ. नंदकिशोर लोहकरे, राजूर विकास संघर्ष समितीचे जयंत कोयरे, व असंख्य गावकऱ्यांनीं सहभाग नोंदविला.

या निवडणुकीत 'आघाडी'ची प्रचंड चर्चा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : भाजप काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार झाला आणि 10 वर्षानंतर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तेवर परतला आणि लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवले. त्यानंतर मागील काळात केंद्र सरकारकडून महागाई, बेरोजगारी, ईडी, सीबीआय कारवाया आणि महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून विशेष करून शिवसेना, राष्ट्रवादी फोडून राज्यात सत्ता मिळवली असे राजकीय विश्लेषक सांगतात. महाराष्ट्रात काय चाललंय हे उघड्या डोळ्यांनी इथल्या मराठी माणसांनी बघितलं. दिवसामागून दिवस गेले आणि पाहता पाहता लोकसभा निवडणूक लागली. त्याअगोदर महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव, सुशिक्षित बेरोजगारांना नौकऱ्या, योजनेत बदल अशा विविध समस्या आणि त्यातील परिणाम गोर गरीब जनतेने सोसले. शेतकरी त्रस्त,शेतमालाला भाव मागत आहे, पण मिळत नाही. विद्यार्थ्यांना नौकरी मिळत नाही, खाजगीकरण थांबण्याचे नाव घेत नाही, महागाई तर कित्येकांचे कंबरडे मोडत आहे. पेपर फुटी ने डोकं वर काढलं, महिलावर होणारे अत्याचार आणि सरकार च्या योजना खास करून मोफत वाळू योजना ही घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही.कित्येकांचा संसार उघड्यावर आला आहे. धावपळीत जिवन जगत असताना अनेक ठिकाणी लक्ष द्यावे लागल्यामुळे होणारी मनाची, बुद्धीची, विचारांची, आणि कृतींची संभ्रमित अशी अवस्था. अशी त्रेधा तिरपीट उडाल्यामुळे सामान्य माणसाला एकही काम लक्षपूर्वक आणि धड करणे अशक्य होऊन बसले. त्यामुळे आता लोक मोदी सरकारला कंटाळलेले दिसून येत आहे. मोदींची क्रेज ओसरली आणि ती म्हणजे पूर्व विदर्भातून परिणाम दिसून येणार अशी चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. चंद्रपूर येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेत चक्क उमेदवारांनेच बहीण भावाच्या नात्याला कलंकित करणारे घृणास्पद जाहीर बोलून आपली वोट बँक किंबहुना मतदार संघ नाराज झाल्याचे बोलल्या जात आहे. आता ते बोलण्यामागचे कारण प्रत्येक सभेमधून नेते मंडळी सांगत फिरत आहेत. मात्र तो शब्द आणि बोलणं जनतेच्या चांगलेच जिव्हारी लागल्याने मतदारांचा कौल आघाडी कडे वळता होत असल्याचे चित्र ग्रामीण भागातून दिसून येत आहे. यासाठी सर्व घटक पक्ष, मित्र पक्ष एकत्र येत लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरल्यागत आघाडी च्या उमेदवाराचा प्रचार प्रचंड कमालीचा दिसून येत आहे. ताई येणार असं जरी म्हटलं तर विरोधी पक्षातील कार्यकर्ता म्हणतोय आमच्या नेता दुर्लक्ष करत असल्याने आम्ही टेन्शन घेत नाही, मात्र ही एक प्रकारची गहरी चाल असू शकते. हे समजून घेतलं पाहिजे असेही काही राजकीय जाणकार सांगतात. सोशल माध्यमावर वातावरण एकदम तापल्याचे दिसून येत आहे. मतदानाला तीन दिवस आहे. 19 एप्रिल ला सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या अनुषंगाने निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. वरिष्ठ वेळोवेळी कार्यक्रम तपासत आहे. असेच आता पुढाऱ्यांनी मतदार तपासला पाहिजेत, कोणकोणाच्या पथ्यावर आहे. ह्याकडे विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. ही निवडणूक नुसतीच निवडणूक नसून मोठी लढाई आहे. आणि या लढाईत ताईंना जनतेशी "मेनीफेस्टो" घेऊन संवाद साधत भाऊंचे पानिपत करायचं आहे. मात्र, हे दिसते वाटते तेवढे सोपं नाही. ही निवडणूक मोठी आटीतटी ची होणार, असे बोलल्या जात आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन भाऊंचे मतदार फिक्स आहे. ते फुटणार नाही, पण ताईंचे मतदार तीन तिघाडा आणि काम बिघाडा, हे ट्रिपल इंजिन कधी गंडतील सांगता येत नाही. नुसतं वातावरण आहे म्हणून गाफिल राहून चालता येणार नाही.यंदा कर्तव्य आहे म्हणून,समजून मतदान पारड्यात पाडून घ्यायचे आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी हा मतदार संघ फार मोठा आहे, यात अनेकांचे राजकीय वलय आहे. त्यापुढे नवख्यांचे काय चालणार असे चर्चील्या जात आहे. परंतु आपला समाज म्हणून संख्याबळ मोठ्या प्रमाणावर आहे, तसेच इतरी समाज, जनता पाठीशी असल्याचे समर्थन देत आहे. हे इतपत ठिक असले तरी मतदार मत दान करणं आणि तो आपल्यालाच मतदान करतो का?हे आतातरी सांगणं किंवा गणित जुळवणं अवघड आहे. उद्यापासून रात्र वैऱ्याची आहे. आणि असं म्हटलं जात की रात्रीस खेळ चाले... त्यामुळे या निवडणुकीत भाऊ की ताई,कोण बाजी मारणार? हे येणारा काळ सांगेल...

एसीबीची कारवाई, साडेचार हजाराची लाच घेतांना तलाठी रंगेहात अडकला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : खैरगाव भेदी साजातील तलाठ्यावर सापळा लावला असता या सापळ्यात शेतीचा फेरफार साठी 4500/- रुपयांची लाच घेताना तलाठी शालिक मारोती कनाके (56) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने तालुका प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, खैरगांव भेदी साजा तथा अतिरिक्त प्रभार असलेल्या चिंचमंडळ तलाठी यांनी तक्रारदाराकडे फेरफार करण्यासाठी 5000/- रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम 4500/- रुपये निश्चित करण्यात आली. रक्कम देण्यापूर्वी तक्रारदाराने यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती. 

त्यानुसार आज मंगळवारी दि.16 एप्रिल 2024 ला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने डॉ जवादे यांचे राहते घर सजा क्रमांक 30 सुभाष नगर येधील तलाठी कनाके यांचे वर सापळा रचून तलाठी कनाके यांना साडेचार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधिक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल पवार (अमरावती), पोलीस उप अधिक्षक उत्तम नामवाडे, पो.नि.विनायक कारेगावकर यांच्या मार्गदर्शनात सापळा पथक पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, संजय कांबळे, वसीम शेख, अतुल मते, सचिन भोयर,भागवत पाटील, सुरज मेश्राम, राकेश सावसाकडे, सतीश सोनोने (यवतमाळ) यांच्या पथकाने केली.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

'RTE' प्रवेशाला प्रारंभ; 16 ते 30 एप्रिलपर्यंत 'या' संकेतस्थळावर करा अर्ज..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांसाठी २५ टक्के 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेला आता प्रारंभ झाला आहे.

'या' संकेतस्थळावर करा अर्ज, जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया
'आरटीई'अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्यास आजपासून (मंगळवारी) सुरवात होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर त्याची छाननी होऊन लॉटरी निघेल आणि लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील. दरम्यान, ज्या शाळांमध्ये लॉटरीची गरज भासणार नाही, त्याठिकाणी 'आरटीई'तून प्रवेशासाठी पात्र मागेल त्या विद्यार्थ्याला थेट प्रवेश मिळतील. विद्यार्थ्यांना १६ ते ३० एप्रिलपर्यंत 'आरटीई' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

राज्यातील ७५ हजार २६४ शाळांनी 'आरटीई'अंतर्गत नोंदणी केली असून त्यात जिल्ह्यातील तीन हजार ३७८ शाळा आहेत. नवीन बदलानुसार 'आरटीई'अंतर्गत राज्यातील नऊ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या (घरापासून एक किमी अंतराची अट लागू) खासगी अनुदानित किंवा शासकीय शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

RTE प्रवेशाचे निकष
• विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत प्रवेशासाठी त्यांच्या घराजवळील एक किमी अंतरावरील खासगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळेत प्राधान्याने प्रवेश घ्यावा लागणार आहे. 
• एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा नाही, पण इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा आहे, त्या विद्यार्थ्याला तेथे प्रवेश घेता येणार आहे. परंतु, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून खरोखरच त्या अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा आहे की नाही, याची खात्री गुगल मॅपिंगद्वारे केली जाणार आहे.


वणीत सिनेअभिनेत्री रवीना टंडनचा रोड शो "सुपरहिट"


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री रवीना टंडन आज सोमवारी वणी येथे आली होती. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ 'ती' रोड शो मध्ये सहभागी होऊन मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. 

यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेडे, यासह महायुतीचे व मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी सामील झाले होते. विशेष म्हणजे महिलां पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. 
प्रत्यक्ष मतदानासाठी केवळ चार दिवस आहे. यासाठी उमेदवार मतदारांना जागृत करण्यासाठी स्टार प्रचार असो की पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी असो, उमेदवारांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस एक करित आहे. यात भारतीय जनता पक्ष सर्वात पुढे असताना दिसत आहे. यासाठी विदर्भात सिनेकलाकार स्वयं्फुर्तीने प्रचारात उतरले असून आज वणी येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन ह्यांचा रोड शो आयोजित करण्यात आले होते. येथील शिवतीर्थावरून प्रचाराला सुरुवात झाली त्यानंतर वणी शहरातील प्रमुख मार्गाने जयघोष करित परत टिळक चौक येथे रोड शो ची सांगता करण्यात आली. 
या रोड शो प्रचारादरम्यान विशाल विजयी संकल्प करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण येत्या 19 एप्रिल ला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन सुधीर भाऊंना मतदान करावे आणि निवडून लोकसभेत पाठवावे,असे आवाहन आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केले. 
दरम्यान अभिनेत्री रवीना टंडनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जन समुदाय रस्त्यावर उतरला. तूर्तास जनतेमध्ये उत्सहाचे वातावरण यावेळी दिसून आले. 


अभिनेत्री रविना टंडन आज वणीत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणीत आज सिने अभिनेत्री रवीना टंडन हिचा ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रोड शो आहे. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि चित्रा वाघ यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला नागरिकांची तुफान गर्दी उसळली होती.

सोमवार 15 एप्रिलला सायंकाळी 5.30 वाजता अभिनेत्री रविना टंडन या वणी मध्ये येणार आहे. त्यामुळे 90 च्या दशकातील तीचे फॅन्स व मुनगंटीवार समर्थकामध्ये तीला बघण्यासाठी ऐकण्यासाठी तोबा गर्दी असण्याची शक्यता आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथून रोड शो ला सुरुवात होणार असून खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, काठेड चौक, सुभाषचंद्र बोस चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक, टिळक चौक असा रोड शो असणार आहे. पडद्या वर भुरळ पाडणारी आज प्रत्यक्ष वणीत रोड शो ने सिनेअभिनेत्री रविना टंडन यांची भुरळ पडणार आहे. अशी चर्चा वणी विधानसभा क्षेत्रातील तीच्या फॅन्स मध्ये जोर धरत आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांअगोदर फडणवीस यांची सभा झाली, त्यानंतर भाजपने स्टार रोड शो आयोजित केला आहेत. आज सोमवारी सायंकाळच्या वेळेस हा रोड शिवतीर्थावरून सुरुवात होणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकातून माहिती दिली. 

मतदार राजा म्हणते आता ढिसाळ नियोजन नको; राजकीय जाणकार काय सांगतात!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारात तेजी आल्याचे दिसून येत आहे. 

वणी मारेगाव झरी तालुक्यात सभा, बैठका, कॉर्नर सभा, भेटीगाठी अगदी पद्धतशिर सुरू आहे. मात्र, जास्तच अविर्भावात गेलेल्या आघाडी चे प्रचारात नियोजन ढिसाळ असल्याचे चर्चा आहे. ताजे आणि उत्तम उदाहरण म्हटलं तर वणीतील केतकर यांची सभा. आघाडी आणि मित्र पक्षातील मातब्बर लोकं संधी साधू असल्याचे बोलल्या जाते. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काही करत नाही. आणि मिळालेच की ते केव्हा कुणाचा गेम करतील याचा नेम नाही, दिवसभर वातावरण ताईंचे आहे असे सांगून रात्रीतून भाऊंची हवा बनवून टाकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

विशेष म्हणजे ताईंनी शेवट च्या घडीला खर्चिक हात आखूड केल्याने अनेकांची गाडी आदळआपट होत आहे. एवढेच नाहीतर कोणीतरी कान भरल्याने माध्यमापासून फारकत एकदमच घेतल्याची चर्चा आहे. लोकांमध्ये भावनिक वातावरण असल्यामुळे आपण सहजच जिंकू अशी बेसावध संकल्पना मेहनती वर पाणी फेरू नये यासाठी प्रचार माध्यमातून कंटिन्यू असणं आवश्यक आहे, पण तसं काही दिसत नाही. प्रचार प्रसार अपडेट्स असायला हवा नाहीतर चित्र वेगळंच दिसते, असे राजकीय जाणकार सांगतात.

एरवी निवडणूकीत "जिधर दम उधर हम" अशी पद्धत झाली आहे. तुम्ही कितीही पटवून सांगा, पायापोटी लागा, खाऊ पेवू घाला, गुण  त्याचेच गाईल जो शेवटी कामी पडला. कित्येकांनी शेवटच्या क्षणी दृढ विश्वास असणाऱ्यांचे गणित बिघडवले आहे, त्यांचा फार्मुला एकच 'slow but sure' धिमा पण निश्चित. याप्रमाणे प्रतिस्पर्धीचे काम चालू असल्याचे चर्चेत आहे. मतदानाला केवळ आणि केवळ पाच दिवस आहे. तूर्तास ज्याने दाबून जोर लावला, त्याने गड जिंकला अशी चर्चा जोर धरत आहे.