प्रकल्पग्रस्तांनी काढला अन्यायाविरोधात दिंडोरा धरणावर बैलबंडी मोर्चा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : दिंडोरा प्रकल्पग्रस्तावर राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासुन अन्याय करीत आहे. यासंदर्भात अनेकवेळा दिंडोरा बॅरेज संदर्भातील विभागात जाऊन निवेदन देण्यात आले, बहुतांश वेळा चर्चा सुद्धा करण्यात आल्या, तरी देखील अजुनपर्यत झोपी गेलेल्या सरकार ला किंवा त्या विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं म्हणणारं सरकार जर खरच शेतकऱ्यांच्या पाठीशी असते तर आम्हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय का? करीत आहे, असे सरकारवर संतापलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, मासेमार, तसेच बेरोजगारांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्याकरिता आज दिंडोरा धरणावर बैलबंडी मोर्चा काढुन तीव्र शब्दात निषेध व्यक्त करित आंदोलन करण्यात आले असून हे आंदोलन उद्यापर्यंत म्हणजे न्याय मिळेपर्यंत असणार आहे.

संबंधित विभागातील,आम्हाला शेवटी त्यांना झोपीचे सोंग घेऊन असलेल्या सरकार व प्रकल्प कार्यालयातील अधिकारी यांना जागे करुन आमच्या मागण्या मंजूर करून घेण्याकरिता दिंडोरा धरणावर बैलबंडी मोर्चा काढुन आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असं आंदोलन कर्त्यांचं म्हणणं असून जर सरकारने व दिंडोरा बॅरेज प्रकल्प कार्यालयातील अधिकारी यांनी तातडीने दखल घेतली नाही, तर आम्ही येथेच जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही असा ईशाराही देण्यात आला. दरम्यान, आज 13 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी असे दोन दिवस प्रकल्पग्रस्त शेतकरी, मासेमार व बेरोजगारांनी होत असलेल्या अन्यायाविरोधात दिंडोरा धरणावर बैलबंडी मोर्चा सह शेकडो लोकांच्या उपस्थितीत काढला. 

त्यामुळे शिंदे सरकार व दिंडोरा बॅरेज प्रकल्प अधिकारी काय निर्णय घेतात याकडे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकरी, मासेमार, बेरोजगार तसेच परिसरातील नागरिकांचे यांचे लक्ष आहे.